34.8 C
Gondiā
Thursday, May 15, 2025
Home Blog Page 7

कामचुकार कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई-जि.प.अध्यक्ष भेंडारकर

0

सडक अर्जुनी,दि.१०ः  जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. एवढेच नव्हे तर हे सर्व करीत असताना डिजिटल शिक्षण सुविधा करणे सुद्धा आवश्यक आहे. सोबतच घरकुल बांधकामाचे जे सर्वेचे काम सुरू आहे ते १५ मे पर्यंत योग्य पद्धतीने झाले शिवाय तालुक्यातील इतर समस्या मार्गी लावण्याचे निर्देश जि. प. अध्यक्ष लायकराम भेडारकर यांनी दिले. स्थानिक पंचायत समिती येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्व विभागांचा आढावा घेवुन कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, असे संकेतही अध्यक्षांनी दिले.
पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेल्या व प्रस्तावित विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी ९ मे रोजी बैठक पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.बैठकीला प्रामुख्याने समाज कल्याण सभापती रजनी कुंभरे, पं.स. सभापती चेतन वडगाये, उपसभापती निशा काशिवार, जि. प. सदस्य डॉ. भुमेश्वरजी पटले, पंचायत समिती सदस्य चंद्रकलाताई डोंगरवार,संगीताताई खोब्रागडे,शालिंदरजी कापगते, डॉ. रुकीराम वाढई, वर्षा शहारे, सपना नाईक, शिवाजी गहाणे, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष हर्ष मोदी,मनरेगा गटविकास अधिकारी लोहबरे,सहा.गटविकास अधिकारी खोटेले, गटविकास अधिकारी रविकांत सानप यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आढावा बैठकीच्या प्रसंगी विविध विभागांचा आढावा घेत असताना ते बोलत होते. यावेळी उपस्थित ग्रामसेवक व कर्मचारी विविध विभागांचे अधिकारी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत शिक्षण, पाणी, महिला सक्षमीकरण, गृहनिर्माण, जलसंधारण आणि रोजगार निर्मिती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी, विहिरीचे पुनर्भरण, जलसंधारण प्रकल्प, तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा या उपाययोजनांवर भर देण्यात आला. लोकसहभागातून जलव्यवस्थापन न करण्यावरही करण्यावरही चर्चा झाली. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत अनेक गावातील कामे अपूर्ण असल्याने यातील
काही काम चुकार लोकांवर सुद्धा आपण योग्य ती कारवाई केली असल्याचे सांगण्यात आले. बैठकीमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची घटती संख्या ही चिंतेची बाब म्हणून मांडण्यात आली. या पार्श्वभूमीवर शिक्षकांची नियमित उपस्थिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांना आकर्षक उपक्रम व प्रोत्साहन, शालेय सुविधा आणि पोषण आहार या बाबींवर भर देण्याचे निर्देश देण्यात आले.

