विविध सिंचन प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देणार-मुख्यमंत्री फडणवीस

0
9

तिरोडा नगरपरिषदेच्या भुयारी गटार योजनेला मंजुरी

तिरोडा,दि.23:- गरीब, शेतकरी, आदिवासी तसेच सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनात परिवर्तन घडवून सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत आहे.तिरोडा शहरातील विविध विकासकामासांठी तसेच भंडारा व गोंदिया जिल्हयातील विविध सिंचन प्रकल्पांसाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येईल,अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. तिरोडा येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर विविध सिंचन कामांचे भूमीपूजन व लोकार्पण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते,त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार विजय रहांगडाले, नगराध्यक्ष अशोक इंगळेे,आशिष बारेवार,उपाध्यक्ष सुनिल पालांदूरकर, माजी आमदार हेमंत पटले,हरिष मोरे,भजनदास वैद्य,केशवाराव मानकर,माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे,जि.प.कृषी सभापती शैलजा सोनवाने,सुरेश रहागंडाले,जिल्हाधिकारी कादबंरी बलकवडे,मुकाअ राजा दयानिधी,विभागीय आयुक्त संजिवकुमार,विदर्भ पाटबंधारे विभागाचे संचालक सुर्वे,पंकज रहागंडाले,रविकांत बोपचे,डाॅ.लक्ष्मण भगत, बाळूभाऊ मलघाटे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यात येत असून तिरोडा तालुक्यातील सिंचनाच्या कामांना गती देण्यात येत आहे. धापेवाडा सिंचन योजना या परिसरासाठी अत्यंत महत्वाची आहे. धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा दोनसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून यापुढेही शंभर कोटी रुपयांचा अधिकचा निधी देण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या तिसèया टप्प्यानंतर या क्षेत्रातील सिंचनाची क्षमता ९१ हजार हेक्टरपर्यंत पोहोचणार आहे. यामुळे दोन्ही जिल्हे सुजलाम सुफलाम होतील. गोसेखुर्द प्रकल्पाद्वारे ५० हजार हेक्टर पर्यंत सिंचन क्षेत्र पोहोचले आहे. हा प्रकल्प लवकरच पुर्णत्वाला जाईल.
कृषी विकासाबाबत श्री फडणवीस म्हणाले, शेतकèयांना ५० हजार कोटींची मदत करण्यात आली असून यावर्षी सात हजार कोटी रुपयांची मदत करण्यात येत आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यात ५१ लाख शेतकèयांना २१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. तिरोडा तालुक्यातील काही उर्वरीत शेतकèयांनाही या योजनेचा लाभ देण्यात येईल. कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. शेतकèयांना त्यांच्या खात्यात सहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत असून ७५ हजार कोटी रुपयांची तरतुद यासाठी करण्यात आली आहे. यामध्ये दरवर्षी वाढही करण्यात येणार आहे. शेतकरी कंपन्या व गट तयार करुन शेतकèयांना सक्षम करण्यात येत आहे. रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट समोर ठेवून शेतीवर आधारीत उद्योगासाठी वल्र्ड बँकेच्या माध्यमातून दहा हजार गावातील प्राथमिक सोसायटयांना बळकट करण्यात येत आहे.विविध योजनांसदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत पाच लाख गरीबांना घरे देण्यात आली असून यापुढेही पाच लाख गरीबांना घरे देण्यात येत आहे. गरीबांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यात येत आहेत. तिरोडा शहरातील पिण्याच्या पाण्याच्या योजनेला मान्यता देण्यात आली असून शहरातील भुयारी गटार योजनेसाठी तसेच नगरपालिकेची इमारत,नाटयगृहे यांच्या उभारणीसाठीही भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.अशी घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

सिंचन क्षेत्रात राज्याची भरीव कामगिरी- केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी

वन, खनिज आणि अन्य बाबतीतही विदर्भ संपन्न प्रदेश आहे. विदर्भाच्या सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यावर भर देण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियान , प्रधानमंत्री सिंचन योजना यासारख्या योजनांच्या माध्यमातून या प्रयत्नांना गती देण्यात येत आहे.यापुढे आता कॅनॉलऐवजी पाईपने पाणी देण्यात येणार आहे. सिंचन क्षेत्रात राज्य अग्रेसर आहे. देशात व राज्यात रस्तेविकासाची कामेही वेगात सुरु आहेत. गंगा नदी शुध्दीकरणाचे कामही युध्दपातळीवर सुरु असून आगामी वर्षात गंगा नदी पूर्णपणे शुध्दीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे. शेतकèयांनी यापुढे पीक पध्दतीत बदल करण्याची आवश्यकता असून जैवइंधनासाठी आवश्यक पीके घेण्यावर शेतकèयांनी भर देण्याचे आवाहनही श्री गडकरी यांनी केले.सोबतच मामा तलाव,नद्या आणि नाल्यांचे खोलीकरण करुन पाण्याची पातळी वाढविण्यासाठी आपल्या भागात जे राष्ट्रीय महामार्ग तयार होत आहेत त्याठिकाणी लागत असलेली माती व मुरुम हे त्या तलाव,नदी व नाल्यातून काढण्याची परवानगी जिल्हाप्रशासनाने त्या कंत्राटदाराला दिल्यास शासनाचा पैसाही वाचेल आणि मामातलावातसह नदी व नाल्यातील गाळ निघून त्याचे खोलीकरण होईल यासाठी विभागीय आयुक्तांनी तशा सुचना सर्वांना द्यावे असे निर्देशही यावेळी दिले.तसेच येत्या ३ महिन्यात आपण देव्हाडा येथील साखर कारखान्यात तणसापासून बायोसीएनजी गॅस तयार करणारा प्रकल्प सुरु करणार असून आपले उसाचे रखडेले पैसेही लवकरच मिळतील अशी ग्वाही दिली.

प्रफुल व नानांचा विकास हा धंदाच नव्हता-राजकुमार बडोले
जिल्हयात रस्तेविकासाची कामे वेगात सुरु असून गरीबांपर्यंत विविध योजना पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्हयातील विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात आली असून हे सर्व प्रकल्प लवकरच पूर्ण होतील व शेतकèयांना सिंचनाचा लाभ मिळेल. शेतकरी व आदिवासी यांनाही विविध योजनांतर्गत लाभ देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बडोले यांनी सांगितले.१००० रुपयापेक्षा अधिक दर धानाला भेटला नाही, ओबीसीच्या मुलांना शिक्षन मिळाले नाही पण गेल्या साडेचार वर्षात एवढी कामे झाली की रस्ते चमकायला लागली. प्रफुल व नाना ने फक्त विकासाची स्वप्ने दाखविली,विकास हा त्यांचा धंदा नव्हता तर खांद्यावर हाथ आणि मागून लाथ हीच त्यांची परंपरा राहिल्याची टिका केली.
आमदार विजय रहांगडाले म्हणाले, धापेवाडा सिंचन प्रकल्पाची उभारणी येथील शेतकèयांच्या समृध्दीसाठी झाली असून टप्पा दोन व तीनच्या पूर्णत्वानंतर या परिसरातील शेतकèयांना शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल. सर्व रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या परिसरात जैव इंधनसाठी आवश्यक असणारी पीकेही घेण्यात येत आहेत. तिरोडा शहरातील नवी पाणी पुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होऊन पूर्ण होईल असा विश्वासही आमदार रहांगडाले यांनी व्यक्त केला.संचालन मंजुश्री देशपांडे तर आभार मदन पटले यांनी मानले.
यावेळी धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा एक चे लोकार्पण , धापेवाडा उपसा सिंचन टप्पा दोन, बोदलकसा चोरखमारा पाईपलाईन व पम्प हाऊसचे भूमीपूजन,धापेवाडा उपसा सिंचन टप्पा एक खरबंदा जलाशयात पाईपलाईनद्वारे सोडलेल्या पाण्याचे पूजन, बाम्पेवाडा(एकोडी) – वडेगाव – तिरोडा ते खैरलांजी रस्ता बांधकामाचे भूमीपूजन , तिरोडा – रामटेक – मन्सर रस्ता बांधकामाचे भूमीपूजन, गोंदिया – गोरेगाव(घोटी) रस्तेबांधकामाचे भूमीपूजन, तिरोडा शहर पाणीपुरवठा योजना नुतनीकरण व नवीनकरण भूमीपूजन , तिरोडा नगरपरिषद अंतर्गत रस्ते बांधकामाचे भूमीपूजन, गोरेगाव नगरपंचायत अंतर्गत रस्ते बांधकामाचे भूमीपजून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.