नागपूरमुळे भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विकास पागल झाला- खा.नाना पटोले

0
33

लाखनी,दि.01 : भंडारा गोंदिया क्षेत्राचा विकास काही मोठ्या राजकारण्यांनी  हेतूपूरस्पर अडकाऊन ठेवला आहे. आणि त्याच कारणामुळे भंडारा गोंदिया जिल्ह्यात सुद्धा विकास पागल झाला असून नागपूरमुळे गोंदिया जिल्ह्यातील विकास पागल झाल्याचा घणाघाती आरोप खासदार नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे आयोजित दसरा उत्सवा निमित्त शनिवारला केला. खा.पटोले पुढे म्हणाले की भंडारा गोंदिया क्षेत्राचा विकास खुंटलेला आहे. अदानी विडिओकॉन सारख्या कंपण्या असून सुद्धा त्याच्या फायदा जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना झाला नाही. त्यामुळेच सतत क्षेत्रामध्ये बेरोजगारी वाढत चालली आहे.साकोली तालुक्यात लवकरच भेल कंपनीचा शुभारंभ करणार असे सुद्धा त्यांनी सांगितले भेलचे सर्व अडथळे दूर करण्यात यश आले आहे आता लवकरच  क्षेत्रातील अडीच ते तीन हजार बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल असेही सांगायला मात्र विसरले नाहीत.
खासदार पटोले यांनी  नोटबंदी व जिएसटीमूळे मंदीचे सावट निर्माण झाले आहे.जिएसटीमुळे व्यापार मंदावला.तर  पेट्रोल 35 ते 40 रुपयांच्या दराने उपलब्ध व्हायला पाहिजे, परंतु सरकारने पेट्रोल चे दर 80 रुपये प्रति लिटर करून सामान्य नागरिकांची कंबर मोडली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात जिएसटी व पेट्रोल मुळे मिडनाऱ्या कराचा उपयोग किती प्रमाणात सामान्य नागरिकांना होतो याच जाब येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला विचारणारही म्हणाले.सरकारच्या मनमानी कारभारामूळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे लवकरच जिल्ह्याच्या व महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने नवीन पाऊल उचलण्याच्या प्रयत्न करणार त्यावेळी सुध्दा आपला आशिर्वाद मला मुलगा व भाऊ समजून द्याल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

दसरा उत्सवाच्या कार्यक्रमाला साकोली विधानसभा मतदारसंघाचे भाजप चे  आमदार बाळाभाऊ काशीवर उपस्थित होते. मात्र नागपूर मध्ये आयोजित एका कार्यक्रमात नानाभाऊनी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपामुळे विधानपरिषदेचे भाजपचे आमदार परिनय फुके यांची गोची झाली होती. त्यामूळे आज पुन्हा एकदा नानाभाऊ दसरा उत्सवाच्या कार्यक्रमातून नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागनार या भीतीमुळेच दसरा उत्सवाच्या कार्यक्रमाला आमदार फुके  उपस्थित राहिले नसल्याची चर्चा होती.