<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>Berar Times</title>
	<atom:link href="https://www.berartimes.com/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://www.berartimes.com/</link>
	<description>News Paper</description>
	<lastBuildDate>Wed, 10 Jun 2026 12:54:16 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=7.0</generator>

<image>
	<url>https://www.berartimes.com/wp-content/uploads/2017/09/cropped-bgt5-2-32x32.jpg</url>
	<title>Berar Times</title>
	<link>https://www.berartimes.com/</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>रेतीने भरलेल्या टिप्परची धडक; पाच जण जखमी</title>
		<link>https://www.berartimes.com/crime-news/231046/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 10 Jun 2026 12:54:16 +0000</pubDate>
				<category><![CDATA[गुन्हेवार्ता]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=231046</guid>

					<description><![CDATA[<p>गोंदिया ः तेढवा येथील घाटावरून वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परच्या धडकेत चार बालिका व एका ज्येष्ठ नागरिकासह पाच जण जखमी झाले. ही घटना काटी येथे बुधवारी (ता. १०) सकाळी पाचच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून, नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून संताप व्यक्त केला. तेढवा येथील घाटावरून अवैध उत्खनन करून वाळूची वाहतूक [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/crime-news/231046/">रेतीने भरलेल्या टिप्परची धडक; पाच जण जखमी</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><em><strong>गोंदिया</strong></em> ः तेढवा येथील घाटावरून वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परच्या धडकेत चार बालिका व एका ज्येष्ठ नागरिकासह पाच जण जखमी झाले. ही घटना काटी येथे बुधवारी (ता. १०) सकाळी पाचच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून, नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून संताप व्यक्त केला.<br />
तेढवा येथील घाटावरून अवैध उत्खनन करून वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर व टिप्पर काटी-बघोली-मुरपार-रजेगाव मार्गावरून भरधाव वेगाने धावत असतात. बुधवारी (ता. १०) वाळूने भरलेल्या एका टिप्परने काटी गावात पाच जणांना धडक दिली. यात मीत राऊत, लोवंशी राऊत, वाणी राऊत, देवांशिका राऊत या चार बालिका तसेच छगनलाल राऊत (वय ६५) हे जखमी झाले. सुदैवाने यात ते थोडक्यात बचावले. त्यानंतर गावातील नागरिकांनी माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या नेतृत्वाखाली अवैध उत्खनन व भरधाव वाहतुकीविरोधात रास्ता रोको आंदोलन केले.<br />
पोलिस प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन योग्य कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, गेल्या आठवड्यातच काटी ग्रामपंचायतीने तेढवा वाळू घाट तसेच इतर ठिकाणांवरील अवैध उत्खनन आणि काटी-बघोली-मुरपार-रजेगाव मार्गावर भरधाव धावणाऱ्या टिप्पर व ट्रॅक्टरविरोधात कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/crime-news/231046/">रेतीने भरलेल्या टिप्परची धडक; पाच जण जखमी</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>बाेदलकसा जलाशयात डोंगा पलटून २ ठार&#8230;.</title>
		<link>https://www.berartimes.com/top-news/231040/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 10 Jun 2026 12:09:36 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Top News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=231040</guid>

					<description><![CDATA[<p>गोंदिया,दि.१०ः जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात असलेल्या बोदलकसा जलाशयात आज (दि.१०)मासेमारीकरीता गेलेल्या मच्छिमारांचा डोंगा उलटून २ व्यक्ती ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.आपत्ती व्यवस्थापन व तिरोडा पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून शोध मोहिम सुरु आहे.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/top-news/231040/">बाेदलकसा जलाशयात डोंगा पलटून २ ठार&#8230;.</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p>गोंदिया,दि.१०ः जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात असलेल्या बोदलकसा जलाशयात आज (दि.१०)मासेमारीकरीता गेलेल्या मच्छिमारांचा डोंगा उलटून २ व्यक्ती ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.आपत्ती व्यवस्थापन व तिरोडा पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून शोध मोहिम सुरु आहे.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/top-news/231040/">बाेदलकसा जलाशयात डोंगा पलटून २ ठार&#8230;.</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>कुरखेडा एसडीओ कार्यालयावर धडकला आदिवासी समाजाचा मोर्चा &#8216;वनवासी&#8217; संबोधणाऱ्या गृहमंत्र्यांचा निषेध</title>