शेतकऱ्यांना जलद न्यायासाठी “सस्ती अदालत” प्रभावी

0
परभणीत ५ प्रकरणांमध्ये सामंजस्य
परभणी,दि.10 : अतिक्रमणमुक्त पाणंद व शेतरस्ते या विषयांवर शेतकऱ्यांना तात्काळ आणि सोपा न्याय मिळावा यासाठी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी १६ एप्रिल २०२५ रोजी परिपत्रक व २ मे २०२५ रोजी पत्रक जारी करून दर पंधरा दिवसांनी “सस्ती अदालत” आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार तहसील कार्यालय, परभणी येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत “सस्ती अदालत” संपन्न झाली.
या सस्ती अदालतीत उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, व नायब तहसीलदार (महसूल १)मधुकर क्षीरसागर यांच्या उपस्थितीत एकूण ११ प्रकरणांवर सुनावणी झाली. यापैकी ५ प्रकरणे समुपदेशन व सामंजस्याच्या माध्यमातून मार्गी लावण्यात यश आले, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली. मात्र, उर्वरित प्रकरणांमध्ये संबंधित पक्षकार अनुपस्थित असल्याने त्यावर तत्काळ कार्यवाही होऊ शकली नाही.
या उर्वरित प्रकरणांची सुनावणी येत्या २३ मे २०२५ रोजी नियोजित सस्ती अदालतीत करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांनी दिली.
सदर अदालतीस मंडळ अधिकारी नंदकिशोर सोनवणे, विकास आगलावे, एन.आर. सोडगीर, संचिन शिंदे, उद्धव सरोदे व ज्योती अढागळे यांची उपस्थिती होती. तसेच एकूण ५७ शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.
“सस्ती अदालत” उपक्रमामुळे शेतकऱ्यांना थेट प्रशासनाच्या माध्यमातून न्याय मिळण्याचा मार्ग सुकर झाला असून, यामुळे ग्रामस्तरावरच्या शेतविवादांवर सामंजस्याने तोडगा निघण्याची शक्यता वाढली आहे.

त्या राईस मिलर्सकडून खंडणी मागणारे ते पत्रकार कोण ?

0

गोंदिया: सीएमआर त्या तांदुळ पुरवठ्यात मोठा घोटाळा झाला यात तुमचा सहभाग आहे,अशी धमकीवजा माहिती देत राईस मिलर्सच्या कर्मचाऱ्यांकडून काही पत्रकारांनी खंडणी मागितल्याचा आरोप राईस मिलर्स व व्यापारी वर्गाने केल्याने एकच खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हेतर राईस मिलर्सच्या महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तवणूक करण्यात आली. या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये चांगलेच असंतोष निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणाची तक्रार व्यापारी संघटनेच्या वतीने जिल्हा मार्केटिंग अधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे खंडणी मागणारे ते पत्रकार कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे. पोलिस विभाग या प्रकरणाची दखल घेवून त्या पत्रकारांना शोधन काढणार का? याकडेही लक्ष लागले आहे.
आधारभूत किंमतीमध्ये खरेदी केलेला धान राईस मिलर्सना भरडाईसाठी दिला जातो. त्या मोबदल्यात मिलर्स शासनाला सीएमआर तांदूळ पुरवठा करतात. मात्र काही मिलर्सकडून शासनाने ठरवून निकषान्वये सीएमआर तांदूळ पुरवठा करण्यात आला नाही. सीएमआर तांदूळामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच काही पत्रकारांनी या संधीचा लाभ घेत आमगाव येथील दोन राईस मिलर्सचे कार्यालय गाठले.
आज (ता. ९) दरम्यान तीन पत्रकार राईस मिलर्सच्या कार्यालयात पोचले व सीएमआर तांदळाचा मोठा घोटाळा आहे? अशी चौकशी केली. दरम्यान कार्यालयात बसलेल्या महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तवणूक करीत पैशाची मागणी केली. पैसे दिले नाही तर घोटाळ्याचे वृत्त प्रकाशित करू, असा धमकीवजा इशारा दिला. या प्रकारामुळे आमगाव तालुक्यातील व्यापाऱ्यांमध्ये चांगलाच असंतोष पसरला आहे. या प्रकाराची जिल्हा मार्केटिंग फेडरेशन तथा जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. खंडणी मागणारे ते पत्रकार कोण? असा शोध व्यापारी घेवू लागले आहेत. त्यामुळे या प्रकरणात पोलिस विभागाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

१०३६ शेतकर्‍यांचे १० कोटी २० लाख रुपये थकले

0
भंडारा : देशाच्या अन्नदात्याला आर्थिक संकटाने घेरले आहे. खरीप २०२४ मध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धानाची शेती करणार्‍या शेतकर्‍यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रांवर हमीभावाने (२,३०० रुपये प्रति क्विंटल) आपला माल विकला. पण, गेल्या १५ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंतच्या १ हजार ३६ शेतकर्‍यांचे तब्बल १० कोटी २० लाख ७६५० रुपये थकले आहेत. या थकबाकीमुळे (Paddy Farmers) शेतकरी हतबल झाले असून, ‘पैसे कोणाकडे मागायचे?’ हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
खरेदी केंद्र सुरू होण्यास आधीच उशीर झाला. त्यात ऑनलाईन प्रक्रियेच्या जंजाळात शेतकर्‍यांना मनस्ताप सहन करावा लागला. धानाचे मोजमाप झाले, पण पैसे खात्यात जमा होण्याची वाट पाहत शेतकर्‍यांच्या आशा पाण्यात गेल्या. शासनाचे उदासीन धोरण शेतकर्‍यांना डिवचत असल्याची भावना वाढत आहे. ‘पैसे तातडीने मिळतील,’ या आशेने धान विकणार्‍या (Paddy Farmers) शेतकर्‍यांना आता आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे.
कृषिप्रधान देशात शेतकर्‍यांवर अन्याय होत असल्याची खंत व्यक्त होत आहे. देशाची अर्थव्यवस्था शेतकर्‍यांच्या कष्टावर उभी असताना, त्यांच्याच हातात पैसा नाही. ऑनलाईन प्रक्रियेच्या नावाखाली खरेदी केंद्रांवर शेतकर्‍यांना ताटकळत ठेवले जात आहे. (Paddy Farmers) थकबाकीमुळे शेतकर्‍यांना पुन्हा खासगी सावकारांचा आधार घ्यावा लागण्याची भीती आहे. उदरनिर्वाहासाठी शेतकरी हताश झाले असून, त्यांच्यासमोर उपजिविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे.शेतकरी वर्गातून आता संतापाची लाट उसळत आहे. लोकप्रतिनिधींनी तातडीने पुढाकार घेऊन शासनाकडे पाठपुरावा करावा आणि अडकलेले १० कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावेत अशी मागणी जोर धरत आहे.
जिल्ह्यातील १ हजार ३६ शेतकर्‍यांचे १० कोटी २० लाख ७ हजार ६५० रुपयांची रक्कम थकीत आहे. शासनाकडून जमा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग झाली नाही. लवकरच ही रक्कम जमा करण्यात येईल.
-एस.बी.चंद्रे, जिल्हा पणन अधिकारी, भंडारा

खरीप हंगामपूर्व जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा विक्रेत्यांची कार्यशाळा

0

गोंदिया, दि.9 : खरीप हंगामपूर्व जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा विक्रेते व कृषि निविष्ठा उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी यांची कार्यशाळा 7 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीचे सभागृहात पार पडली. कार्यशाळचे अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषि आयुक्तालयाचे कृषि अधिकारी शाहुराव मोरे उपस्थित होते.

        यावेळी शाहुराव मोरे यांनी खरीप हंगामातील खताचे संतुलीत वापर, माती परिक्षणाचे महत्व, धान बियाणेवरील बीज प्रक्रिया, किडरोग व्यवस्थापन व गुणवत्तेच्या निकषावर बियाण्यांची निवड या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच अनाधिकृत व बनावट खत विक्री टाळावी, खतासोबतची लिंकींग न करण्याबाबत व शेतकऱ्यांना प्रमाणित असलेले कृषि निविष्ठा पुरविण्याबाबत सूचना दिल्या.

