
सडक अर्जुनी दि.04ः विद्यार्थी आपल्या बुध्दिमत्तेच्या आधाराने,नियोजनानूसार व वर्षभर मेहणत करून भरघोस यश संपादन करतात.स्वतःसह,आपले कुटुंब तथा आपल्या शाळेचे नाव प्रसिध्दी च्या शिखरावर पोहचवितात.गुणवंत विद्यार्थी म्हणून स्वतःला सिध्द करतात.
अशा गुणवंत विद्यार्थ्यांनी भविष्यातही अभ्यासातील सातत्य कायम ठेवावे.असे प्रतिपादन बहुजन हिताय जगत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. खजरी चे अध्यक्ष तथा प्राचार्य खुशाल कटरे यांनी केले.गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभा च्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
बहुजन हिताय जगत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित खजरीच्या वतीने 3 नोव्हेंबरला सभासदांचे गुणवंत पाल्य व शालेय गुणवंत विद्यार्थी -सत्कार कार्यक्रमाचे आयोजन हरिहरभाई पटेल उमावि चिरचाळबांध येथे करण्यात आले होते.या प्रसंगी पतसंस्थेचे संचालक तथा प्राचार्य जी.एम.येळे,संचालक के.जे.बर्वे,संचालक आर.यु.गौतम, पर्यवेक्षक यु.सी.तागडे,क.महा.प्रभारी प्रा.राजू बोपचे,प्रा.संजय येळे,पतसंस्था व्यवस्थापक उमराव मांढरे, लिपिक सुभाष कवरे,वरीष्ठ शिक्षक आर.एच.पारधी,सत्कार मुर्ती प्रा.पी.एम.चुटे,श्रीमती आशाताई चुटे,विचारमंचावर उपस्थित होते.
श्री.कटरे यांनी सर्व सभासदांना आवाहण केले की,पतसंस्थेच्या वतिने सभासदांचे हित जोपासत, कर्ज मर्यादेत वाढ व कर्जावरील व्याजदरात कपात करण्यात आलेली असल्यांने सभासदांनी पतसंस्थे मार्फत आर्थिक व्यवहार वाढवावा व या पुढेही असाच विश्वास ठेवावा.प्रास्ताविक व संचालन प्रा.जे.एन.तितीरमारे यांनी केले.
याप्रसंगी गुणवंत पाल्य कुणाल चुटे, शालेय गुणवंत विद्यार्थी कु.तृप्ती बागडे,पकंज टेंभरे ,पालक प्रा.पी.एम.चुटे, सौ.आशाताई चुटे यांचा शाल,स्मृतीचिन्ह, व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आभार स.शि.बन्सीधर शहारे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.मेहेर सरांसह, इतर कर्मचार्यांनी सहाय्य केले