ओडिशात वीज कोसळून 32 ठार

0
8

भुवनेश्‍वर ( पीटीआय) – ओडिशातील विविध भागांमध्ये वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत 32 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आपात्कालीन विभागाने दिली आहे. भद्रक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत वीज कोसळून सर्वाधिक आठ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, बालासोर येथे सात, खुरदा येथे पाच आणि मयूरभंज जिल्ह्यातील तीन जण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. इतर जिल्ह्यांतील काही नागरिकांचाही यात समावेश असल्याचे आपात्कालीन विभागाच्या वतीने सांगण्यात आले. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी मृतांच्या नातेवाइकांना मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले.