पावसाळी अधिवेशनाआधी राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार

0
6

कोल्हापूर दि. २५ : पावसाळी अधिवेशनाआधी राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. आत्तापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. त्यामुळे आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांच्या हाती काही लागतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.दरम्यान, काही दिवसाआधीच याविषयी मित्रपक्षांमध्ये बैठक झाली होती. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात तरी मित्रपक्षांना स्थान मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री आणि कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत. “काँग्रेसने सत्तेचे सेवक नव्हे तर दलाल तयार केले. पण आपल्याला सत्तेचे सेवक बनून काम करायचं आहे. सत्ता आल्यानं जबाबदारी संपलेली नाही तर वाढली आहे. त्यामुळे सत्तेच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत करा असं आवाहनंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.