		<link>https://www.berartimes.com/vidarbha/231039/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 10 Jun 2026 11:42:02 +0000</pubDate>
				<category><![CDATA[विदर्भ]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=231039</guid>

					<description><![CDATA[<p>कुरखेडा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदिवासी समाजाला ‘वनवासी’ संबोधत मूलनिवासी समूहाचा अपमान केला, असा आरोप करत गृहमंत्र्यांविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत कुरखेडा येथे आदिवासी समाजाने मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची आणि धानोरा तालुक्यातील आदिवासी समाजाच्या 45 पोटजातींमधील नागरिक यात सहभागी झाले होते. बिरसा मुंडा चौक (नवीन बसस्थानक) ते उपविभागीय अधिकारी [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/231039/">कुरखेडा एसडीओ कार्यालयावर धडकला आदिवासी समाजाचा मोर्चा &#8216;वनवासी&#8217; संबोधणाऱ्या गृहमंत्र्यांचा निषेध</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>कुरखेडा :</strong> केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदिवासी समाजाला ‘वनवासी’ संबोधत मूलनिवासी समूहाचा अपमान केला, असा आरोप करत गृहमंत्र्यांविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत कुरखेडा येथे आदिवासी समाजाने मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची आणि धानोरा तालुक्यातील आदिवासी समाजाच्या 45 पोटजातींमधील नागरिक यात सहभागी झाले होते.</p>
<p>बिरसा मुंडा चौक (नवीन बसस्थानक) ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. दिल्ली येथे जनजाती बांधवांच्या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह यांनी आदिवासींचा उल्लेख वनवासी असा केला होता. हा शब्द मानहानीकारक असून आदिवासी हा जल, जंगल, जमिनीचा मालक व मूलनिवासी आहे. त्यांना संवैधानिक असलेला आदिवासी हाच शब्दप्रयोग करण्यात यावा, यानिवासी वनवासी या शब्दप्रयोगाबद्दल गृहमंत्र्यांनी देशाची माफी मागावी या प्रमुख मागणीसह आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.</p>
<p><strong>अनेक पदाधिकाऱ्यांचा सहभाग</strong></p>
<p>हा मोर्चा एसडीओ कार्यालयावर धडकल्यानंतर उपविभागीय अधिकारी किरण वाघस्कर यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनात आमदार रामदास मसराम, आदिवासी समस्त 45 पोटजाती समाज संघटनेचे अध्यक्ष तिमेश्वर कोरेटी, रामसुराम काटेंगे, आदिवासी कंवर समाजाचे मार्गदर्शक डॉ.मेघराज कपूर, आदिवासी हलबी जमातीचे जिल्हाध्यक्ष शालीकराम मानकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष माधव गावळ, संजय कोकोडे, माजी जि.प. सदस्य प्रभाकर तुलावी, माजी सभापती गिरीधर तितराम, गोविंद टेकाम, शशिकांत मडावी, दिलीप घोडाम, अरुण सोयाम, प्रभाकर जुमनाके, आशा तुलावी, गुलाब सोनकुकरा, श्रीराम दुगा, संध्या नैताम, प्रतिभा सिडाम, निलकंठ आलाम, चिरकुटा नैताम, विजय तुलावी, धरमदास उईके, गणेश काटेंगे, श्रीराम मडावी यांच्यासह आपचे जिल्हाध्यक्ष नसिर हाशमी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जीवन नाट, जयंत हरडे, कोरची तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, वसिम शेख, देसाईगंज तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, परसराम टिकले, तसेच मोठ्या संख्येत आदिवासी बांधव सहभागी झाले होते.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/231039/">कुरखेडा एसडीओ कार्यालयावर धडकला आदिवासी समाजाचा मोर्चा &#8216;वनवासी&#8217; संबोधणाऱ्या गृहमंत्र्यांचा निषेध</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>भूमिहीन शेतकरी पत्नीच्या खांद्यावरून उतरले जोखड&#8230;!</title>
		<link>https://www.berartimes.com/top-news/231036/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 10 Jun 2026 11:02:04 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Top News]]></category>
		<category><![CDATA[मराठवाडा/खान्देश]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=231036</guid>

					<description><![CDATA[<p>लातूर जिल्ह्यातील बोंबळीच्या गायकवाड कुटुंबियांना मिळाला दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संवेदनशीलता, प्रशासनाची तत्परता वीज पडून दगावलेला बैल, आर्थिक सहाय्यासह, शेतकऱ्याला मिळाला बैल मुंबई, दि. १०: वीज पडून बैल दगावल्याने जोखडाला पत्नीला जुंपण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या व्य़थेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, अन् या शेतकरी कुटुंबाला अवघ्या [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/top-news/231036/">भूमिहीन शेतकरी पत्नीच्या खांद्यावरून उतरले जोखड&#8230;!</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>लातूर जिल्ह्यातील बोंबळीच्या गायकवाड कुटुंबियांना मिळाला दिलासा</strong></p>
