पुन्हा निवडणुका होऊ शकतात: पवार

0
11

पुन्हा निवडणुका होऊ शकतात: पवार

अलिबाग: ‘विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला (भाजप) स्पष्ट बहुमत मिळालेले नाही, त्यामुळे ते सरकार बनवू शकत नाहीत; शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येण्याचेही घडत नाही; ते होत नसल्याने सरकार बनत नाही. अशा परिस्थितीमध्ये दोन पर्याय असू शकतात. एक म्हणजे पाच-सहा महिन्यांसाठी पुन्हा राज्यपालांची राजवट लागू होऊ शकते आणि त्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीच्या मार्गाने जाण्याची शक्‍यता निर्माण होऊ शकते,‘ असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (मंगळवार) व्यक्त केले. अलिबागमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन दिवसांचे अधिवेशन सुरू आहे.त्यावेळी बोलत होते.या अधिवेशऩात आमदार खासदारांना मागर्दशर्न करण्यात येत आहे.याप्रसंगी मंचावर राज्यसभा खासदार प्रफुल पटेल,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,दिलीप बऴसे पाटील यांच्या राष्ट्रवादीचे सवर् नेते उपस्थित होते.