छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार– शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे
महिला तलाठी अश्विनी ठोंबरेला ८०० रुपयांची लाच घेणे भोवले
सडक अर्जुनी: वारस फेरफार नोंद घेण्यासाठी पैशांची मागणी करून ती कार्यालयातील खासगी इसमामार्फत स्वीकारल्याप्रकरणी ग्राम चिखली येथील महिला तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली आहे. अश्विनी ठोंबरे असे महिला तलाठी तर ओंकार शेंडे (रा. कोहळीटोला) असे खासगी इसमाचे नाव आहे.नाव असून सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथील तलाठी साजा क्रमांक १७ येथे कार्यरत आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदाराच्या आईचा मृत्यू झाल्याने सातबारा उतारावरून नाव कमी करून वारस फेरफार नोंद घ्यायची होती. यासाठी त्यांनी रीतसर कारवाईदेखील केली होती. मात्र वारस फेरफार नोंद घेण्यासाठी १ हजार रुपये लागतील असे सांगण्यात आले व तडजोडीअंती ८०० रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याची तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता तलाठी ठोंबरे यांनी लाच स्वीकारण्याची इच्छा दर्शविली.
यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.८) दुपारी २:३० वाजता दरम्यान सापळा लावला व तक्रारदार लाच रक्कम देण्यासाठी तलाठी कार्यालयात गेला असता तलाठी ठोंबरे यांनी रक्कम कार्यालयात काम करणाऱ्या खासगी इसम ओंकार शेंडे यांच्या मार्फत स्वीकारली असता पथकाने दोघांनी रंगेहात पकडले.
महापालिकांवर ‘बसप’चा निळा झेंडा फडकणार-डॉ.हुलगेश चलवादी
पुणे:-राज्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुकर झाला आहे.उशीरा का होईना,न्यायालयाने लांबलेल्या निवडणुकां संदर्भात संविधान अनुरूप निकाल दिला आहे, असे मत व्यक्त करीत बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.येत्या चार महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या महानगर पालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीसाठी सज्जा व्हा,असे आवाहन त्यांनी पक्षाच्या कॅडरला केले. यासोबतच निवडणुका ‘बॅलेट पेपर’ वर घेण्याची मागणी डॉ.चलवादी यांनी केली आहे.
सर्वसामान्यांना मतदान आणि नेतृत्व निवडीचे अधिकार बहाल करणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाहीच्या संकल्पनेनुसार निवडणुका ‘बॅलेट पेपर’वर होणे आवश्यक आहे. बूथ बळकावने, मतपत्रिकांचा गैरवापर करणे असे प्रकार आता तंत्रज्ञानाने सुसज्जीत महाराष्ट्रात होणे शक्य नाही, त्यामुळे मत पत्रिकांवर निवडणूक घ्यावी, या मागणीचा डॉ.चलवादी यांनी पुनरोच्चार केला.
शोषित, पीडित, वंचित आणि उपेक्षितांचा विकासासाठी आणि ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ या नितीनुसार समाज परिवर्तनासाठी सत्तेच्या चाव्या बसपा कडे असणे आवश्यक आहे.राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनावर हत्ती निवडणूक चिन्ह असलेला बसपा चा ‘निळा झेंडा’ फडकणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ.चलवादी यांनी केले.
‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी’ ही संकल्पना समोर आणत बहुजनांचे नेतृत्व करणारी बसपा पूर्ण ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरणार आहे, असे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले. शहर, जिल्हा तसेच ग्रामीण पातळीवर बसप कॅडर निवडणुकीसाठी सज्ज झाला असून ते उपेक्षितांना ‘शासनकर्ती जमात’ बनवण्यासाठी तन-मन-धन अर्पित करीत प्रयत्नरत आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येत्या चार आठवड्यांमध्ये अधिसूचना काढणे राज्य सरकार ला बंधनकारक राहणार आहे.विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत २०२२ पूर्वीची ओबीसी आरक्षणाची स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहे. आरक्षणासंदर्भात तिढा त्यामुळे तूर्त सुटला आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले.या निवडणुकीत मतदार त्यांची फसवणूक करणाऱ्या प्रस्थापित राजकीय पक्षांना धडा शिकवेल आणि बहुजनांच्या हक्काचे विचारपीठ असलेल्या बसपाला पाठबळ देईल, असा विश्वास डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला.
