जागतिक पर्यावरण दिन समारंभ
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, वर्धाचा उपक्रम
वर्धा, दि. 6 – निसर्गाची हानी म्हणजे मानवी संस्कृतीची हानी आहे, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने पर्यत्न करून निसर्गाची काळजी घेतली, तरच भविष्यात मानवी संस्कृतीचे संरक्षण होऊ शकेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आज येथे केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, वर्धा, आणि जैव प्रसंस्करण एवंम जडीबुटी विभाग महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थान (सुष्म, लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने मगनवाडी येथील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थानच्या सभागृहात आयोजित केलेल्या दोन दिवसीय पर्यावरण दिन जनजागृती विशेष प्रचार अभियान कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
याप्रसंगी मंचावर महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थानचे कार्यालय प्रमुख तथा उपसंचालक रविकुमार कंडास्वामी, महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली कुचेवार, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी देशभ्रतार म्हणाल्या की, आपण काही वाईट काम केले तर आपले वाईट होते, अशी भारतीय संस्कृतीत एक धारणा आहे. त्याचप्रमाणे मानवाने अंगीकृत केलेली चुकीची कृती पर्यावरणाचा समतोल ढासळण्यासाठी कारणीभुत ठरत आहे. याची परतफेड निसर्गात होणा-या ब-याच बदलांच्या माध्यमातून मानवाला अनुभवता येत आहे. जसे की उन, वारा, पाऊस याच्या रौद्ररूपाच्या रूपात मोठ्या प्रमाणावर हानीचा सामना आपल्याला करावा लागतो. निसर्गाची हानी झाल्यामुळे समुद्र किनारी प्रदेशात राहणारे बरेच देश लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, यातून बोध घेऊन आत्ताच आपल्याला सावरण्याची गरज आहे. आपला शेतकरी जसा पावसावर अवलंबून आहे, तसेच व्यापारी हे सुध्दा शेतक-यांनी केलेल्या उत्पादनावर अवलंबून असतता. प्रत्येक व्यक्ती हा निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणाची सामुहिक जबाबदारी सर्वांवर आहे. सर्वांनी पर्यावरण व निसर्गाच्या रक्षणासाठी पुढे येऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉ. कुचेवार म्हणाल्या की, निसर्ग जे देतो, तेच आपल्याजवळ आहे, त्यामुळे निसर्गाला आपणही दिले पाहिजे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण पुढाकार घेऊन त्याची सुरूवात स्वतः पासून करावी, असे आवाहन केले.
प्रास्ताविकात हंसराज राऊत म्हणाले की, आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपला सांभाळ ही पृथ्वी व पर्यावरण करीत आहे. सध्या आपल्याला निसर्गाकडून अनेक गोष्टी मोफत मिळत आहेत, त्यामुळे पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी उचलून निर्सगाची परतफेड करण्याची संधी आपल्या जवळ आहे. सर्वांनी याबाबत गांर्भियाने विचार करून प्रत्येकांने स्वतःपासून सुरूवात करून किमान एका वृक्षाची लागवड करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्री. रविकुमार म्हणाले की, जशी आपल्याला औद्योगिकीकरणाची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणाचीही आवश्यकता आहे. निसर्गपुरक वस्तुंच्या निर्मितीवर भर देऊन पर्यावरणाचा समतोल टिकविण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी रंगधुन कला मंच नागपूरच्या समीर दंदारे व त्यांच्या चमुने पर्यावरण या विषयावर पथनाट्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
संचालन जैव प्रसंस्करण एवंम जडीबुटी विभागाचे सह समन्वयक डॉ. जयकिशोर छांगाणी यांनी केले. तर आभार वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. अपराजिता वर्धन यांनी केले. दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात वक्तृत्व, चित्रकला व रांगोळी स्पर्धेचा समावेश आहे. या स्पर्धांमध्ये महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय, जी. एस. कॉलेज, जे.बी. सायन्स कॉलेज, बजाज कॉलेज, अग्रग्रामी कॉन्व्हेंट, लोक महाविद्यालय यामधील सुमारे ५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, वर्धाचे संजय तिवारी, संतोष यादव, महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थानच्या डॉ. छांगाणी, डॉ. अपराजिता, मोहन कापसे, विनस तुप्टे, निकीता, रवि खाडे, डिंकेश ढोले यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.
बक्षीस विजेत्यांची नावे खालील प्रमाणे आहे
वक्तृत्व स्पर्धा
प्रथम बक्षीस – हरविंदरसिंग बावरी
द्वितीय बक्षीस – अनिरूध्द घुले
तृतीय बक्षीस – सायली मानकर
चतुर्थ बक्षीस – भक्ती छांगाणी
पाचवे बक्षीस – उत्तम पाटील
सहावे बक्षीस – पुर्वा जमनारे
चित्रकला स्पर्धा
प्रथम बक्षीस – भक्ती छांगाणी
द्वितीय बक्षीस – वैदेही वंजारी
तृतीय बक्षीस – सायली मानकर
चतुर्थ बक्षीस – प्राज्योती कुबडे
पाचवे बक्षीस – नैतीक वर्मा
सहावे बक्षीस – पुर्वा वाढनकर
रांगोळी स्पर्धा
प्रथम बक्षीस – श्वेता अंबुलकर
द्वितीय बक्षीस – निलाश्री देशमुख
तृतीय बक्षीस – शिवानी देठे
चतुर्थ बक्षीस – पायल चाफले
पाचवे बक्षीस – दर्शना बडे
सहावे बक्षीस – करिष्मा गुप्ता