<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>राष्ट्रीय Archives - Berar Times</title>
	<atom:link href="https://www.berartimes.com/category/national/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://www.berartimes.com/category/national/</link>
	<description>News Paper</description>
	<lastBuildDate>Tue, 21 Jul 2026 04:53:19 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=7.0.2</generator>

<image>
	<url>https://www.berartimes.com/wp-content/uploads/2017/09/cropped-bgt5-2-32x32.jpg</url>
	<title>राष्ट्रीय Archives - Berar Times</title>
	<link>https://www.berartimes.com/category/national/</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>सिक्कीममध्ये बोगद्यात भीषण दुर्घटना; 8 कामगारांचा मृत्यू</title>
		<link>https://www.berartimes.com/top-news/232930/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 21 Jul 2026 04:53:19 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Top News]]></category>
		<category><![CDATA[देश]]></category>
		<category><![CDATA[राष्ट्रीय]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=232930</guid>

					<description><![CDATA[<p>सिक्कीममधील (Sikkim) नामची जिल्ह्यात तीस्ता स्टेज-6 जलविद्युत प्रकल्पाच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. समारदुंग (झोलुंगे) परिसरातील बोगद्यात भूस्खलन झाल्यानंतर मिथेन वायूची गळती झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 8 कामगारांचा मृत्यू झाला असून, 19 जण अद्याप बोगद्यात अडकल्याची भीती आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असले तरी प्रतिकूल परिस्थितीमुळे मोहिमेला मोठ्या अडचणींचा सामना करावा [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/top-news/232930/">सिक्कीममध्ये बोगद्यात भीषण दुर्घटना; 8 कामगारांचा मृत्यू</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p>सिक्कीममधील (Sikkim) नामची जिल्ह्यात तीस्ता स्टेज-6 जलविद्युत प्रकल्पाच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. समारदुंग (झोलुंगे) परिसरातील बोगद्यात भूस्खलन झाल्यानंतर मिथेन वायूची गळती झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 8 कामगारांचा मृत्यू झाला असून, 19 जण अद्याप बोगद्यात अडकल्याची भीती आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असले तरी प्रतिकूल परिस्थितीमुळे मोहिमेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.प्राथमिक माहितीनुसार, बोगद्याच्या बाहेर अचानक भूस्खलन झाल्याने मोठ्या प्रमाणात माती आणि दगड कोसळले. त्यावेळी आत काम करणारे अनेक मजूर अडकले. बाहेर आलेल्या काही कामगारांनी बोगद्यात मोठा स्फोटासारखा आवाज ऐकू आल्याचे सांगितले आहे. या घटनेनंतर बोगद्यात मिथेन वायूचे प्रमाण वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Methane Gas) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कामगारांचे मृतदेह विविध सरकारी रुग्णालयांत हलवण्यात आले आहेत. नामची जिल्हा प्रशासनाने सांगितले की, सुरुवातीच्या माहितीनुसार 19 कामगार अद्याप बोगद्यात अडकले आहेत. त्यामध्ये प्रकल्पाशी संबंधित काही कर्मचारी आणि इतर कामगारांचाही समावेश आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, एसडीआरएफ, सिक्कीम पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, एनएचपीसी आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संयुक्त बचाव मोहीम सुरू आहे. मात्र, बोगद्यात मिथेन वायूचे प्रमाण जास्त असल्याने बचाव पथकांनाही आत जाणे धोकादायक ठरत आहे. काही जवानांना वायूचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे. (Sikkim) बोगद्याचा अरुंद मार्ग, ढिगारा, कमी दृश्यता आणि विषारी वायू यामुळे बचावकार्य (NDRF) अत्यंत कठीण झाले आहे. अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/top-news/232930/">सिक्कीममध्ये बोगद्यात भीषण दुर्घटना; 8 कामगारांचा मृत्यू</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>अभिजीत दिपकेंना पोलिसांनी उचललं, दिल्ली पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार</title>
		<link>https://www.berartimes.com/national/232883/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 20 Jul 2026 10:30:49 +0000</pubDate>
				<category><![CDATA[देश]]></category>
		<category><![CDATA[राष्ट्रीय]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=232883</guid>

