गोंदिया : ओबीसींच्या विविध प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यासाठी जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समतीच्या शिष्टमंडळाने रविवारी खा. नाना पटोले यांची भेट घेवून चर्चा केली. दरम्यान पटोले यांना विविध समस्यांचा उल्लेख असलेले निवेदन सादर करण्यात आले. नागपूर येथे झालेल्या बैठकीत खा. पटोले यांनी सांगितले की, चंद्रपू जिल्ह्यातील लोकेश येरणे या विद्यार्थ्याला शिष्यवृती न मिळाल्याने त्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण झाला. परिणामी निराश होवून त्याने आत्महत्या केली. ही ओबीसी समाजासाठी धोक्याची घंटा आहे. या विषयावर तसेच जनगणना, शिष्यवृती आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्नी फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक आयोजित करून चर्चा करू, असे आश्वासन दिले. यावेळी आनंदराव कृपाण, बबलू कटरे, अमर वराडे, आशिष नागपूरे, खेमेंद्र कटरे, कैलास भेलावे उपस्थित होते.