
गोरेगाव,दि.14 : तालुक्यातील तिमेझरी येथे अज्ञात आरोपींनी धानाचे दोन पुंजणे जाळल्याची घटना ११ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत दोन शेतकरी कुटुंबीयांचे तीन एकरातील धान जळून खाक झाले आहे. त्यामुळे देवाजी मेश्राम, दिनेश बोरकर या दोन कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढावले आहे. या घटनेची माहिती तहसीदार व गोरेगाव पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे.देवाजी मेश्राम यांच्या मालकीची अडीच एकर तर दिनेश बोरकर हा अल्पभूधारक असून अर्धा एकर शेती आहे. देवाजी मेश्राम या शेतकऱ्याने भारी प्रजातीच्या धानाची लागवड केली होती. त्याचप्रमाणे दिनेश बोरकर यांनीसुद्धा याच धानाची लागवड केली होती. धानाचे उत्पादन चांगले आले होते. .