बसपा केंद्र सरकार च्या पाठीशी…
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देतांना भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदुर’ला बसपा चा पूर्ण पाठिंबा आहे. देशाच्या सुरक्षेसाठी केंद्राकडून घेण्यात येणाऱ्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी बसपा उभी राहील, असे डॉ.चलवादी यांनी स्पष्ट केले.दहशतवादाला त्यांच्यात भाषेत उत्तर भारत उत्तर देईल, असे ते म्हणाले.
गावस्तरावरील विकास कामे वेळेत पुर्ण करा – पुलकित सिह
जिवती तालुक्यातील विकासकामांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडुन पाहणी
जिवती तालुक्यातील विविध गावांना भेटी देवुन, विद्यार्थी,ग्रामस्थांशी संवाद
चंद्रपुर,दि.08- चंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी नुकताच जिवती तालुक्याचा दौरा केलेला असुन, क्षेत्रीय भेटीदरम्यान जिवती तालुक्यातील विविध गावांना भेटी देवुन विविध विकास कामांची पाहणी केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी जिवती तालुक्यातील भेटी दरम्यान ग्रामपंचायत पाटण येथील आदर्श आपले सरकार सेवा केंद्रास भेट देऊन, उत्पन्नाचा दाखला वितरण करण्यात आले. व महिला बचत गटांना कर्ज मंजुरी प्रमाणपत्र देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. उमेदचे प्रकल्प संचालक गिरीष धायगुडे यांच्या हस्ते मौजा शेणगाव येथे दिड महिन्यापूर्वी घरकुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. अशा पूर्ण झालेल्या घरकुलाची पाहणी करण्यात आली. मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवुन, येथिल सोई सुविधांची पाहणी करण्यात आली. मॉडेल जिल्हा परिषद हायस्कूलची पाहणी करून, विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. पीटीगुडा नं 1 येथे ऑक्सिजन पार्क, नरेगा अंतर्गत बंधारा बांधकाम , सार्वजनिक कंपोष्टपिट च्या कामांची पाहणी केली. गावात मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. टेकमांडवा येथे उपआरोग्य केंद्राला भेट दिली . येथील आरोग्य विषयक सेवांची माहिती जाणुन घेतली व यंत्रणेतील अधिकारी व कर्मचा-यांना योग्य ते निर्देश देण्यात आले. जिल्हा परिषदच्या शाळेस भेट देऊन, विद्यार्थींशी हितगुज केली. पंचायत समिती जिवती येथिल सभागृहात विविध विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांचा विविध विकास कामांचा आढावा घेऊन गाव स्तरावरील विकास कामे वेळेत पुर्ण करण्याचे यावेळी उपस्थितांना निर्देश दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांच्या जिवती तालुक्यातील क्षेत्रीय भेटी दरम्यान उमेदचे प्रकल्प संचालक गिरीष धायगुडे ,जिवती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे व तालुका यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लीलाबाई कुर्वे यांचे निधन
आमगाव,दि.०८ः तालुक्यातील कट्टीपार येथील रहिवासी व गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांची धाकटी बहीण लीलाबाई कुर्वे यांचे कट्टीपार येथील राहते घरी आज ८ मे रोजी साय.4.30 च्या दरम्यान निधन झाले.श्रीमती कुर्वे यांच्यावर उद्या शुक्रवारला ९ मे रोजी 11.00 वाजता कट्टीपार येथील मोक्षधाम येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
प्रभावी उपचारांद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार –सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर


मुंबई विद्यापीठात एईडीपी (AEDP) पदवी अभ्यासक्रमांची सुरुवात
शिक्षणासह थेट उद्योगातील प्रशिक्षणाची संधी होणार उपलब्ध
मुंबई, दि.०८ मेः पदवीचे शिक्षण घेतानाच थेट उद्योगातील प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने महत्वाचे पाऊल टाकले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कौशल्य-आधारित उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनाला अनुसरून, मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून २० पदवी स्तरावरील शिकाऊ उमेदवारी एकात्मिक पदवी कार्यक्रमांची (Apprenticeship Embedded Degree Programme – AEDP) सुरूवात केली आहे. हे पदवीचे सर्व २० अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेत या शैक्षणिक वर्षापासून सुरु केले जात आहेत. या अभ्यासक्रमांत बी.एस्सी. (पेंट टेक्नॉलॉजी), बीएमएस (कस्टम्स क्लिअरन्स, फ्रेट फॉरवर्डिंग आणि लॉजिस्टिक्स), बीएमएस (ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट), बॅचलर ऑफ इंटिरियर डिझाइन, बी.एस्सी. (फिटनेस), बी.एस्सी. (एआय अँड एमएल), बी.एस्सी. (एरोनॉटिक्स), बी.एस्सी. (बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स), बी.ए. (ॲडव्हर्टायझिंग, कम्युनिकेशन अँड डिझाइन), बीएमएस (कॅपिटल मार्केट्स), बीएमएस (इव्हेंट मॅनेजमेंट अँड पब्लिक रिलेशन्स) यासह अन्य अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हे सर्व अभ्यासक्रम नामांकित उद्योग भागीदार आणि व्यावसायिक संस्थांच्या सहकार्याने चालवल्या जाणाऱ्या पदवी अभ्यासक्रमांसाठी लागू असणार आहेत.
