महाराष्ट्रातील ४१३ माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती मंजूर

0
14

पुणे दि. 21:- केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या मार्फत इयत्ता 12 वी व पदवी उत्तीर्ण होऊन व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या भारतातील ५ हजार ५०० माजी सैनिकांच्या पाल्यांना दरवर्षी पंतप्रधान शिष्यवृत्ती दिली जाते. सन २०२०-२१ साठी महाराष्ट्रातील ५०० माजी सैनिक पाल्यांचे पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी अर्ज शिफारस करुन केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आले होते, त्यामधील ४१३ माजी सैनिकांच्या पाल्यांना म्हणजेच अर्ज केलेल्यांपैकी ८२.६० % पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृती मंजूर झाली आहे. यापैकी देशात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक आहे. राज्यातील ४१३ माजी सैनिक पाल्यांकरिता शिष्यवृत्तीची रक्कम रुपये १ कोटी ३६ लाख ८ हजार आहे. दरवर्षी कोर्सचा कालावधी असेपर्यंत प्राप्त होणार आहे, असे पुणे सैनिक कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.