न्यायासाठी सर्वपक्षीय ओबीसींनी एकत्र यावे-प्राचार्य तायवाडे

0
14

-८ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर ओबीसी मोर्चा
-२७ नोव्हेंबरला नागपूरात ओबीसी महिला मेळावा
नागपूर दि. १९: समाजातील सर्वात मोठा घटक ओबीसी असतानाही, सरकारने ओबीसींवर अन्यायच केला आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून पुन्हा ओबीसींची शक्ती एकवटली आहे. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय व्हावे, अशी मागणी सर्वस्तरावरून होत असल्याने या मागणीसाठी येत्या हिवाळी अधिवेशनावर ओबीसींचा भव्य मोर्चा ८ डिसेंबर रोजी काढण्यात येणार आहे. ओबीसींच्या न्यायासाठी सर्वपक्षात असलेल्या ओबीसी आघाडीच्या प्रतिनिधींनी, लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरुन ओबीसींसाठी एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी केले.
ते येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या विदर्भ स्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्याथ्र्यांच्या बैठकीत रविवारी बोलत होते.
प्राचार्य तायवाडे म्हणाले की, ७ ऑगस्टला पार पडलेल्या ओबीसी महाअधिवेशनाची दखल राज्य सरकारलाच नव्हे तर केंद्र सरकारलाही घ्यावी लागली आहे. महाअधिवेशनाच्या यशानंतरच ओबीसी क्रिमिलीअर उत्पन्न मर्यादेचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांना स्वत: पुढाकार घेऊन काढावे लागले आहे. तर केंद्रामध्ये क्रिमिलीअरच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. असे असले तरी आमच्यावर लादलेली असंवैधानिक क्रिमिलीअरची अट कायमची रद्द करण्यात यावी, ही मुळ मागणी असल्याचे म्हणाले. ओबीसींच्या विकासासाठी केंद्र व राज्यात ओबीसी मंत्रालयाची नितांत गरज आहे. तर केंद्र सरकार देत असलेले ओबीसी शिष्यवूत्तीची शंभर टक्के रक्कम विद्याथ्र्यांना देण्यात यावे. तसेच ५० टक्के कपात करणाèया अधिकाèयांवर कारवाई व्हावी, अशी भूमिका यावेळी व्यक्त केली. सोबतच येत्या २७ नोव्हेंबरला संविधान दिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन करण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.
बैठकीला पूर्व विदर्भातून महासंघाचे व वेगवेगळ्या आघाडींचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यात सचिन राजूरकर, शरद वानखेडे, बबलू कटरे, गुणेश्वर आरीकर, डॉ. एम.जी. राऊत, मनोज चव्हाण, महेंद्र निंबार्ते, गोपाल सेलोकर, भूषण दडवे, खेमेंद्र कटरे, अजय तुमसरे, डॉ. छाया दुरुगकर, निकेश पिने, प्रमोद मुन, विनोद उल्लीपवार, डॉ. छाया दुग्रकर, वैशाली बोकडे, कृष्णा देवासे, डॉ. गजानन धांडे, खुशाल बावणे, प्रा.रमेश पिसे, वैशाली काळे, अनिता ठेंगळी, डी.डी. पटले, प्रा. अमीत मांढरे, माजी आमदार सुदर्शन निमकर, गोविंद वरवाडे, पांडूरंग काकडे, उज्वला महल्ले, शामल चन्ने, राकेश रोकडे, निलेश कोडे, रोशन कुंभलकर, सुरेखा रडके, विनोद हजारे, राजेश ठाकरे, प्राचार्य टाले, प्रा.मस्के, संजय भिलकर, पन्नालाल राजपूत, अरविंद जायस्वाल, सूर्यकांत जायस्वाल, रमेश कोलते, प्रदीप कोल्हे, नाना लोखंडे, विजय तपाटकर आqदनी आपले विचार व्यक्त केले. तसेच मोर्चा अधिकाधिक व्यापक होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बैठका, विदर्भस्तरीय महिला मेळावा व विद्याथ्र्यांचे अधिवेशन याच्या आयोजनासंदर्भातही चर्चा करण्यात आली. अभियात्रिकीमधील अ‍ॅरोनॉटिकल इंंजि.च्या ओबीसी विद्याथ्र्यांना नाकारण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये संघटन तयार करण्यासंदर्भात चर्चा करुन नागपुरातील प्रत्येक समाज भवनात ओबीसी महासंघाची बैठक आयोजित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.