मणिपूरमध्ये भाजपाकडून सत्तेसाठी पैशाचा वापर- इरोम शर्मिला

0
16

कोइम्बतूर, दि. 14 – मणिपूरमध्ये सत्तेचा तिढा कायम असतानाच सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. मणिपूर राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भाजपानं वारेमाप पैसा आणि शक्तीचा वापर केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी केला आहे.
मणिपूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक 28 जागा मिळून क्रमांक 1चा पक्ष ठरला आहे. मात्र तरीही मणिपूरमध्ये सत्ता स्थापन करण्याचा भाजपाने दावा केला आहे. मणिपूरमध्ये भाजपा दोन नंबरचा पक्ष ठरला असतानाही भाजपाकडून एन. बिरेन सिंह यांची मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.