					<description><![CDATA[<p>नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत गेल्या 30 दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतर (Delhi Protest Jantar Mantar) मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनाने आता आक्रमक स्वरुप धारण केले आहे. आज कॉक्रोच जनता पार्टीकडून संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली होती. मात्र, पोलिसांनी काल रात्रीपासून जंतरमंतरवर बॅरिकेडिंग करत अभिजीत दिपके (abhijeet dipke) यांच्यासह सर्व आंदोलकांना त्याचठिकाणी [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/national/232883/">अभिजीत दिपकेंना पोलिसांनी उचललं, दिल्ली पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p>नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत गेल्या 30 दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतर (Delhi Protest Jantar Mantar) मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनाने आता आक्रमक स्वरुप धारण केले आहे. आज कॉक्रोच जनता पार्टीकडून संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली होती. मात्र, पोलिसांनी काल रात्रीपासून जंतरमंतरवर बॅरिकेडिंग करत अभिजीत दिपके (abhijeet dipke) यांच्यासह सर्व आंदोलकांना त्याचठिकाणी अडकवून ठेवले. मात्र, कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांचा एक वेगळा जमाव संसद भवनाच्या परिसरात पोहोचल्याने पोलीस यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनाने आक्रमक स्वरुप धारण केल्यामुळे सोमवारी दुपारी पोलिसांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके (abhijeet dipke) यांना ताब्यात घेतले आहे. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली आहे.</p>
<p>कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन आणि पोलिसांचा लाठीमार सुरु असताना दुसर्&#x200d;या बाजूला सरकारने आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्नही केला. कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांना जे.पी. नड्डा यांनी चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, जे.पी. नड्डा यांनी आम्हाला दोन तास वाट पाहायला लावली आणि त्यानंतर फक्त 10 मिनिटांची भेट दिली, असे कॉकरोच पार्टीकडून सांगण्यात आले. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी ट्विट करुन सर्व खासदारांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. पोलीस निर्घृणपणे आंदोलन मोडीत काढत आहेत आणि शांततेत आंदोलन करणाऱ्यांना मारत आहे, असेही सौरभ दास यांनी म्हटले.</p>
<h6><strong> संसद भवनाच्या परिसरात जवळपास 75000 आंदोलक जमले </strong></h6>
<p>दरम्यान, प्रशांत भूषण यांच्या दाव्यानुसार संसद भवनाच्या परिसरात जवळपास 75000 आंदोलक जमले होते. या आंदोलकांमुळे संसद भवनाच्या परिसरात सुरक्षा यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. दिल्ली पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगवले आहे. या परिसरात बॅरिकेडच्या मोठ्या रांगा उभारुन आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, काही आंदोलक या बॅरिकेडसवरुन चढून जाण्याचा प्रयत्न करत होते.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/national/232883/">अभिजीत दिपकेंना पोलिसांनी उचललं, दिल्ली पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>संसद भवनाचे दरवाजे बंद; पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या</title>
		<link>https://www.berartimes.com/top-news/232885/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 20 Jul 2026 10:19:30 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Top News]]></category>
		<category><![CDATA[देश]]></category>
		<category><![CDATA[राष्ट्रीय]]></category>
		<category><![CDATA[विदेश]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=232885</guid>

					<description><![CDATA[<p>दिल्ली -येथे कॉकरोच जनता पार्टीच्या  संसद मोर्चादरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. आंदोलक संसद भवन (Parliament House) परिसरापर्यंत पोहोचल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली. मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. दरम्यान, रेल्वे भवन परिसरात आंदोलकांनी धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. संसद परिसरात वाढवला बंदोबस्त : आंदोलक संसद [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/top-news/232885/">संसद भवनाचे दरवाजे बंद; पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>दिल्ली</strong> -येथे कॉकरोच जनता पार्टीच्या  संसद मोर्चादरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. आंदोलक संसद भवन (Parliament House) परिसरापर्यंत पोहोचल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली. मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. दरम्यान, रेल्वे भवन परिसरात आंदोलकांनी धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे.</p>
<h6><strong>संसद परिसरात वाढवला बंदोबस्त :</strong></h6>
<p>आंदोलक संसद भवनाजवळ पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा तैनात केला. मुख्य प्रवेशद्वार बंद करून परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची संसद भवनात भेट घेतली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीकडे महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींनाही चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. पक्षाच्या वतीने आशुतोष रांका (Ashutosh Ranka) आणि सौरभ दास (Saurabh Das) हे केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांची भेट घेण्यासाठी गेले असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाने सकाळीच सरकारकडून चर्चेसाठी संपर्क साधण्यात आल्याचा दावा केला आहे.</p>
<p>यापूर्वी जंतरमंतर येथून संसदेकडे निघालेल्या आंदोलकांना अडवताना पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत आधीपासूनच कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली होती. नवी दिल्ली परिसरात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 163 लागू करण्यात आले होते. या आंदोलनात आम आदमी पार्टीचे मनीष सिसोदिया (Manish Sisodia), संजय सिंह (Sanjay Singh), आझाद समाज पार्टी (Azad Samaj Party) चे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad), अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) तसेच सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या पत्नी गीतांजली (Geetanjali) यांनीही सहभाग घेतला.</p>
<p>खासदार चंद्रशेखर आझाद यांनी युवकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत आपण त्यांच्या समर्थनासाठी आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगितले. सरकार आपली भूमिका पार पाडत आहे, पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत आणि आपण युवकांच्या न्यायासाठी उभे असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, संसद मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/top-news/232885/">संसद भवनाचे दरवाजे बंद; पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>महाराष्ट्राची समृद्ध वस्त्रपरंपरा दिल्लीकरांच्या भेटीला</title>
		<link>https://www.berartimes.com/national/232848/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 18 Jul 2026 14:13:21 +0000</pubDate>
				<category><![CDATA[देश]]></category>
		<category><![CDATA[राष्ट्रीय]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=232848</guid>