<p><strong>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संवेदनशीलता, प्रशासनाची तत्परता</strong></p>
<p><strong>वीज पडून दगावलेला बैल, आर्थिक सहाय्यासह, शेतकऱ्याला मिळाला बैल</strong></p>
<p><strong>मुंबई, दि. १०:</strong> वीज पडून बैल दगावल्याने जोखडाला पत्नीला जुंपण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या व्य़थेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, अन् या शेतकरी कुटुंबाला अवघ्या काही तासात बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाई पोटीची रक्कम मिळाली. यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे निर्देश आणि जिल्हा प्रशासनासोबतच, अन्य विभागांनी दाखवलेली संवेदनशीलता चर्चेची ठरली आहे. या संवेदनशीलतेमुळे आता काशिनाथ गायकवाड यांना पत्नीला बैलाच्या जागी जूंपावे लागणार नसल्याने, या कष्टकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.<iframe width="850" height="481" src="https://www.youtube.com/embed/XQZSSlEc2fI" title="लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात बांबळी गावात दुसरा बैल खरेदी करण्याची ताकद नसल्याने पत्नीला जुंपल" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share" referrerpolicy="strict-origin-when-cross-origin" allowfullscreen></iframe></p>
<p>लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्दचे काशिनाथ गायकवाड भूमिहीन शेतकरी. त्यांच्याकडे असलेल्या बैलजोडीच्या मदतीने श्री. गायकवाड व त्यांच्या पत्नी सौ. हौसाबाई परिसरातील शेतकऱ्यांची जमीन कसतात. मशागतीची, नांगरणी ते पेरणी, वखरणी अशी मिळेल ती कामे करतात, यावरच त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. यातच त्यांच्यावर दुर्दैव ओढवले. त्यांच्याकडील एका बैलाचा शुक्रवारी (५ जून) झालेल्या वादळी पावसात वीज पडून मृत्यू झाला. त्यामुळे मिळालेली कामे पूर्ण करण्यासाठी, श्री. गायकवाड यांना पत्नी सौ. हौसाबाई यांना जुंपावे लागल्याचे वृत्त मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यापर्यंत पोहचले. यावर त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानुसार प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संपर्कात राहून, लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांना महसूलसह, सर्व यंत्रणांना श्री. गायकवाड यांना तत्काळ मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तहसिल कार्यालयासह, पशूसंवर्धन, कृषी सर्व यंत्रणा श्री. गायकवाड यांच्यापर्यंत पोहचल्या.<br />
पशूसंवर्धन विभागाने प्रयत्नपूर्वक एक बैल उपलब्ध करून घेतला आणि तो जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड, तहसिलदार सोमनाथ वाडकर यांच्यासह पशूसंवर्धन विभागाचे अधिकारी आदींच्या उपस्थितीत थेट गायकवाड कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला. यामुळे काशिनाथ गायकवाड यांच्यासर, त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.</p>
<p>मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी तातडीने दखल घेत, बैल मिळवून दिल्याने गायकवाड यांच्या पत्नी सौ. हौसाबाई आणि मुलगा पुंडलिक यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह, जिल्हा प्रशासनाचेही आभार मानले. सौ. हौसाबाई म्हणाल्या, आमच्या एका बैलाचा वीज पडून मृत्यू झाल्याने दुर्दैवाने आमच्यावर अशी वेळ आली. पण आमच्या अडचणीची दखल घेऊन, लगेचच मदत मिळाल्याने बरे वाटले. आता पुढे येणाऱ्या खरीप हंगामासाठी मिळालेली कामे पूर्ण करण्याची चिंता दूर झाली. बैल पण चांगला मिळाला आहे. आता त्याची पण चागंली काळजी घेऊ आणि मिळालेली कामे देखील चांगली होतील असे बघू.</p>
<p>नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांचा मृत्यू झाल्यास राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीने अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. श्री. गायकवाड यांच्या दगावलेल्या बैलाचा तातडीने पंचनामा आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून नियमानूसार आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. ही रक्कम श्री. गायकवाड यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/top-news/231036/">भूमिहीन शेतकरी पत्नीच्या खांद्यावरून उतरले जोखड&#8230;!</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>गोसीखुर्द प्रकल्पातील कोट्यवधींच्या गैरव्यवहारावर,एसीबीने ७ जणांविरुध्द नोंदवली तक्रार</title>
		<link>https://www.berartimes.com/crime-news/231030/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 10 Jun 2026 10:58:14 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Top News]]></category>
