पत्रकार श्रीमती गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ निवेदने-निदर्शने

0
12

नागपूर,दि.07 : लोकशाहीत प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु लोकशाहीसाठी आपल्या लेखणीचा वापर करणाºयांच्या सातत्याने हत्या होत असतील तर हे लोकशाहीची हुकूमशाहीकडे वाटचाल होत असल्याचे प्रतीक आहे. बंगळुरूमधील आघाडीच्या पत्रकार गौरी लंकेश यांची हत्याही दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येसारखी विचारांना दडपण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे गौरी लंकेश यांच्या मारेकºयांना कठोर दंड करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र दक्षिणायनच्या वतीने संविधान चौकात निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र दक्षिणायनच्या वतीने संविधान चौकात आयोजित निदर्शने आंदोलनात उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करीत गौरी लंकेश यांच्या मारेकºयांना कठोर दंड देण्याची मागणी केली. ‘हिटलरशाही नही चलेगी’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी गौरी लंकेश यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी बोलताना आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, शासन कोणत्याही पक्षाचे असो, संविधानातील मूल्ये, जीवनाच्या दृष्टीनुसार चालावयास हवे. संविधानाच्या विरोधात जाऊन कुणालाही शासन करता येणार नाही. अशाप्रकारे विचार मांडणाºयांची हत्या करणे म्हणजे संविधानाच्या मार्गाने जाणाºया शक्ती नष्ट करणे होय. शासनाने लंकेश गौरी यांच्या मारेकºयांना कडक शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार म्हणाले, देशात विचारांना संपविण्याची प्रवृत्ती वाढत आहे. अशा हत्या करणे बहादुरीचे काम नाही. लोकशाहीसाठी लेखणीचा वापर करणाºयांची हत्या होत असेल तर ही धोक्याची घंटा आहे. ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे यांनी गौरी लंकेश यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. सुनिती देव म्हणाल्या, संविधानानुसार प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु हत्येचा मार्ग अवलंबत अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्यात येत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आंदोलनात अमिताभ पावडे, हरीश देशमुख, ताराचंद शर्मा, अजय शाहू, दिलीप खैरकर, कॉंग्रेस सेवादलाचे शहर मुख्य संघटक रामगोविंद खोब्रागडे, प्रभू राजगडकर, सुरेखा देवघरे, डॉ. रेखा बाराहाते, श्याम काळे, संगीता महाजन यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

408-1भंडारा- पुरोगामी, धर्मनिरपेक्ष विचाराच्या निर्भिड पत्रकार व डाव्या पक्षाच्या सहानुभूमिदार श्रीमती गौरी लंकेश बेंगलोर यांच्या दि. ५ सप्टेंबरला धर्मांध व सांप्रदायिक विचाराच्या लोकांनी गोळया घालून केलेल्या खुनाचा तीव्र निषेध करण्यासाठी व मारेकèयांना पकडण्याच्या मागणीसाठी प्रधानमंत्री भारत सरकार व मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांचे नावे जिल्हाधिकाèयामाङ्र्कत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात भाकपचे कॉ. हिवराज उके, कॉ. सदानंद इलमे, भारती मु्नती मोच्र्याचे बळीराम सार्वे, समता सैनिक दलाचे एम. आर. राऊत, सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड, महेंद्र वाहने, खुशाल लिमजे, भारीत बहुजन महासंघाचे रंजित कोल्हाटकर, रिपब्लीकन सेवेचे अचल मेश्राम, प्रदीप गेडाम व राजन मेश्राम इत्यांदीचा समावेश होता. निवेदन सादर करण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भंडारा येथे दिवंगत जेष्ठ पत्रकार श्रीमती गौरी लंकेश यांना श्रद्धांली अर्पण करण्यात आली. सदर निवेदनात ज्याप्रमाणे दोनवर्षी डॉ. कुलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा खून करण्यात आला. अजून त्यांच्या मारेकèयांचा थांगपत्ता लागला नाही. त्याबद्दल चिंता व शोकांतिका व्य्नत करण्यात आली. अगदी त्याचप्रमाणे श्रीमती गौरी लंकेश यांचा खून करण्यात आला. मारेकरी पसार झाले. त्या मारेकèयांना व त्यांच्या सुत्रधारांना त्वरीत पकडण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

गोरेगाव-येथील तालुका पत्रकार संघाच्या बैठकीत वरिष्ठ पत्रकार गौरी शंकर यांच्या हत्येचा निषेध नोंदवून श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष हौसलाल रहागंडाले,सचिव डिलेश्वर पंधराम,संतोष नागनाथे,रंजीत सरोजकर,खेमेंद्र कटरे,नरेंद्र रामटेके,अनिल मदनकर,मनोज सरोजकर,नरेंद्र भड,उत्तम रामटेके,शालीकराम कोल्हे,प्रमोद नागनाथे,राजू मेश्राम,बुधराम  बिजेवार आदी उपस्थित होते.