        महाबीजचे प्रतिनिधी सुभाष मेश्राम यांनी साथी पोर्टल विषयी सखोल माहिती दिली. या पोर्टलच्या माध्यमातून बियाणे वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक कशी होईल याबद्दल मार्गदर्शन केले. सेवासंस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी सारस पक्षी संवर्धन व संरक्षण याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे यांनी अनुदानीत खतासोबत इतर दुय्यम खते लिंकींग न करण्याबाबत उपस्थित सर्व खत उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींना सक्त सूचना दिल्या. तसेच पॉस मशिन साठा व प्रत्यक्ष साठा यांचे ताळमेळ ठेवणे, विहित नमुन्यात दस्ताऐवज जतन करुन शेतकऱ्यांना देयके देणे व वाजवी दरात कृषि निविष्ठांची विक्री करण्याबाबत सर्व कृषि निविष्ठा विक्रेत्यांना सूचना दिल्या.

       यावेळी आरसीएफ कंपनीद्वारे प्रातिनिधिक स्वरुपात ई-पॉस मशिनचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक वाय.बी.बावनकर व मोहिम अधिकारी पी.डी.कुर्वे यांनी सदर कार्यशाळेचे यशस्वीपणे आयोजन केले.

कुऱ्हाडीने वार करीत पतीनेच केले पत्नीला ठार

0

गोंदिया :-जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अंभोरा गावात संशयावरुन पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करीत ठार केल्याची घटना ८ मे च्या रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.घटनेनंतर आरोपी सुनील मदन पटले(वय ३५)यांने स्वतःच पोलीस स्टेशन गाठत आत्मसमर्पण केले.या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील पटलेचा पत्नीच्या चारित्रावर संशय होता.याच कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद व्हायचे.८ मे रोजी रात्री उशिरा दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झाले, ज्यात सुनीलने रागाच्या भरात कुऱ्हाडने पत्नीवर हल्ला केला.या हल्ल्यात ती जागीच मरण पावली.

देवरी येथे तथागत बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूर्तीचे अनावरण येत्या सोमवारी

0

■ या निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन.

देवरी,दि.०८: बुध्द पोर्णिमेच्या पर्वावर देवरी येथील ऊरूवेलावन बुध्द विहारात थाईलॅंड येथून बनवून आणलेल्या अष्ठधातूंच्या तथागत बुध्दांच्या मुर्ती व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पंचधातू मूर्तीचे अनावरण कार्यक्रमाचे आयोजन देवरी येथील वार्ड क्रं १३ येथे उरूवेला बुध्द विहार समिती च्या वतीने येत्या सोमवारी(दि.१२ मे ) रोजी सकाळी ९ वाजेपासून आयोजित करण्यात आले आहे. या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सकाळी ९ वाजता धम्म ध्वजारोहण, सामूहिक बुध्द वंदना,सकाळी १०.३० वाजे पासून लहान मुलांकरीता प्रश्न मंजुषा, दुपारी ४ वाजता तथागत बुध्द व डॉ. आंबेडकर यांच्या मुर्तीसह शांती कँडल रैली, सायंकाळी ६.३० वाजता दोन्ही मुर्तीचे विधीवत अनावण व परित्राणपाठ भन्ते भदंत संघधातु स्थवीर व मुलगंधकुटी बुध्द विहार देवरीचे पुज्य भन्ते परमपदा यांच्या हस्ते होणार आहे.
या प्रसंगी आयोजीत कार्यक्रमात सायंकाळी ७.३० वाजता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य के.सी. शहारे आणि प्रमुख आमंत्रीत देवरीचे नगराध्यक्ष संजू उईके, जि. प.सदस्य उषाताई शहारे, कल्पना वालोदे, कौशल्यायन महिला महाविद्यालयाचे संस्थापक चरणदास उंदिरवाडे आणि सामाजिक कार्यकर्ता नितेश वालोदे आदीची प्रामुख्याने उपस्थीती राहणार आहे. त्याचप्रमाणे रात्री ८.३० वाजता स्मृतीशेष रविकांता शहारे यांचे स्मृती प्रित्यर्थ खामखुर्रा येथील शंकर शहारे यांचे कडुन भोजन दान व रात्री ९ वाजता लोकांच्या मनोरंजना करीता भिमगितावर आधारीत भिमगित आर्केस्ट्रा चे आयोजन ही करण्यात आले आहे.
तरी या कार्यक्रमात देवरी व परीसरातील बौध्द समाज व इतर समाज बांधवानी जास्तीत जास्त संख्येत सहभाग घेवून या कार्यक्रमाला यशस्वी करावे असे आवाहन उरूवेला बुध्द विहार समितीचे अध्यक्ष जयपाल शहारे,उपाध्यक्ष शालीकराम शहारे,सचिव राजकुमार साखरे, सहसचिव चेतन कोचे,कोषाध्यक्ष मनोहर तागडे यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.

वीर शिरोमणी महाराणा प्रताप स्मारकाचे भव्य अनावरण सोहळा उत्साहात

0

*आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते प्रतिमेचे अनावरण, सुकळी नाक्यावरील चौकाला “महाराणा प्रताप चौक” असे नामकरण

चित्रा कापसे
तिरोडा —वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली वीर महाराणा प्रताप यांच्या भव्य स्मारकाचे अनावरण करण्यात आले. सुकळी नाका येथील गोंदिया-तुमसर मार्गावरील चौकात हे स्मारक उभारण्यात आले असून, याच ठिकाणी चौकाचे नावही “वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक” असे घोषित करण्यात आले.
या गौरवशाली प्रसंगी आमदार विजय रहांगडाले यांनी आपल्या भाषणात महाराणा प्रताप यांच्या शौर्य, स्वाभिमान व राष्ट्रभक्तीवर प्रकाश टाकला. त्यांनी असेही सांगितले की, “महाराणा प्रताप हे केवळ इतिहासातील एक योद्धा नव्हते, तर स्वातंत्र्य व स्वाभिमानाचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या स्मृती जागविण्यासाठी हे स्मारक म्हणजे आपल्या समाजाचा त्यांना मानाचा मुजरा आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात विधीवत पूजा-अर्चनेने करण्यात आली. स्थानिक पंडितांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेची पूजा,हवन व स्तुती करण्यात आली. या धार्मिक विधीनंतर आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते प्रतिमेचे अनावरण झाले. स्मारक अनावरणानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून महाराणा प्रताप यांना अभिवादन केले.कार्यक्रमास क्षत्रिय राजपूत समाजाचे शेकडो सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या व्यतिरिक्त शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष संजयसिंह बैस, अजयसिंह गौर, विनोद परमार, झलेद्रसिंह चौव्हान, झामसिंह चौव्हान, आनंदसिंह बैस, अजयसिंह तोमर, देवेंद्रसिंह गहेरवार, शैलेंद्रसिंह गौर, संजय परमार, आनंद गहेरवार, राजेश गुनेरिया,सलीम जवेरी ,अशोक असाटी, देवेंद्र तिवारी,विजय बनसोड, बाळू येरपुडे, दिलीप असाटी,निखील बैस, ममता बैस, ज्योती बैस, योगिता तोमर आणि रश्मी गौर,हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अविनाश जयस्वाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. संजयसिंह बैस यांनी केले. त्यांनी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आणि महाराणा प्रताप यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे आश्वासन दिले.

देवरीत टिल्लू पंप लावून पाणीचोरी करणा-या विरूध्द धरपकड अभियान

0

■ देवरी नगरपंचायत द्वारे शहरात धरपकड मोहीमेला सुरवात.

देवरी,दि.०९:स्थानिक नगरपंचायत प्रशासनाद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु, काही महाभाग पाणी पुरवठा करणाऱ्या नळाला टूल्लू पंप बसवून अधिकचा पाणी घेतात. यामुळे पाणी वितरण व्यवस्था प्रभावीत होत असून इतर नागरिकांना पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत असतो. परिणामी, अवैधरीत्या नळाला टुल्लू पंप लावणाऱ्या विरुद्ध नगरपंचायत प्रशासनाने कंबर कसली असून त्याविरूद्ध धरपकड कार्यवाही सुरू केली आहे.

  देवरी नगरपंचायत द्वारे विविध वार्डात पाणीपुरवठा विभागाच्या वतीने प्रत्येक घरात नळाद्वारे पाणिपुरवठा करण्यात येतो. परंतू ,काही लोक या नळा वर टिल्लूपंप लावून अवैद्यरित्या पाणि पुरवठा करतात त्यामुळे इतर लोकांना पाणी कमी प्रमाणात मिळतो. याला आळा घालण्याकरीता नगरपंचायत पाणि पुरवठा विभागाच्या पथकाद्वारे टिल्लूपंप धरपकड मोहिम मागील २२ एप्रिल पासून सुरू केली आहे.
या अभियानाद्वारे देवरी येथील वार्ड क्रं.८,९,१४ मधील एकूण चार लोकांच्या घरून टिल्लूपंप जप्त करून या प्रत्येक लोकांविरूध्द पाच हजार रूपयाच्या दंडाची कारवाई केली.
पाणीपुरवठा विभागाच्या या पथकात पाणीपुरवठा अभियंता सुनील नागपूरे, लिपीक देवचंद बहेकार,वाँल ऑपरेटर रफीक शेख, कृष्णा डोये,रमेश कुंभरे, संजय कानेकर आदींचा समावेश असून ही टिल्लूपंप धरपकड कारवाई सतत सुरू आहे.
या कारवाई मुळे देवरी ंशहरात अवैद्यरित्या टिल्लूपंप बसविणाऱ्या लोकांचे टांगलेच धाबे दणाणले आहे.

सिविल लाइन में टूटे हुए गट्टू से हो सकती है दुर्घटना

0

गोंदिया: गोंदिया नगर परिषद अंतर्गत शहर के सिविल लाइन परिसर स्थित कापसे बिल्डिंग के सामने ,माता मंदिर चौक परिसर में लगे हुए गट्टू टूटकर काफी मात्रा में रोड से बाहर निकल गए हैं।
जो लोगों के लिए आने जाने में काफी परेशानी खड़े कर रहे है, बीच शहर में सौंदर्यकरण के नाम पर रोड के बीचो-बीच चौराहे पर गट्टू लगाए गए हैं।
किंतु कहीं ना कहीं गट्टू लगाने में अनियमितता दिखाई पड़ती है।
जिसके कारण गट्टू उखड़ जाने के कारण आते जाते कई दुपहिया वाहन धारक जान जोखिम में डालकर चलने के लिए मजबूर हो गए हैं।
जिससे आजू-बाजू परिसर के लोगों द्वारा नगर पर परिषद की कार्यप्रणाली पर सवाल उठाए जा रहे हैं, कि अभी मात्र कुछ ही महीना पहले ही इस चौक पर (पेविंग ब्लॉक) गट्टू लगाए गए थे।
फिर आखिर इतने कम समय में नगर परिषद के द्वारा लगाए गए गट्टू कैसे निकल रहे हैं।
गट्टू कई जगह से उखड़ गए हैं, जिस कारण वहां से जाते हुए दो पहिया वाहनधारकों का बैलेंस बिगड़ जाता है, जिससे लोग काफी परेशान हो रहे हैं। भविष्य में
दुर्घटना कभी भी घटित हो सकती है, विशेष बात यह है कि इस परिसर से दिनभर भारी यातायात रोड पर बना रहता है।
शहर के अधिकतर सफेद पोश नेता भी इसी रोड से आना-जाना करते हैं।
काफी कद्दावर नेताओं का रहना भी और राजनीति भी इसी क्षेत्र से होने की बात कही जाती है।फिर भी नगर परिषद गोंदिया के बांधकाम विभाग द्वारा द्वारा इस तरह का कार्य इस परिसर में किया गया।जो कि नगर परिषद की कार्य प्रणाली पर प्रश्न चिन्ह निर्माण करता है।