चंद्रपूर मनपा निवडणूक मतपत्रिकेद्वारे घ्यावी

0
15

चंद्रपूर, दि.१८(berartimes.com) : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड असल्याचा आरोप राष्ट्रीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्रातील एप्रिल २०१७ मध्ये होणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक ईव्हीएम मशीनद्वारे न घेता मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी निवडणूक आयोगाला दिेलेल्या निवेदनातून केली आहे.
महाराष्ट्रातील नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकेच्या निवडणुकाबरोबरच पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुकामध्ये ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात आला. तर गोव्यामध्ये ईव्हीएम मशीनसोबत वीवीपीएटीचा वापर करण्यात आला. मात्र उत्तरप्रदेश व उत्तरांचल प्रदेशातील निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ईव्हीएमद्वारे मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात गडबडी असल्याचा आरोप केला. गोव्यामध्ये मतदान करताना आपले मत कोणाला दिले हे स्क्रीनवर दिसत होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला १३ जागा मिळविता आल्या. मात्र उत्तर प्रदेश व उत्तरांचल प्रदेशामधील निकाल अनपेक्षीत असल्यामुळे लोकांचा विश्वास डगमगला आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनबाबत लोकांचा विश्वास डगमगला आहे. त्यामुळे एप्रिल २०१७ मध्ये होणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक ईव्हीएम मशीनद्वारे न घेता मतपत्रिकेद्वारे घेण्याची मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ईव्हीएम बचाव लोकशाही आघाडीसह विविध पक्ष तसेच विविध संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी देण्यात आले.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रिपब्लिकन संघर्ष समितीचे अंकुश वाघमारे, माजी नगरसेवक अशोक रामटेके, महाराष्ट्र आॅफीसर्स फोरमचे शंकरराव सांगोरे, धृव करमरकर, बसपाचे जिल्हा सचिव राजू देवगडे, जितेंद्र डोहणे, संजय कन्नावार, राष्ट्रवादी सामाजिक न्यायचे अध्यक्ष महेंद्र लोखंडे, शिवराज्य पक्षाचे रामकुमार अवकापल्ली आदी उपस्थित होते.