पदवी स्तरावरील शिकाऊ उमेदवारी एकात्मिक पदवी अभ्यासक्रम या योजनेअंतर्गत, तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना किमान एक सत्र (२० क्रेडिट्स) आणि चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी दोन सत्रे (४० क्रेडिट्स) शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल. या दरम्यान विद्यार्थ्यांना विद्यावेतन सुद्धा मिळणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या श्रेयांक आराखड्यानुसार (क्रेडिट फ्रेमवर्क) शैक्षणिक क्रेडिट्स मिळतील. मुंबई विद्यापीठाने या शिकाऊ उमेदवारी कार्यक्रमासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या बीओएटी-डब्ल्यूझेड (BOAT-WZ) सोबत आधीच सहकार्य करार केला आहे. तर अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील उद्योग समुहांशी करार केले आहेत.
कोटः
“शिकाऊ उमेदवारी एकात्मिक पदवी अभ्यासक्रम (एईडीपी) (Apprenticeship Embedded Degree Programme – AEDP) हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने भारतातील उच्च शिक्षणात परिवर्तन घडवणारे एक महत्त्वाचे उपक्रम असून त्या दिशेने मुंबई विद्यापीठाने हे पाऊल टाकले आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणाचा अनुभव मिळणार असून विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वृद्धी करण्याचे ध्येय गाठता येणार आहे. या अनुषंगाने उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या संस्थांसह, क्षेत्रीय कौशल्य परिषदा (Sector Skill Councils), आणि शासकीय विभागांसह भागीदारीतून दर्जेदार अॅप्रेंटिसशिप संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही एक भविष्यवेधी सुरुवात असून कुशल आणि रोजगारक्षम युवा पिढी घडविण्यासाठीचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.”
प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
किशोर पर्वते यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह मिळाल्याबद्दल कोहळी विकास मंडळाकडून सत्कार
गोंदिया,दि.०८–येथील पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांना त्यांच्या उत्कट कार्याबद्दल 2024 चे महासंचालक सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येवून गोंदिया चे पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात महाराष्ट्र दिनी त्यांना सदर कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले
कोहळी समाज विकास मंडळात सुद्धा त्यांचे उल्लेखनीय कार्य असल्यामुळे
त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल व सन्मान चिन्ह मिळाल्याबद्दल कोहळी समाज विकास मंडळ गोंदिया कडून त्यांचा शाल श्रीफळ व मोमेटो देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी विकास मंडळाचे केंद्रीय उपाध्यक्ष अमोल पाटील मुंगमोडे ,गोंदिया कोहली समाज विकास मंडळाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, दिलीप लोधी , डॉ. महेंद्र संग्रामे , पोलीस उपनिरीक्षक अनिल डोंगरवार उपस्थित होते.
तेलंगाना ग्रेहाउंड फोर्स के 5 जवान आईईडी धमाके में शहीद, 10 माओवादियों को भी मार गिराया
रायपुर/जगदलपुर। छत्तीसगढ़ के कर्रेगुट्टा पहाड़ी के उत्तरी भाग में इलमिड़ी गांव के पास चलाए गए तेलंगाना ग्रेहाउंड्स बल के एक अभियान में दुखद घटना सामने आई है। जानकारी के अनुसार वाजेडु (तेलंगाना) से लौट रही ग्रेहाउंड्स टीम का पिछला दस्ता इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइस (आईईडी) की चपेट में आ गया। इस विस्फोट में ग्रेहाउंड्स के पांच जवान बलिदान हो गए।
हालांकि, अग्रिम दल ने माओवादियों के विरुद्ध कार्रवाई जारी रखते हुए महत्वपूर्ण सफलता अर्जित की है। मुठभेड़ में सुरक्षा बलों ने एक करोड़ के इनामी माओवादी चंद्रन्ना, जो कि सीसीएम (सेंट्रल कमेटी मेंबर) है, और 25 लाख के इनामी माओवादी बंडी प्रकाश, जो कि एसजेडसीएम (स्टेट जोनल कमेटी मेंबर) है, समेत कुल 10 माओवादियों को मार गिराया है। मुठभेड़ अभी भी जारी है।
छत्तीसगढ़ और तेलंगाना की सीमा पर सुरक्षाबलों द्वारा चलाए जा रहे ऑपरेशन से माओवादी घबराए हुए हैं। सुरक्षाबल लगातार माओवादियों को निशाना बना रहे हैं। इसके पहले वो शांति वार्ता करना चाहते थे, लेकिन अब फिर फोर्स को निशाना बनाकर हमला किया।
छत्तीसगढ़-तेलंगाना सीमा पर घिरे हैं माओवादी
गौरतलब है कि माओवादियों के खिलाफ सुरक्षाबल लगातार कार्रवाई कर रहे हैं। छत्तीसगढ़ और तेलंगाना की सीमा पर जवानों ने माओवादियों को घेर लिया है। लगातार हो रही कार्रवाई से माओवादी घबराए हुए हैं और शांति वार्ता की बात भी कह चुके हैं।
तेलंगाना ग्रेहाउंड फोस पर हमला
इस बीच तेलंगाना में माओवादियों ने ग्रेहाउंड फोर्स को निशाना बनाया। आईईडी की चपेट में आने से ग्रेहाउंड फोर्स के 5 जवान शहीद हो गए। इसके बाद माओवादियों ने फायरिंग शुरू कर दी। इस पर वहां मौजूद फोर्स ने जवाबी फायरिंग की, जिसमें 10 माओवादियों के मारे जाने की सूचना सामने आ रही है। लेकिन इसकी आधिकारिक पुष्टि अभी बाकी है।
शिवपुरी जिले के पोहरी पहुंच गए कूनो नेशनल पार्क से निकलकर पांच चीते
शिवपुरी। मध्य प्रदेश के कूनो नेशनल पार्क में बसाए गए चीतों ने एक बार फिर अभयारण्य की सीमा से बाहर चले गए हैं। कल रात पांच चीतों का समूह पार्क से बाहर निकल गया था। इसे बाद आज सुबह ये शिवपुरी जिले के पोहरी तक पहुंच गए हैं। चीतों को देखने के लिए ग्रामीणों की भीड़ जमा हो गई है।कूनो नेशनल पार्क में एक और मादा चीता धीरा गर्भवती है। अगले एक पखवाड़े में उसके संभावित प्रसव से यहां शावकों की संख्या में और इजाफा हो सकता है। वर्तमान में 10 वयस्क चीते और 19 शावक हैं। इन्हीं में से दो चीता प्रभाष व पावक को मंदसौर के गांधीसागर अभयारण्य भेजा गया है।
नामीबिया और दक्षिण अफ्रीका से लाए गए 20 चीतों में 10 मादा चीता थीं। इनमें से जीवित सात मादा चीतों में से अब केवल नाभा चीता ही शेष है, जो गर्भवती नही हुई है। भारत में पैदा हो रहे शावकों की बढ़ती संख्या से चीता पुनर्वास परियोजना को मजबूती मिली है।
सबसे पहले ज्वाला चीता ने चार शावकों को जन्म दिया था, जिसमें से तीन की मौत हो गई थी, जबकि एक मादा शावक मुखी जिंदा बची थी, जो अब दो साल की हो चुकी है। ज्वाला इसके अलावा चार और शावकों को भी जन्म दे चुकी है।
आशा के तीन, गामिनी के चार, वीरा के दो, निर्वा के पांच शावक हैं। अब मादा चीता धीरा के गर्भवती होने की खुशखबरी से पार्क प्रबंधन ने उसे खुले जंगल से पकड़कर बाड़े में छोड़ा है। सिंह परियोजना के मुख्य वन संरक्षक उत्तम कुमार शर्मा के अनुसार मादा चीता धीरा को बाड़े में रखकर विशेष निगरानी की जा रही है।