35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ 23 मंडळात अतिवृष्टी भंडारा जिल्हाधिकारी ऑन फील्ड

23 मंडळात अतिवृष्टी भंडारा जिल्हाधिकारी ऑन फील्ड

0
777

blank

भंडारा दि. 20 : जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने  जिल्ह्यातील 23 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे.मात्र पावसाने थोडी विश्रांती घेताच  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भंडारा, पवनी आणि लाखांदूर या भागाला भेट देऊन पाहणी केली.

काही गावांमध्ये प्रशासनाने  नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. सकाळीच खात रोड येथील पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्यासह पाहणी केली. त्यानंतर पवनी  आणि लाखांदूर येथे देखील त्यांनी दौरा केला . यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, पवनी तहसीलदार श्री. सोनोने, लाखांदूर तहसीलदार वैभव पवार व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यावेळेस उपस्थित होते.

पावसामुळे घर किंवा मालमत्तेचे नुकसान झाले झाले असल्यास तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले. तसेच नागरिकांना आवश्यकतेनुसार औषध सुविधा आणि निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्याची निर्देश ही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी  गाव पातळीवरील यंत्रणेने दक्ष राहावे. पूर परिस्थिती व प्रशासनाशी समन्वय करून वेळोवेळी माहिती देऊन नागरिकांना मदत करण्याचे ही त्यांनी निर्देश दिले.

भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. बिज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी, पाऊस व विज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.

नागरीकांनी जल पर्यटन स्थळी अती उत्साही होवून जीव धोक्यात घालणारी कुठलीही कृती करू नये, शक्यतो पाण्यामध्ये उतरण्याचे धाडस करू नये. आपण कितीही चांगले जलतरणपट्टू असले तरी देखील अशा ठिकाणी पोहण्याचे टाळावे. नदी, नाले, दुघळी वाहत असतात तेव्हा पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असते अशा वेळी चुकूनही तो पुल किंवा रस्ता चालत किंवा गाडी मधुन ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. आवश्यक खबरदारी घेवून स्वतःचो त्याच प्रमाणे आपल्या कुटूंबियांची व मित्र परिवाराची अशा ठिकाणी आवश्यक काळजी घ्यावी व प्रशासनाकडून निर्गमित होत असलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.जिल्ह्यातील समस्त नागरिकांना व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावं व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे.

blank