
अर्जुनी-मोर,दि.21ः- अर्जुनी-मोर तालुक्यातील ईटखेडा येथील रामदास सदाशिव राजगडे (वय 55)यांचे 20 मे रोजी नागपूर येथील दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झाले.19 मे रोजी त्यांच्या घरातील पाळीव वळूने(सांड)त्यांना जखमी केल्याने छातीला इजा झाली होती.करीता उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले होते.उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी,एक मुलगा,चार मुली,जावई, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे.