		<category><![CDATA[गुन्हेवार्ता]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=231030</guid>

					<description><![CDATA[<p>चंद्रपूर: चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील निविदा प्रक्रियेत बनावट कागदपत्रे, नियमभंग आणि आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे. जलसंपदा विभागातील तत्कालीन वरिष्ठ अधिकारी आणि पुण्यातील कंत्राटदार कंपन्यांचा या प्रकरणात समावेश असून, एसीबीच्या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/crime-news/231030/">गोसीखुर्द प्रकल्पातील कोट्यवधींच्या गैरव्यवहारावर,एसीबीने ७ जणांविरुध्द नोंदवली तक्रार</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>चंद्रपूर:</strong> चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील निविदा प्रक्रियेत बनावट कागदपत्रे, नियमभंग आणि आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे. जलसंपदा विभागातील तत्कालीन वरिष्ठ अधिकारी आणि पुण्यातील कंत्राटदार कंपन्यांचा या प्रकरणात समावेश असून, एसीबीच्या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील कोट्यवधी रुपयांच्या कथित जलसिंचन गैरव्यवहार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अखेर मोठी कारवाई केली असून, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक अनिल मोहनरेड्डी जिट्टावार यांनी शासनाच्या वतीने फिर्याद दिली असून, जलसंपदा विभागाचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी आणि पुणे येथील कंत्राटदार कंपन्यांच्या मालकांचा आरोपींमध्ये समावेश आहे.<br />
आरोपींमध्ये ब्रह्मपुरी येथील गोसीखुर्द उजवा कालवा<span style="background-color: #ffcc00;"><strong> विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता सुधाकर आत्माराम चेंगारे, नागपूरच्या गोसीखुर्द प्रकल्प मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता संजय लक्ष्मण खोल्हापूरकर, जलसंपदा विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी, तत्कालीन मुख्य अभियंता देवेंद्र परशुराम शिर्के, पुण्याचे कंत्राटदार मनोजकुमार प्राणनाथ अँब्रोल, तसेच पुणे येथील मे. सुमेधा अर्थमुव्हर्स कंपनी आणि मे. सुवर्णा इंटरप्रायजेस या भागीदारी (जे.व्ही.) कंपन्यांचा</strong></span> समावेश आहे. या सर्वांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८, ४७१, ३४ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम १३(१)(ड) व १३(२) अन्वये आर्थिक फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिका क्रमांक ९२/२०१२ आणि ८३/२०१२ च्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने सिंचन प्रकल्पातील अनियमिततेबाबत उघड चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार गृह विभाग आणि अँटी करप्शन ब्युरो मुख्यालयाकडून प्राप्त आदेशावरून तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे<br />
संपूर्ण प्रकरण २००९ ते २०१० या कालावधीत घडले असून, गोसीखुर्द उजवा मुख्य कालव्यावरील सा.क्र. ६३९५० मीटरवरील ‘डी-७’ वितरिकेमधील मातीकाम व बांधकाम या १२.६३ कोटी रुपयांच्या मूळ निविदेच्या कामाशी संबंधित आहे. या कामासाठी निविदा पूर्व अर्हता अर्ज छाननी समितीचे अध्यक्ष सोपान सूर्यवंशी आणि सदस्य सचिव सुधाकर आत्माराम चेंगारे (तत्कालीन कनिष्ठ अधिकारी आर.डी. वर्धने यांच्या स्वाक्षरीने सादर प्रस्ताव) यांनी तत्कालीन काळात निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता केल्याचे तपासात उघड झाले आहे.</p>
<p>या सिंचन कामाचे कंत्राट मिळवण्यासाठी पुणे येथील यशस्वी कंत्राटदार फर्म ‘मे. सुमेधा अर्थमुव्हर्स कंपनी अँन्ड मे. सुवर्णा इंटरप्रायजेस’ (जे.व्ही.) यांच्या वतीने मनोजकुमार अँब्रोल यांनी निविदेसोबत सादर केलेली एकूण ४ पूर्वानुभव प्रमाणपत्रे पूर्णपणे बनावट आणि बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. एसीबीने या प्रमाणपत्रांची सातारा आणि पुणे येथील संबंधित जलसंधारण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयांकडून पडताळणी केली असता, संबंधित कंत्राटदाराला असे कोणतेही काम देण्यात आले नव्हते आणि ही प्रमाणपत्रे त्यांच्या कार्यालयातून जारी झाली नसून कंत्राटदाराने त्यावर बनावट स्वाक्षऱ्या केल्याचे तत्कालीन अधिकाऱ्यांनी आपल्या बयानात स्पष्ट केले.</p>
<p>अशाप्रकारे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि शासनाची फसवणूक करण्याच्या हेतूने हे बनावट दस्तऐवज खरे भासवून निविदा प्रक्रियेत सादर केले गेले, ज्याच्या आधारे या कंपनीला पात्र ठरवून तब्बल १३ कोटी ८६ लाख रुपयांचे अंतिम कंत्राट व कार्यारंभ आदेश देण्यात आले.<br />
एवढेच नव्हे तर, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांनुसार भागीदारीत (Joint Venture) निविदा भरणाऱ्या कंपन्यांची रीतसर उपनिबंधक कार्यालयाकडे भागीदारी संस्था म्हणून नोंदणी असणे आणि त्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. मात्र, एसीबीने पुणे येथील उपनिबंधक कार्यालयाकडून माहिती मागवली असता, ‘मे. सुमेधा अर्थमुव्हर्स कंपनी अँन्ड मे. सुवर्णा इंटरप्रायजेस’ (जे.व्ही.) नावाच्या कोणत्याही भागीदारी संस्थेची नोंदणीच झालेली नसल्याचे अधिकृत पत्राद्वारे समोर आले.</p>
<p>तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार, या जे.व्ही. फर्मची कोणतीही कायदेशीर नोंदणी नसताना, बँक खाते किंवा पॅन कार्ड नसतानाही जलसंपदा विभागाच्या संबंधित तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व विभागीय लेखाधिकाऱ्यांनी संगनमताने नियम धाब्यावर बसवून काम सुरू करण्याचे आदेश दिले आणि कंत्राटदाराला शासकीय देयकेही प्रदान केली. यावरून सरकारी अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराशी संगनमत करून बनावट कागदपत्रांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि शासनाची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यामुळे चंद्रपूर एसीबीच्या या धडक कारवाईने सिंचन क्षेत्रात आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळबळ उडाली आहे.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/crime-news/231030/">गोसीखुर्द प्रकल्पातील कोट्यवधींच्या गैरव्यवहारावर,एसीबीने ७ जणांविरुध्द नोंदवली तक्रार</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>एलकेएएमएचची ऐतिहासिक कामगिरी; पहिली नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वी</title>
		<link>https://www.berartimes.com/vidarbha/231029/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 10 Jun 2026 10:56:29 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Top News]]></category>
		<category><![CDATA[विदर्भ]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=231029</guid>

					<description><![CDATA[<p>लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली आरोग्यसेवेचा विस्तार गडचिरोली-आरोग्यसेवेच्या क्षेत्रात गडचिरोली जिल्ह्याने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल (एलकेएएमएच) येथे जिल्ह्यातील पहिली यशस्वी टोटल नी रिप्लेसमेंट (टीकेआर) अर्थात गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली असून, यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांसाठी आधुनिक आरोग्यसेवेचे नवे दालन खुले [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/231029/">एलकेएएमएचची ऐतिहासिक कामगिरी; पहिली नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वी</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<div id="page" class="site af-whole-wrapper">
<div id="content" class="container-wrapper">
<div class="section-block-upper">
<div id="primary" class="content-area">
<p><strong>लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली आरोग्यसेवेचा विस्तार</strong></p>
<article id="post-6011" class="af-single-article post-6011 post type-post status-publish format-standard has-post-thumbnail hentry category-diu post_badge-alert post_badge-breaking post_badge-special-report post_badge-trending">
<div class="entry-content-wrap read-single social-after-title">
<div class="color-pad">
<div class="entry-content read-details">
<div class="google-auto-placed ap_container">
<div id="aswift_1_host">
<div class="google-aiuf" data-google-ad-efd="true">
<div class="goog-rentries">
<div><strong><ins class="adsbygoogle adsbygoogle-noablate" data-ad-format="auto" data-ad-client="ca-pub-3782833732012025" data-adsbygoogle-status="done" data-ad-status="unfill-optimized">गडचिरोली-</ins></strong>आरोग्यसेवेच्या क्षेत्रात गडचिरोली जिल्ह्याने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल (एलकेएएमएच) येथे जिल्ह्यातील पहिली यशस्वी टोटल नी रिप्लेसमेंट (टीकेआर) अर्थात गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली असून, यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांसाठी आधुनिक आरोग्यसेवेचे नवे दालन खुले झाले आहे.</div>
</div>
</div>
</div>
<p>दीर्घकाळापासून गुडघ्याच्या सांध्यातील गंभीर झीज आणि असह्य वेदनांनी त्रस्त असलेल्या एका ज्येष्ठ महिलेवर ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. अनेक वर्षांपासून चालणे, उभे राहणे, जिने चढणे तसेच दैनंदिन कामकाज करणेही तिच्यासाठी कठीण बनले होते. वाढत्या वेदनांमुळे तिचे सामाजिक आणि कौटुंबिक जीवनही प्रभावित झाले होते.</p>
</div>
<p>गावाकडील अनेक नागरिकांप्रमाणेच प्रगत वैद्यकीय उपचार मिळवण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागते, अशी तिची धारणा होती. अशा उपचारांसाठी होणारा प्रचंड खर्च, प्रवासातील अडचणी आणि अनिश्चितता यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेणे कठीण झाले होते. मात्र लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने सविस्तर वैद्यकीय तपासणी करून टोटल नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेची शिफारस केली.<br />
रुग्णालयाने समाजाभिमुख आरोग्यसेवेची भूमिका जपत ही संपूर्ण शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केली. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण भागातील रुग्णांसाठी असलेला सर्वात मोठा अडथळा दूर झाला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णेवर आवश्यक पुनर्वसन उपचारही करण्यात आले.<br />
विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांतच संबंधित रुग्ण स्वतःच्या पायांवर उभी राहून चालू लागली. अनेक वर्षांच्या वेदनांनंतर पुन्हा आत्मविश्वासाने चालण्याचा अनुभव तिच्यासाठी अत्यंत भावनिक आणि आनंददायी ठरला. सध्या तिच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली असून ती अत्यल्प वेदनांसह दैनंदिन कामे करू शकत आहे.<br />
गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि दुर्गम जिल्ह्यात अशा प्रकारची अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे होणे हे आरोग्यसेवेच्या दृष्टीने मोठे यश मानले जात आहे. यामुळे भविष्यात विशेष उपचारांसाठी नागपूर, हैदराबाद, पुणे किंवा मुंबईसारख्या महानगरांकडे धाव घेण्याची गरज कमी होणार असून स्थानिक स्तरावरच दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.<br />
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालय सातत्याने आपल्या वैद्यकीय सेवा, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि अत्याधुनिक उपकरणांची क्षमता वाढवत आहे. गडचिरोलीतील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रुग्णालय विविध विशेष उपचार सेवा सुरू करत आहे.पहिली यशस्वी गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही केवळ एका रुग्णाच्या नवजीवनाची कहाणी नसून गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यसेवेच्या प्रगतीचा एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरत आहे. यामुळे ग्रामीण भागातील हजारो रुग्णांना आधुनिक वैद्यकीय उपचारांची नवी आशा मिळाली आहे.</p>
</div>
</div>
</div>
</article>
</div>
</div>
</div>
</div>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/231029/">एलकेएएमएचची ऐतिहासिक कामगिरी; पहिली नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वी</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>नैसर्गिक झाडे वाचवा मोहीम तीव्र करण्याची गरज : डॉ. तुरकर</title>
		<link>https://www.berartimes.com/featured-news/231020/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 10 Jun 2026 10:36:49 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Featured News]]></category>
		<category><![CDATA[विदर्भ]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=231020</guid>

					<description><![CDATA[<p>गोंदियाः विश्व पर्यावरण दिनाच्या निमित्ताने देशभरात वृक्षारोपणाच्या मोहिमांवर मोठ्या गप्पा मारल्या जात असतानाच, दुसरीकडे पर्यावरणप्रेमी डॉ. घनश्याम तुरकर यांनी एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. &#8216;नवीन रोपे लावणे गरजेचे आहेच, पण त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे जे वृक्ष आधीपासूनच नैसर्गिकरित्या आपल्या आजूबाजूला उगवले आहेत, त्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे,&#8217; असे [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/featured-news/231020/">नैसर्गिक झाडे वाचवा मोहीम तीव्र करण्याची गरज : डॉ. तुरकर</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>गोंदियाः</strong> विश्व पर्यावरण दिनाच्या निमित्ताने देशभरात वृक्षारोपणाच्या मोहिमांवर मोठ्या गप्पा मारल्या जात असतानाच, दुसरीकडे पर्यावरणप्रेमी डॉ. घनश्याम तुरकर यांनी एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. &#8216;नवीन रोपे लावणे गरजेचे आहेच, पण त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे जे वृक्ष आधीपासूनच नैसर्गिकरित्या आपल्या आजूबाजूला उगवले आहेत, त्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे,&#8217; असे मत त्यांनी व्यक्त केले.<br />
