सारसमित्र आढावा बैठक व कार्यशाळेला 50 सारसमित्रांची हजेरी

0
24

सेवा संस्थेमार्फत आयोजित कार्यशाळेला गोंदिया, तिरोडा, आमगाव तालुक्यातून प्रतिसाद

गोंदिया,दि.01ः-जिल्ह्यातील सेवा संस्थेकडून सारस पक्षी संवर्धनाच्या विषयावर येथील विश्रामगृहात आयोजित सारसमित्रांच्या आढावा बैठक व कार्यशाळेला जिल्ह्यातील 50 सारसमित्रांनी हजेरी लावत माहिती जाणून घेतली.महाराष्ट्रात शेवटचे सारस पक्षी गोंदिया व भंडारा जिल्हात संकटग्रस्त स्थितीत असून त्यांच्या संवर्धनासाठी काय उपाययोजना करायला हवे.तसेच नद्यांचे पात्र, धानशेत, पाणथळ अधिवास(तलाव) हे सारस पक्षीचे अधिवास क्षेत्र असल्याने त्यांची निगा राखण्यासंबधी या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. सारस पक्षीच्या संरक्षण व संवर्धनाकरिता स्थानिक सेवा संस्था, स्थानिक शेतकरी व स्वयंसेवीसोबत कार्य करीत आहेत. शासकीय यंत्रणा व स्थानिक पातळीवर कार्य करणारी लोक सोबत आल्यावरच खऱ्या अर्थाने संवर्धनाची कार्ये प्रभावी पणे राबवु शकतो असा सूर या कार्यशाळेतून निघाला.

मागील आठवड्यात कामठा परिसरात दोन वयस्क सारस पक्षी विद्युत तारांच्या स्पर्शाने मृत्युमुखी पडले. तसेच दासगाव-डांगुर्ल्ली जवळ एक ह्या वर्षी जन्मलेला निम्नवयस्क सारस विषबाधेने अस्वस्थ स्थितीत मिळाला. त्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहेत. आधीच सारस पक्ष्यांची संख्या संकटग्रस्त स्थितीत आहे व त्यावर ह्या अनैसर्गिक घटनांमुळे सारस वर धोका निर्माण झाला आले. ह्यावर प्रभावी पद्धतीने मिशनमोडवर कार्य झाले नाही तर येणाऱ्या वर्षात सारस. चे माळढोक व्हायला वेळ लागणार नाही,अशी भिती व्यक्त करण्यात आली.

कार्यशाळेत सारस पक्षींची पावसाळ्यात होणारी घरटीशोधून त्यावर सनियंत्रण / नजर ठेवून संरक्षण करणे.गावपातळीवर शाळा, महाविद्यालयात जास्तीत जास्त जनजागृती करणे.सारस पक्षींचे जास्त आवागमन असलेल्या क्षेत्रातून विद्युत तारांचे लाईन जात असल्यास त्याची ओळख करून संबधित विभाग व जिल्हा सारस संवर्धन समिती पर्यंत माहिती पाठविणे.बंदी असलेले घातक कीटकनाशके वापर होत असल्यास किंवा अवैध पद्धतीने दुकानदार विक्री करीत असल्यात त्याची माहिती कृषी विभाग, सेवा संस्था किंवा सारस संवर्धन समितीला देणे.सारस पक्षींचे अधिवास क्षेत्र असलेले तलाव/ बोडी यांची माहिती संकलन करून सदर पाणथळ क्षेत्रांचे/ तलाव-बोडीची संरक्षण व संवर्धनाची कार्ये करणे.स्थानिक लोकांचा सारस पक्षींच्या संवर्धनात जास्तीत जास्त सहभाग कसा मिळवता येईल यावर कार्य करणे, असे अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.तसेच न्यायालयाने स्वताहून सु.मोटो. याचिका दाखल करून घेतल्यावर प्रशासन यंत्रणा पण आता सक्रीय होऊन कार्य करू इच्छीते असे सांगण्यात आले.

प्रशासनाचा मनापासून सहभाग घेऊन कार्य करणे गरजेचे       

न्यायालयाने विविध प्रशासकीय विभागांना सम्मेलीत करून जवाबदारया निश्चित केल्या आहेत तरी फक्त न्यायालयीन निर्णय/ दंडा समजून कार्य न करता मनापासून स्थानिकपातळीवर आधीपासून कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व लोकांसोबत मिळून कार्य केल्यास यश मिळणे संभव आहे नाहीतर श्रेय राजकारण मध्ये अडकलेल्या सारस पक्षीचे संरक्षण व संवर्धन फक्त एखादी शासकीय योजना बनून राहील.

सेवा संस्थेचे पुढाकार व कार्ये

सेवा संस्था मागील काही दशकापासून सारस पक्षी संरक्षणाकरिता कार्य करीत आहे. सेवा संस्थेचे पदाधिकारी संस्था अस्तित्वात यायच्या आधीपासून सन 2005 पासून कार्य करीत आहेत. सेवा संस्था स्थानिक शेतकरी व स्वयंसेवीच्या माध्यमातून कार्य करीत आहे ज्यावर प्रशासकीय यंत्रणांचा सहयोग मिळतो किंवा नाही मिळत तरी निरंतर कार्य करण्याचे संकल्प संस्थेचे आहे. विशेषतः कोणत्याही शासकीय निधी न घेता आजपर्यंत संस्था स्वतःच्या पातळीवर कार्य करीत आहे.

2022 ह्यावर्षी जिल्हात फक्त 3 घरटे मिळाले

2022 च्या सारस पक्षी गणनेत गोंदिया जिल्हात 34 सारस पक्ष्यांची नोंद झाली आहे. पावसाळा सारस पक्षीचा विणीचा हंगाम असतो. ह्या वर्षीच्या हंगामात फक्त 3 सारस पक्ष्यांची घरटे मिळाली हि एक चिंतेची बाब आहे. मागील वर्षी 2021 मध्ये 6 घरटी, 2020 वर्षी 7 घरटी होती. सारस पक्षींच्या घरटी बनवण्याकरिता लागणारे अधिवास कमी होणे व चोरट्यांनी अंडी पळवून नेणे हे सर्वात चिंतेचा विषय आहे.

या कार्यशाळेला सावन बहेकार अध्यक्ष सेवा संस्था,अविजित परिहार सारस प्रकल्प प्रभारी, शशांक लाडेकर, चेतन जसानी, कन्हैया उदापुरे, पूजा मोटघरे,रुपेश निम्बार्ते, विक्की शहारे, संजय भांडारकर, पवन सोयाम, बंटी शर्मा, नदीम खान,जिल्हातील सारस मित्रांपैकी अनिरुद्ध तांडेकर, हंसपाल बहेकार, ओमप्रकाश भक्तवर्ती, राहुल भावे, रतिराम क्षीरसागर, योगेश पाथोडे, गोवर्धन चौधरी, कमलेश कामडे, दानवीर मस्करे, शेरबहादूर कटरे, सुनील पटले, समीर बिसेन, संदिप तुरकर, रजत नागपुरे, सोमेश्वर कोल्हे, प्रेमलाल कोल्हे, भूपेंद्र बोपचे, योगेश बिसेन, पवन बनोटे, महेंद्र बघेले, जितेंद्र देशमुख, बबलु चुटे, कैलाश हेमने, मधुसूदन डोये, चंचल अंबुले, दिलीप चौधरी, ओमप्रकाश नखाते, भुवन डोये, कार्तिक उके, कमलेश गेडाम, इतेंद्र माहुले, परमेश्वर पारधी, नितीन बघेले, शिव भोयर, रवींद्र नागपुरे, कन्हैयालाल क्षीरसागर, अरुण निकुशे, राजेंद्र मेंढे आदी उपस्थित होते.