मोहाडी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा-राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

0
12

मोहाडी : तालुक्यात या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकाचे फार मोठे नुकसान झाले. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रुपये भरपाई देण्यात यावी, शेतकरी विरोधी भूमिअधिग्रहण कायदा त्वरित रद्द करावा, धानाचे भाव तीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढविण्यात यावे, शेतकर्‍यांचे संपूर्णपीक कर्ज माफ करावे, विद्युत बिल माफ करावे, रोजगार हमी योजनेच्या कामांना त्वरित मंजुरी देण्यात यावी, नॉन बीपीएल कुटुंबांना धान्य पुरवठा करण्यात यावा, केरोसिनचा कमी केलेला पुरवठा पूर्ववत करण्यात यावा, धानावरची निर्यातबंदी उठविण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन मोहाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुख्यमंत्र्यांना तहसीलदारामार्फत पाठविण्यात आले. याच आशयाचे निवेदन राष्ट्रवादी महिला काँग्रेस व महात्मा फुले समता परिषदेतर्फेसुध्दा देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वासुदेव बांते, महासचिव विजय पारधी, कमलेश कनोजे, केशव बांते, उमेश बुराडे, किरण अतकरी, अशोक धारगावे, कार्तिक ईश्‍वरकर, प्रमिला साकुरे, शुभांगी इश्‍वरकर, मनीषा गायधने, कौशल्या निखारे, रजनी सरोदे, कविता मेo्राम, प्रभा बांते, सुनील मेo्राम यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.