नैसर्गिकरित्या उगवलेले कडुनिंब, पिंपळ किंवा इतर स्थानिक वृक्ष वर्षानुवर्षे संघर्ष करत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवतात. याउलट, वृक्षारोपण मोहिमांतर्गत लावलेली रोपे, जर त्यांची दीर्घकाळ काळजी घेतली नाही, तर फार मोठ्या संख्येने नष्ट होतात. स्थानिक झाडे आणि वनस्पती केवळ हिरवळ वाढवत नाहीत, तर पक्षी, फुलपाखरे, कीटक आणि मातीतील सूक्ष्मजीवांच्या संपूर्ण साखळीला (जैवविविधतेला) आधार देतात. नैसर्गिकरित्या उगवलेल्या या झाडांना ना ट्री-गार्डची ना गरज असते, पाण्याच्या टँकरचीः गरज असते ती फक्त त्यांना न तोडण्याची ! फक्त वृक्षारोपण करणे म्हणजे फुटक्या बादलीत पाणी भरण्यासारखे आहे बहुतेक शहरांमध्ये वृक्षारोपणाची केवळ आकडेवारी मोजली जाते. परंतु, लावलेली किती रोपे जिवंत राहिली आणि आधीपासून असलेल्या किती झाडांचे नुकसान झाले, याचा कोणताही ठोस हिशोब ठेवला जात नाही. कोणत्याही नवीन वृक्षारोपण मोहिमेपूर्वी प्रभाग (वॉर्ड), मोहल्ला आणि सोसायट्यांमध्ये आधीपासून उपलब्ध असलेल्या झाडांची मोजणी आणि मार्किंग केली पाहिजे. त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, &#8216;ज्यांची तुम्ही मोजणी करणार नाही, त्यांचे तुम्ही रक्षणही करू शकणार नाही. &#8216;अनेकदा ती एखादी औषधी वनस्पती असते किंवा फुलपाखरे आणि छोट्या जीवांचे सुरक्षित आश्रयस्थान असते. त्यामुळे अशी झाडे उपटून टाकण्याऐवजी, त्यांच्या आजूबाजूला पसरलेला प्लास्टिकचा कचरा आणि घाण हटवणे जास्त गरजेचे आहे. दुसरीकडे नैसर्गिक क्षेत्रांमध्ये डझनभर प्रकारची गवतं, झुडपे आणि वृक्ष स्वतःहून विकसित होऊन जैवविविधता समृद्ध करत असतात, असे डॉ. तुरकर यांनी सांगितले.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/featured-news/231020/">नैसर्गिक झाडे वाचवा मोहीम तीव्र करण्याची गरज : डॉ. तुरकर</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>अहेरी येथील घटनेच्या निषेधार्थ न.पं. कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन</title>
		<link>https://www.berartimes.com/vidarbha/231019/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 10 Jun 2026 10:32:12 +0000</pubDate>
				<category><![CDATA[विदर्भ]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=231019</guid>

					<description><![CDATA[<p>&#8230; निवेदनातून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी&#8230; अर्जुनी मोरगाव-गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपरिषदमध्ये कार्यरत कर अधिकारी वैभव पांढरे याच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नगरपंचायत अर्जुनी येथील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवाणे यांना निवेदन देत हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्राप्त माहितीनुसार, बुधवारला (10) कर अधिकारी पांढरे नेहमीप्रमाणे कार्यालयात काम [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/231019/">अहेरी येथील घटनेच्या निषेधार्थ न.पं. कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>&#8230; निवेदनातून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी&#8230;</strong></p>
<p><strong>अर्जुनी मोरगाव-</strong>गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपरिषदमध्ये कार्यरत कर अधिकारी वैभव पांढरे याच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नगरपंचायत अर्जुनी येथील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवाणे यांना निवेदन देत हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.<br />
प्राप्त माहितीनुसार, बुधवारला (10) कर अधिकारी पांढरे नेहमीप्रमाणे कार्यालयात काम करीत असताना त्यांच्यावर अचानक आरोपी अजय कंकडलवार व त्याच्या साथीदारांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला.पांढरेला धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली यामध्ये ते जबर जखमी झाले.त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.<br />
गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील व दुर्गम भागात शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा बजावणे मोठे आव्हान आहे.अशा ठिकाणी नेहमी कर्मचाऱ्यांची कमतरता असते.संवर्ग अधिकारी व कर्मचारी अल्प संख्येने कार्यरत असतात.आपल्या जीवाची पर्वा न करता कुटुंबापासून दूर राहून प्रशासकीय जबाबदारी पार पाडतात.अशा विपरीत परिस्थितीत सेवा देत असताना कर्मचाऱ्यांवरील जीवघेणे हल्ले ही अत्यंत गंभीर व दुर्दैवी बाब आहे.<br />
या हल्यातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी.आरोपीला त्वरित अटक करून कठोर शिक्षा मिळावी. प्रशासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत सुरक्षितता प्रदान करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.<br />
