जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

0
138

जळगाव : बंगळुरू एक्सप्रेसच्या धडकेत जळगावजवळील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ (Railway) 8 ते 10 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना घडली. न घडलेल्या घटनेच्या अफवेने क्षणात घात केला अन् 8 ते 10 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. जळगावहून (jalgaon) मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसच्या खाली चिरडल्याची या प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला. जळगावमधील परधाडे स्टेशनजवळ हा भीषण अपघात घडला असून रेल्वे पटरीजवळ प्रवाशांचे मृतदेह पडल्याचं पाहायला मिळालं. या दुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळ होत असून केवळ एका अफवेनं घात गेला अन् क्षणात 8 ते 10 कुटुंबीयांवर मोठं दु:ख कोसळलं. अपघातानंतर ट्रेन रेल्वे स्थानकावर थांबली असून प्रवाशांनी खाली उतरुन मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?

पुष्कप एक्स्प्रेस मुंबईला चालली होती. जळगाव रेल्वेस्टेशन सोडल्यानंतर परधाडे रेल्वे स्टेशनच्या अगोदर रेल्वेने ब्रेक दाबलं. त्यामुळे चाकाचे रुळाशी घर्षण झाले. काही प्रवासी रेल्वेच्या दरवाजात बसले होते. त्यांनी हे घर्षण पाहिले. त्यांना वाटले पुष्पक एक्स्प्रेसला आग लागली. हे प्रवासी आग लागली आग लागली असं म्हणाले. त्यामुळे काही प्रवाशांनी रेल्वेच्या खाली उड्या घेतल्या. यावेळी समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. याच रेल्वेखाली चिरडली गेली. कापली गेली. आता नक्की किती प्रवाशांचा मृत्यू झाला, हे स्पष्ट झालेले नाही, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
आग लागल्याचे कान पडताच उड्या मारल्या
आग लागली असं मेमकं कोण म्हणालं हे नेमकं सांगता येत नाही. मात्र आग लागल्याचे कानी पडताच प्रवाशांनी रेल्वेतून खाली उड्या मारल्या, असंही या प्रवाशाने सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितले?
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत सहा ते आठ प्रवासी समोरून येणाऱ्या रेल्वेखाली चिरडली गेली आहेत. तसेच दुर्घटनेच्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय मदत पाठवली आहे. तसेच जखमींवर उपचार करण्यासाठी रुग्णालये सज्ज ठेवण्यात आल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता?
सध्यातरी या दुर्घटनेत नेमके किती प्रवासी समोरून येणाऱ्या रेल्वेखाली चिरडले गेले आहेत, याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. मात्र सध्या वैद्यकीय मदत, रेल्वे पोलीस, जळगाव जिल्ह्याचे पोलीस दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचली आहेत. जखमींवर रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. दरम्यान, या दुर्घटनेची जलगाव जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी दखल घेतली असून योग्य ती मदत आणि कार्यवाही करण्याचा आदेश प्रशासनाला देण्यात आला आहे.