प्रश्नांना घेवून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा

0
77

गोंदिया-भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या आव्हानानुसार आज 30ऑगस्ट रोजी नेहरू चौक येथून मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालया शमक्ष निदर्शने आंदोलन करण्यात आले. या माध्यमाने राज्याचे मुख्यमंत्री यांचे नांवे उप विभागीय अधिकारी यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.
मोर्चाच्या मुख्य मागण्यानं मध्ये “जात निहाय जनगणना करा, आरक्षणाची 50% मर्यादा उठवा, सर्व कामगारांना पंचवीस हजार रुपये किमान वेतन करा, कष्टकरी वर्गाला साठ वर्षांनंतर पाच हजार रुपये पेन्शन द्या , कामगार भरती करा, महंगाई कमी करा, कंत्राटी करण खाजगीकरण थांबवा ,प्रीपैड स्मार्ट मीटर मागे घ्या, महिला मुली यांच्यावरील अत्याचार तातडीने थांबवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यास जबाबदारांवर कारवाई करा,मागेल त्याला रेशन द्या, शिक्षणाचा बाजार थांबवा , शेतीमालाला हमीभाव द्या ,स्वामीनाथन आयोग लागू करा,अतिक्रमित धारक वनजमीन, गायरान जमीन धारकांना पट्टे, महिलांवर अत्याचार करणाऱ्यानां कडक शासन करावे त्यांना संरक्षण देणाऱ्या प्रशासनावर व राजकीय कार्यकर्त्यावर कार्यवाही करा, घरकुल व निराधारांचे थकीत अनुदान त्वरित द्या, घरकुलसाठी पांच लाख रुपयाचे अनुदान,अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या,जिल्हा परिषद शाळेचे खाजगीकरण बंद करा, शेतमजूरासाठी केंद्रीय कायदा करा, प्राथमिक आरोग्य केंद्र व सरकारी दवाखान्यातील सर्व रिक्त पदे भरा इत्यादी मागाण्यांना घेवून झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व हौसलाल रहांगडाले, मिलिंद गणवीर, रामचंद्र पाटील, करुणा गणवीर, परेश दुरुगवार, शेखर कनोजिया, प्रल्हाद उके, शालूताई कुथे, गुणतराव नाईक, अशोक मेश्राम, कल्पना डोंगरे, सुरेश रंगारी,पौर्णिमा चुटे यांनी केले या आंदोलनात जिल्ह्यच्या सर्व तालुक्यातील स्त्री पुरुष मोठ्या संख्येत शामिल झाले.