पदाधिकारी – कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न
गोंदिया ,दि.06- आम्ही घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. मात्र, आज आलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेनेच योग्य ठरवले आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी विरोधकांवर टीका केली. तसेच, भाजपबरोबर गेलो म्हणजे आम्ही जातीयवादी झालो असा आरोप करण्यात येतो. मात्र, ज्यावेळी भाजपला पाठिंबा दिला त्यावेळी आम्ही जातीयवादी नव्हतो का? रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी भाजपसोबत जाण्यासाठी साहेबांची भेट घेतली होती मग ते काय होते? असा सवालही तटकरे यांनी उपस्थित करीत घड्याळ मात्र तेच कायम असून फक्त वेळ नवी असल्याचे गोंदियातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते म्हणाले.
दरम्यान, राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्याबद्दल गोंदियाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा सन्मान करण्यात आला.राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला चांगलं यश मिळालं असून भाजपा, शिंदे गट आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अनुक्रमे एक, दोन आणि तिसऱ्या क्रमांकाने आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे.त्यामुळे, महायुती सरकारमधील नेतेमंडळीला आनंद झाला असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया देताना, अजित पवारांचा निर्णय योग्य असल्याचे जनतेने दाखवून दिल्याचं म्हटलं.
राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यापैकी जवळपास निम्म्या ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. त्यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांची जोरदार मुसंडी मारल्याचे दिसत आहे. तर काँग्रेससोबतच शरद पवार गट आणि ठाकरे गटाची मोठी पिछेहाट झाली आहे. आतापर्यंत १३२२ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामध्ये महायुतीने तब्बल ७८८ जागांवर बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीला २९२ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला आहे. तर इतरांना १६२ ठिकाणी विजय मिळाला आहे.
याप्रसंगी बोलतांना खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की,अजितदादा पवार व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खा.प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला पण महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा व धर्मनिरपेक्ष विचारांशी तडजोड केले नसल्याचे म्हणाले.सत्तेसाठी व केंद्रीय यंत्रणेच्या बचावासाठी सत्तेत सहभागी झाल्याचा आभास विरोधकांकडून निर्माण केला जातो. पण विकासासाठी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सत्तेत आलो आहोत. ते पुढे म्हणाले भिन्न विचारसरणींचे पक्ष सरकार गठित करण्यासाठी एकत्रित येतात, 2019 मध्य शिवसेना भिन्न विचारधारा असून सोबत आले असे सांगत देशात विचारधारा वेगळी असून सरकार स्थापन झाले आहेत याचा सविस्तर आढावा प्रदेशाध्यक्षांनी उपस्थितां समोर मांडला. त्यामुळे आम्ही जी भूमिका घेतली ती काही वेगळी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली जो आपण निर्णय घेतला तो कोणत्याही यंत्रणेच्या भीतीपोटी घेतलेला नसून लोकशाहीच्या सिद्धांतावर विश्वास ठेवून तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व राज्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतलेला आहे ही भूमिका आपण जनसामान्यांपर्यंत पोहचवायला हवी असे आवाहन प्रदेशाध्यक्षांनी केले.
यावेळी सर्वश्री प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम,राष्ट्रीय सचिव राष्ट्रवादी काग्रेसं राजेन्द्र जैन,आमदार मनोहर चंद्रीकापुरे,युवक काँग्रेस अध्यक्ष सुरज चव्हान,राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर,प्रशांत कदम,सुनिल मगरे,कल्याण आखाडे,ईश्वर बाळबुध्दे,जिल्हा अध्यक्ष गंगाधर परशुरामकर,निखिल ठाकरे,नरेश माहेश्वरी,केतन तुरकर, राजलक्ष्मी तुरकर,जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर,जि.प.सभापती पुजा अखिलेश सेठ, सुरेश हर्षे,पंचायत समिती उपसभापती निरज उपवशी, गणेश बरडे, प्रभाकर दोनोडे, रफीक खान, मोहन पटले,रमेश ताराम, अजय गौर, योगेन्द्र भगत, डॉ. अविनाश जायस्वाल, माधुरी पालीवाल, लक्ष्मीताई सावरकर, विशाल शेंडे, प्रेम रहांगडाले, बालकृष्ण पटले, कुंदन कटारे, केवल बघेले, डॉ. अजय उमाटे, सुरेश हर्षे, सी के बिसेन, अशोक सहारे, कृष्णकुमार बिसेन, ममता बैस, जया धावडे, सतीश देशमुश, सुनिल भालेराव, विनीत सहारे, सचिन शेंडे, नानु मुदलीयर, राजेश भक्तवर्ती, कमलबापु बहेकार, माधुरी नासरे, प्रियाताई हरिणखेडे, दुर्गा तिराले, कुंदा दोनोडे, आशा पाटील, सुनील पटले, शैलेश वासनिक व शेकडोच्या संख्येने कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रवि मुंदडा व आभार कुंदन कटारे यांनी केले.