24.6 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home Top News शिवरायांचा अवमान करणा-या योगींची मस्ती यूपीतील लोकांनी उतरवली- उद्धव ठाकरे

शिवरायांचा अवमान करणा-या योगींची मस्ती यूपीतील लोकांनी उतरवली- उद्धव ठाकरे

0
30

मुंबई,दि.31- पालघर पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी मातोश्रीवर तातडीने आपल्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. यावेळी भाजपसोबत राहायचे की नाही यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेतली त्यात  भाजपाला खडे बोल सुनावले. 11 पैकी 2 जागा सोडल्या तर इतर जागांवर भाजपाचा पराभव झालेला आहे. 2014साली एका पक्षाचं बहुमताचे सरकार आले. आज त्या सरकारला चार वर्षं पूर्ण झाली. 25 वर्षांचे सरकार 4 वर्षात खाली आलेले आहे. पहिल्यांदाच पालघरची लोकसभा शिवसेनेने लढवली होती. निवडणूक लढवायची की नाही द्विधा मनस्थितीत असतानाच वनगा परिवारावर झालेल्या अन्यायातून पालघर निवडणूक शिवसेनेन ताकदीने लढवली. 8 लाख 87 हजार लोकांना मतदान केले. 6 लाख लोकांनी भाजपाला नाकारल्याचे सांगत शिवरायांचा अवमान करणार्यां योगींची मस्ती उतरल्याची टिका केली.

पत्रकार परिषदेत काय काय म्हणाले उद्धव ठाकरे?

– पालघरचा भाजपचा निसटता विजय
– भाजपला आता मित्रांची गरज नाही
– कैरानामध्ये योगींची मस्ती जिरली आहे.
– योगींनी शिवाजी महाराजांना अवमान केला.
– छत्रपतींच्या अपमानावर भाजप व त्यांचे नेते काहीच का बोलत नाहीत
– भाजपच्या शिवभक्तीवर आता संशय येतोय