कृषिपंपाना 12 तास वीजपुरवठा करा-आ.रहागंडाले

0
13

तिरोडा,दि.18ः- गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकरी हे धान उत्पादक शेतकरी असून शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी कृषिपंपाना 12 तास वीज पुरवठा करण्याची मागणी तिरोडा-गोरेगावचे आमदार विजय रहागंडाले यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत निवेदनातून केली आहे.जिल्ह्यात सध्या पाऊस न आल्याने शेतकरी तलाव आणि विंधनविहिरीतून शेती करीत आहेत.परंतु विज वितरण कंपनी 24 तास भारनियमन करीत असल्याने शेतकर्यासमोर अडचणी निर्माण झालेल्या आहेत.त्यामुळे 12 तास वीज पुरवठा करुन शेतकरी वर्गाला सहकार्य करण्याची मागणी केली.त्यावर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी विभागाचे सचिव संजिवकुमार यांच्याकडे पत्र पाठवित गोंदिया,गडचिरोली,भंडारा जिल्ह्यात कृषी पंपाला 12 तास वीज पुरवठा करण्यासंबधीचा प्रस्ताव सादर करण्याचे लेखी निर्देश दिले आहेत.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पाऊस उशिरा आल्यामुळे धानाची पेरणी उशिरा झाली आहे. धान पेरणी होऊन २0 ते २५ दिवस झाले असून, पाऊस पाहिजे तिकका झाला नाही. त्यामुळे रोवणी खोळंबली आहे. ज्या शेतकर्‍यांकडे विहिरीचे पाणी उपलब्ध आहे त्यांना २४ तास विद्युतपुरवठा केल्या जा नाही. ८ तास पुरवठा होत असल्याने त्यांची रोवणी अडकली आहे.  काही ठिकाणी धानाचे रोप करण्यास सुरुवात झाली. उकाड्यामुळे रोगराईचे प्रादुर्भावसुद्धा वाढला आहे. उशिरा रोवणी झाल्यास उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात घट येणार आहे. हलक्या धानाच्या रोवणीसाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे कृषीपंपाना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.