
गोंदिया–केंद्र शासनातर्फे पंतप्रधान आवास योजना ही राबविली जात आहे. त्यात अति आवश्यक गरजू, बेघर असलेल्या लोकांना पक्के घराचे बांधकाम करीता या योजने मार्फत ग्रामीण व शहरी भागात गरजूंना या योजनेचा लाभ देण्यात येते. समाजातील दुर्बल घटक, शहरी, ग्रामिण भागातील अल्प उत्पन्न गटातील लोक, यांना स्वस्त दरात घरे उपलब्ध व्हावी या उद्देशाने आवास योजना सरकारने सुरू केली आहे. त्यामध्ये राज्यात सर्वाधिक विक्रमी घरकूल गोंदिया जिलेसाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी मंजूर करून आणले आहे. गोंदिया जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना ग्रामीण भागाच्या 1,26,662 लाभार्थ्यानी आवेदन केले होते.त्यात 92,871 अर्जदारांना पात्र आणि 46927 अपात्र घोषित करण्यात आले होते. त्यामधून ४४१२१ पात्र लाभार्थी वंचित राहिले होते. त्यात ४८४६ लाभार्थीना आधीच मंजूरी मिळाली होती. तरीपण जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्याना या योजनेचा लाभ नाही मिळालेला आहे. त्यांना २०२०-२१ आर्थिक वर्ष मध्ये घरकुल मिळण्याकरीता आमदार विनोद अग्रवाल यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी भेट घेउन या विषयाला निर्देशनास आणून दिले आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याशी सुद्धा भेट घेउन लाभार्थ्याना निधी मंजूर करण्याकरीता विनंती केले होती.आमदार विनोद अग्रवाल यांनी शासनास्तरावर वेळेवर वेळेवर पाठपुरावा करुन राज्यात सर्वात जास्त गोंदिया जिल्ह्यासाठी ४१०८९ प्रपत्र ब यादी चे घरकुल मंजूर करून आणले. त्यात गोंदिया तालुक्यातील १३ हजार लाभार्थ्याना २०२०-२१ मध्ये लाभ देण्यात आले. शासनाच्या प्रत्येक योजेनेचा लाभ प्रत्येक गरजूंना मिळावे व नेहमी जनतेपर्यंत लाभ पहोचवण्यासाठी मी जनतेच्या पाठी राहून त्यांना लाभ मिळण्याकरीता नेहमी प्रयत्न करणार असे ते पंचायत समीती मध्ये ‘प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत’ लाभार्थ्यांसाठी घरकुल बांधण्यात येतं. या घरांचं ‘डेमो च्या उद्घाटन करता वेळी बोलले. तसेच म्हणाले की मी राजकीय जीवनाची शुरुवात सुद्धा जनहिताच्या कामे करता केली. व जनतेच्या ह्रुदयात आपली वेगळी ओळखी बनवून जनतेच्या भरपूर स्नेह व आशीर्वादामुळे मी अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो. निवडून आल्यानंतर मी आकारलेल्या निवडणुक पूर्वी केलेले आश्वासने पूर्ण करण्यासाठी शासनास्तरावर भेट घेउन निरंतर पाठपुरावा करून जनतेची समस्या मार्गी लावण्याचे कार्य केले व आता सुद्धा करीत आहो असे ही ते म्हणाले. उदघाटनाच्या कार्यक्रमावेळी बीडीओ, पंचायत समितिचे सर्व अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते इत्यादि उपस्थित होते.
*आवास योजनेच्या लाभार्थ्याना ५ ब्रास मोफत रेती ही उपलब्ध करून दिली
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरकूल मंजूर करण्यात आले आहे. मात्र, वाळू उपलब्ध होत नसल्याने घरकूलाचे बांधकाम मंद गतीने होत होते. एवढेच नव्हेतर न परवडणार्या किंमतीमध्ये रेती उपलब्ध होत नसल्याने लाभार्थी अडचणीत येवू लागले आहेत. त्यातल्यात्यात राज्य शासनाने घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रास रेतीची सवलत दिली आहे. मात्र, ती रेती देखील दूरच्या घाटातून आणणे न परवडणारे आहे. हे आ.विनोद अग्रवाल यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निदर्शनास आणून दिले होते. दरम्यान महसूल विभागाने गृह निर्माण प्रयोजनासाठी ५ ब्रास रेती पर्यावरणाच्या नियमांच्या अधिन राहून स्थानिक तहसीलदाराच्या परवानगीने नजिकच्या घाटातून रेती उपसा करता येईल, असे आदेश दिले आहे. यामुळे जिल्ह्यातील घरकूल लाभार्थ्यांना मोठा दिलासा देण्याचे काम आमदार विनोद अग्रवाल यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जनतेला दिले होते.त्यासाठी सर्व नागरिकांनी आमदार विनोद अग्रवाल यांचे आभार व्यक्त केले होते.