नगरपरिषद संवर्ग संघटना, नगरपरिषद व नगरपंचायत आस्थापनेतील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी या प्रसंगी एकजुटीने आपल्या सहकाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. हा केवळ एका कर्मचाऱ्यावर झालेला हल्ला नसून संपूर्ण प्रशासन व्यवस्थेवरील हल्ला आहे.वैभव पांढरे यांच्यावरील प्रसंग भविष्यात कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यावर येऊ शकतो.त्यामुळे हा लढा केवळ एका व्यक्तीसाठी नसून प्रशासनातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याच्या सन्मान, सुरक्षितता आणि स्वाभिमानासाठी असल्याचे तीव्र संवेदना आंदोलक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.यावेळी कर व प्रशासकीय अधिकारी दिलीप उईके, अभियंता निखिल बंड, लेखापाल एकनाथ चव्हाण, नगर रचना सहाय्यक प्रेरणा बाविस्कर, लिपिक शुभम गौरकार, दीप्ती भाजीपाले,दुर्योधन नेवारे, ऋषभ पांडे, दीपक डोंगरवार, मनीषा मेश्राम, दीपक राऊत, महेश राऊत,शिल्पा खांडेकर, अश्विनी शहारे उपस्थित होते.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/231019/">अहेरी येथील घटनेच्या निषेधार्थ न.पं. कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>गोंदियातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा लाक्षणिक संप</title>
		<link>https://www.berartimes.com/vidarbha/231017/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 10 Jun 2026 10:30:30 +0000</pubDate>
				<category><![CDATA[विदर्भ]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=231017</guid>

					<description><![CDATA[<p>गोंदिया : आरटीओ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (दि. ९) एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. गोंदिया येथील आरटीओ कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर निदर्शने करून त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. तसेच शासनाने यानंतरही शासनाने तोडगा काढला नाही, तर १६ जूनपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. यामुळे वाहन परवाने, वाहन नोंदणी, कर भरणा यासह सर्व [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/231017/">गोंदियातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा लाक्षणिक संप</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>गोंदिया :</strong> आरटीओ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (दि. ९) एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. गोंदिया येथील आरटीओ कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर निदर्शने करून त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. तसेच शासनाने यानंतरही शासनाने तोडगा काढला नाही, तर १६ जूनपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. यामुळे वाहन परवाने, वाहन नोंदणी, कर भरणा यासह सर्व आरटीओ सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.<br />
संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार मोटार वाहन विभाग आणि शासन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तोडगा न निघाल्याने आंदोलनाचा इशारा कायम ठेवण्यात आला आहे. सेवा प्रवेशोत्तर नियम प्रलंबित २३ सप्टेंबर २०२२ रोजी शासनाने विभागाचा कृतिबंध मंजूर केला आहे. मात्र, आजतागायत सेवा प्रवेशोत्तर नियम तयार झालेले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. विभागातील ५६ कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली पदोन्नती रद्द करून त्यांना पदावनत करण्यात आले आहे.<br />
कालबद्ध पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, वर्ग-२ प्रशासकीय अधिकारी पदावरील पदोन्नती, तसेच प्रतिनियुक्तीवरील बदल्या या विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ३ जून रोजी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने पुन्हा तांत्रिक मुद्दे उपस्थित करून प्रश्न लांबणीवर टाकला, असा आरोप संघटनेने केला आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास १६ जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/231017/">गोंदियातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा लाक्षणिक संप</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>10 June berar times page</title>
		<link>https://www.berartimes.com/e-paper/231012/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 10 Jun 2026 02:28:37 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ई पेपर]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=231012</guid>

					<description><![CDATA[<p>The post <a href="https://www.berartimes.com/e-paper/231012/">10 June berar times page</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<div class="wp-block-pdfemb-pdf-embedder-viewer"><a href="https://www.berartimes.com/wp-content/uploads/2026/06/10-June-berar-times-page.pdf" class="pdfemb-viewer" style="" data-width="max" data-height="max" data-toolbar="both" data-toolbar-fixed="on">10 June berar times page</a></div>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/e-paper/231012/">10 June berar times page</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
	</channel>
</rss>
