शिवसेनेला राज्यातील सरकार पाडण्यास मदत करेल राष्ट्रवादी !

0
17

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे दिल्लीतील निकालानंतर राज्यात ठिणग्या पडणार आहेत. मलिक यांनी जर राज्यातील सरकार शिवसेना पाडणार असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या पाठीशी उभे राहील असे वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात देखील ट्विस्ट निर्माण झाले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या लाट आणि सुनामी वक्तव्याला भाजपने हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडून दाखवा, असे प्रत्युतर शिवसेनेला दिले आहे. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दिल्लीत भाजपवर पराभवाची नामुष्की ओढावल्यानंतर निशाणा साधला आणि लाटेपेक्षा सुनामी कधीही मोठी असते, असे म्हणत दिल्लीचा पराभव मोदींचाच आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते.