ग्राहकांना शाश्वत वीज सेवा देण्यावर भर देणार – चंद्रशेखर बावनकुळे

0
11

चंद्रपूर दि. १३:ग्राहक हाच आपला केंद्रबिंदू असून ग्राहकांना शाश्वत वीज सेवा देण्याचे कार्य महावितरण कंपनीचे आहे. ग्राहकांना सेवा देण्याची जबाबदारी महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची असून ती सेवा वेळेत देण्यासाठी सर्वांनीच जबाबदारीने व गांभीर्यांने आपली सेवा बजावावी, असे आवाहन नवीन व नवीकरणीय व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

चंद्रपूर परिमंडळ कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, महापौर राखी कंचर्लावार, आमदार शोभाताई फडणवीस, नानाभाऊ शामकुळे, डॉ. देवराव होळी, उपमहापौर वसंत देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, महावितरणचे कार्यकारी संचालक संजय ताकसांडे, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता प्रसाद रेश्मे, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अंकुश नाळे आदी उपस्थित होते.