नागपूर व भंडारा येथे काँग्रेसने पाळला काळादिवस

0
25

भंडारा/नागपूर,दि.09 : नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील दहशतवाद, नक्षलवादाला आळा बसेल. चोरांचा काळा पैसा बाहेर बाहेर येईल. रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील. देशाची अर्थव्यवस्था भक्कम होईल, असा दावा केला होता. परंतु या आत्मघातकी निर्णयामुळे बँकांसमोरील रांगेत शेकडो लोकांचे बळी गेले. रोजगार हिरावला गेला. व्यापारी, शेतकरी व मजूर अशा सर्वांनाच या निर्णयाचा फटका बसला. भाजपा नेत्यांचा व बड्या उद्योगपतींचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला, अशी घणाघाती टीका विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी नागपूरात केली.
८ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्री पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला वर्ष पूर्ण होत असल्याने केंद्र व राज्य सरकारचा निषेध म्हणून काँग्रेसने काळा दिवस पाळला. शहर काँग्रेसतर्फे टेलिफोन एक्सचेंज चौकात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. या वेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री, अ‍ॅड. अभिजित वंजारी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक बंटी शेळके, महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, सेवादलाचे अध्यक्ष रामगोविंद खोब्रागडे, माजी महापौर नरेश गावंडे, जयंत लुटे, युवा नेते विशाल मुत्तेमवार, नगरसेवक संजय महाकाळकर, प्रशांत धवड, अशोक बांते, रमण पैगवार, गजराज हटेवार, नितीन साठवणे, राजेश कुंभलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नोटाबंदीच्या काळात रांगेत उभे राहून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. विलास मुत्तेमवार यांनीही नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली. नोटाबंदीमुळे देशाची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे अ‍ॅड. अभिजित वंजारी म्हणाले. उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, बंटी शेळके, रामगोविंद खोब्रागडे आदींनी सरकारच्या धोरणावर टीका केली.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी गळ्यात काळे दुपट्टे व हाताला काळ्या पट्ट्या बांधून तसेच काळे झेंडे उंचावून नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध केला. ‘वारे मोदी तेरा खेल , नोटबंदी हो गई फेल ’शेतीमाला भाव द्या, नोटाबंदी भारतीय काळा दिवस, मोदी सरकार हाय हाय अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

23244367_1803932306571961_2318801261540149290_nभंडारा : गेल्या साडेतीन वर्षाच्या काळात मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा एकही निर्णय घेतला नाही. सर्वसामान्यांनी कर रूपाने दिलेले साडे सहा लाख कोटी रूपये उद्योगपतींना वाटले, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी केला.निश्चलनीकरणाच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त ८ नोव्हेंबर हा दिवस काँग्रेसने ‘काळा दिवस’ म्हणून पाळला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भंडारा येथील त्रिमूर्ती चौकात काळ्या फिती लावून काँग्रेसने निदर्शने केली.भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात जीवन जगणे महाग झाले असून केवळ मरण स्वस्त झाले, अशी टीका प्रदेश सचिव प्रमिला कुटे यांनी केली.
यावेळी नोटबंदीच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. निदर्शने कार्यक्रमाचे संचालन महेंद्र निंबार्ते यांनी तर आभारप्रदर्शन सीमा भुरे यांनी केले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रमोद तितिरमारे, अनीक जमा पटेल, धनराज साठवणे, अजय गडकरी, अमर रगडे, राजकपूर राऊत, मनोहर उरकुडकर, आशिष पात्रे, स्वाती लिमजे, रमेश डोंगरे, भूमेश्वर महावाडे, सुनील गिº्हेपुंजे, शंकर राऊत, प्यारेलाल वाघमारे, प्रशांत देशकर, गणेश निमजे, जाबीर मालाधारी, नीळकंठ टेकाम, जनार्धन निंबार्ते, शंकर तेलमासरे, माणिकराव ब्राह्मणकर, मंगेश हुमणे व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, जिल्हा, तालुका, शहर, बुथ कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य, एनएसयूआय, महिला काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.