दि.4 व 5 एप्रिल दोन दिवस जिल्ह्याचा दौरा
दि. 5 एप्रिल रोजी गोंदिया व तिरोडा तालुक्यात देणार भेटी
गोंदिया –जिल्ह्यातुन हत्तीपाय रोगाबाबतची विकृती कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत दि.26 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान हत्तीरोग दुरीकरणासाठी सामुदायिक औषधोपचार मोहिम गोंदिया,तिरोडा ,गोरेगाव व अर्जुनी मोरगाव या चारही तालुक्यात राबवली जात आहे. मोहिमे दरम्यान भावी पिढिला हत्तीरोगापासुन मुक्ती मिळण्यासाठी आरोग्य विभाग अहोरात्र कामकाज करत आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,आशा सेविका,स्वयंसेवक ,नर्सिंग स्टाफ दिवस रात्र एक करुन लोकांना प्रत्यक्ष निशुल्क गोळ्या खावु घालण्यात व्यस्त आहे. राज्यस्तरिय,विभागीय,जिल्हास्
दि.4 व 5 एप्रिल रोजी भारत सरकार केंद्रीय चमुचे डॉ.अलोने व डॉ.सिन्हा यांचा गोंदिया दौरा होत असुन आज दि. 4 एप्रिल रोजी केंद्रीय चमुने मोरगाव अर्जुनी तालुक्यातील कोरंभीटोला प्राथमिक आरोग्य केंद्र व ईटखेडा गावात तसेच गोरेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडा व तुमखेडा गावाचा दौरा करुन जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत राबविण्यात येणारी हत्तीरोग दुरीकरणासाठी सामुदायिक औषधोपचार मोहिमेच्या होत असलेल्या कामकाजाची पाहणी केली.त्यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण,मोरगाव अर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुकन्या कांबळे, वैद्यकिय अधिकारी डॉ.बारसागडे, डॉ.विजय राऊत, डॉ.विकास विंचुरकर, सहसंचालक पुणे कार्यालयाचे दादा जांभळे यांचे सह आरोग्य विभाग व हिवताप विभागाचे सर्व स्टॉप व ईतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ.अलोने व डॉ.सिन्हा यांनी हत्तीरोग दुरीकरणासाठी सामुदायिक औषधोपचार मोहिम सुक्ष्मकृती आराखडा नुसार प्रभावीपणे राबविणे, कार्यक्षेत्रातील गावांमध्ये शाळा, कॉलेज, महाविद्यालय, बॅंक, सोसायटी, अंगणवाडी, शासकिय कार्यालय, आश्रमशाळा, आरोग्य संस्थेत ई.ठिकाणी बुथाचे आयोजन करण्यात यावे, गृहभेटीच्या माध्यमातुन आरोग्य कर्मचारी यांनी लाभार्थ्यांना वयोमानानुसार डि.ई.सी.व अल्बेंडाझॉल गोळ्यांची मात्रा प्रत्यक्ष खावु घालण्यात यावे. आरोग्य पर्यवेक्षक यांचे मार्फत दैनंदिन पर्यवेक्षण करण्यात यावे,एमडीए कार्यक्रमाची जनजागृती चांगल्या प्रकारे करण्यात यावी अशा विविध बाबी अंमलबजावणी करण्याच्या सुचना यावेळी करण्यात आल्या.
यानंतर डॉ.अलोने व डॉ.सिन्हा यांनी ईटखेडा व तुमखेडा या दोन्ही गावांमधील काही निवडक घरांना भेटी देवुन कुटुंबातील सदस्यांची हितगुज संवाद साधुन प्रत्यक्ष गोळ्या खाण्यात येतात कि नाही याची पडताळणी केली.तसेच त्या नंतर होणार्या त्रासाबाबत चर्चा केली,बोटाला लावण्यात येणारी मार्किंगची शहानिशी केली.
आपल्या भावी पिढिला हत्तीपाय या आजारापासुन वाचविण्यासाठी सर्व पात्र लोकांनी गोळ्यांचे सेवन करण्यात यावे.गोळ्या या सुरक्षित असून लोकांनी कुठलाही गैरसमज किंवा संकोच न बाळगता लोकांनी गोळ्या खाण्याचे आवाहन केंद्रीय चमु मार्फत याप्रसंगी लोकांना केले आहे. हत्तीरोग पिडीत व्यक्तिशी वार्तालप केला. तसेच मोहिमे संबधाने गोळ्या न खाण्यार्या लाभार्थ्यांशी समुपदेशन करुन त्यांचे मत परिवर्तन करुन हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्या खाऊ घातल्या.
एकदा हत्तीरोग बळावल्यावर उपाय नाही तेव्हा हत्तीरोग होऊ नये, म्हणून डी.ई.सी.व अल्बेंडाझॉल गोळ्यांची फक्त एक मात्रा वर्षातून एकदा सलग पाच वर्षे घेतल्यास हत्तीरोग होत नाही. त्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार होणे थांबतो. पर्यायाने आपण स्वतः व भावी पिढी हत्तीरोगापासून मुक्त करु शकतो.एक दिवशीय उपचार मोहिम यशस्वी करण्याच्या दृष्टीने व समाजात नविन रोगी होऊ नये याबाबत नागरीकांनी सहभाग द्यावा व गोळयांचे सेवन करावे.
– डॉ.सिन्हा, वरिष्ठ निर्देशक, भारत सरकार
हत्तीरोग झाल्यावर त्यावर कोणताही परिणामकारक उपाय नाही. त्यामुळे हत्तीरोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सामुदायिक औषधोपचार मोहिमेदरम्यान डी.ई.सी. व अल्बेंडाझॉल गोळ्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. डी.ई.सी. व अल्बेंडाझॉल गोळ्या खाल्ल्यामुळेच हत्तीरोगास प्रतिबंध होऊ शकतो. घरी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसमोरच गोळ्यांचे सेवन करावे. हत्तीरोग जीवघेणा आजार नसला तरी शरिराला विकृती निर्माण करुन कायमचे अपंगत्व होणारा आजार आहे.