केंद्र पुरस्कृत आवास योजनेत गोंदिया प्रथम

0
52

• उत्कृष्ट तालुके व ग्रामपंचायतींना मिळणार पुरस्कार

• महाआवास अभियानांतर्गत विभागीय पुरस्काराचे सोमवारी वितरण

गोंदिया,दि.27 : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरीसाठी दिल्या जाणारा महाआवास अभियान-ग्रामीण अंतर्गत विभागीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरीबद्दलचा गौरव समारंभ सोमवार, दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
महाआवास अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल ‍जिल्हे, तालुके तसेच उत्कृष्ट ग्रामपंचायतींना विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देवून गौरविण्यात येणार आहे.
महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत विभागीय स्तरामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा प्रथम पुरस्कार गोंदिया जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. तसेच द्वितीय पुरस्कार भंडारा जिल्हा तर तृतीय पुरस्कारासाठी वर्धा जिल्ह्याची निवड झाली आहे.उत्कृष्ट तालुक्यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय तालुका म्हणून गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, गोंदिया व तिरोडा पंचायत समितीला अनुक्रमे पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यासोबतच  उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून गोंदिया जिल्ह्यातील तळेगाव, द्वितीय कोरंबी तसेच केशोरी या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांची निवड झाली आहे. तृतीय पुरस्कार वर्धा ‍जिल्ह्यातील झंझाडा ग्रामप्रचायतीची निवड झाली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी कर्ज देणारी वित्तीय संस्था म्हणून वर्धा  जिल्ह्याची नारी शक्ती प्रभात संघ सिंधीविहिरी (कारंजा), द्वितीय भंडारा जिल्ह्यातील बँक ऑफ इंडिया आंधळगाव तर तृतीय वर्धा जिल्ह्यातील हिरकणी प्रभाग संघ अंदोरी (देवळी) तसेच जागा व वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी प्रथम वरोरा तालुका, द्वितीय कामठी तालुका तर तृतीय भद्रावती तालुक्याचा समावेश आहे.

राज्य पुरस्कृत आवास योजनेत वर्धा प्रथम

राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये सर्वोकृष्ट जिल्हा म्हणून वर्धा जिल्ह्याची निवड झाली आहे. द्वितीय क्रमांक भंडारा जिल्ह्याला तर तृतीय क्रमांक चंद्रपूर जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. उत्कृष्ट तालुक्यामध्ये प्रथम सडक अर्जुनी (गोंदिया), द्वितीय लाखांदूर, तृतीय पवनी पंचायत समिती जिल्हा भंडारा यांची निवड झाली आहे.
उत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत बोरगाव (चंद्रपूर),द्वितीय दिघोरी (भंडारा) तर तृतीय सानगांव (साकोली) व ग्रामपंचायत चिचूर (कुही) नागपूर जिल्ह्याची निवड झाली आहे. बांधकामासाठी कर्ज  देणारी
उत्कृष्ट वित्तीय संस्था म्हणून प्रथम वर्धा जिल्ह्यातील समानता प्रभाग संघ समुद्रपूर, द्वितीय परिवर्तन प्रभाग संघ सेलू तर तृतीय  सार्थक प्रभाग संघ वायफळ या वर्धा जिल्ह्यातील तीनही संस्थांचा या पुरस्कारामध्ये समावेश आहे.