40.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home गुन्हेवार्ता वाशीमच्या बेलखेडातील शेतकरी पुत्राची आत्महत्या

वाशीमच्या बेलखेडातील शेतकरी पुत्राची आत्महत्या

0
31

blank

वाशीम : नैसर्गिक आपत्ती, सततची नापिकी, खुल्या बाजारात पडलेले शेतमालाचे भाव आणि कर्जाचा बोझा, याला कंटाळून एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केली. तेजस गजानन आळे, असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. तो कारंजा तालुक्यातील बेलखेड येथील रहिवासी होता. बेलखेड येथील कल्पना गजानन आळे यांच्याकडे चार एकर एवढी शेती असून त्यांना दोन मुलं आहेत. त्यातील लहान मुलगा तेजस याने १९ जानेवारी रोजी आपल्या शेतात कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून विषारी द्रव्य प्राशन केले. कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच त्याला उपचारासाठी अमरावती येथील ईर्वीन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना रविवारी त्याने अखेरचा श्वास घेतला.वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर आई कल्पना आळे कुटुंबाचा गाडा हाकत होत्या. अशातच आता मुलानेही आत्महत्या केल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आडे यांच्या नावे ४९ हजार रुपयांचे भारतीय स्टेट बँकेच्या कामरगाव शाखेचे पीक कर्ज आहे, तर २२ हजार रुपयांचे टीव्हीएस फायनान्स कंपनीचे कर्ज असल्याची माहिती सूत्रांनी दिली.