					<description><![CDATA[<p>महाराष्ट्र सदन येथे तीन दिवसीय वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन नवी दिल्ली, दि.१८ : महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादित, नागपूर (महाटेक्स) आणि येथील महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित विशेष वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती श्वेता सिंघल यांच्या हस्ते झाले. प्रगती मैदान येथील भारत मंडपममध्ये [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/national/232848/">महाराष्ट्राची समृद्ध वस्त्रपरंपरा दिल्लीकरांच्या भेटीला</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<div class="xdj266r x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs x126k92a">
<div dir="auto"><strong>महाराष्ट्र सदन येथे तीन दिवसीय वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन</strong></div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto"><strong>नवी दिल्ली, दि.१८ :</strong> महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादित, नागपूर (महाटेक्स) आणि येथील महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित विशेष वस्त्रोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती श्वेता सिंघल यांच्या हस्ते झाले.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">प्रगती मैदान येथील भारत मंडपममध्ये नुकत्याच झालेल्या &#8216;भारत टेक्स २०२६&#8217; च्या धर्तीवर महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रोद्योग परंपरेचा परिचय दिल्लीकरांना करून देण्यासाठी कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदन येथे १८ ते २० जुलै २०२६ या कालावधीत या तीन दिवसीय वस्त्रोद्योग प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती श्वेता सिंघल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार आणि व्यवस्थापक प्रमोद कोलापटे उपस्थित होते. तसेच रेशीम संचालनालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे, रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे, अशोक वडवले, महाटेक्सचे गणेश ठाकूर, रूपेश खापेकर आदी उपस्थित होते.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">दिल्लीतील नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन महाराष्ट्रातील विणकर आणि कारागिरांकडून दर्जेदार उत्पादने थेट खरेदी करून &#8216;व्होकल फॉर लोकल&#8217; संकल्पनेला बळ द्यावे, असे आवाहन निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी केले.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">&#8216;भारत टेक्स २०२६&#8217;मध्ये महाराष्ट्राच्या दालनाला देश-विदेशातील खरेदीदारांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विणकर, कारागिर आणि स्वयं-सहायता गटांनी तयार केलेली उत्पादने दिल्लीसारख्या मोठ्या बाजारपेठेत थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावीत, तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रवारशाचा व्यापक प्रचार व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">या प्रदर्शनात महाराष्ट्राच्या पारंपरिक वस्त्रकलेचा समृद्ध वारसा अनुभवता येणार असून, अस्सल पैठणी, करवत काठी साड्या, पारंपरिक हिमरू, खण, सोलापूरच्या प्रसिद्ध चादरी, बांबू व टेरी टॉवेल्स तसेच जीआय (GI) टॅग प्राप्त कोल्हापुरी चपला यांसह विविध हातमाग व रेशीम उत्पादने थेट विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.हे प्रदर्शन १८ ते २० जुलै २०२६ या कालावधीत सकाळी ११.०० ते सायंकाळी ८.०० या वेळेत सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.</div>
</div>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/national/232848/">महाराष्ट्राची समृद्ध वस्त्रपरंपरा दिल्लीकरांच्या भेटीला</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>सोनम वांगचूक यांना पोलीसांनी आंदोलनस्थळावरून हटवलं</title>
		<link>https://www.berartimes.com/top-news/232827/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 18 Jul 2026 05:47:30 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Top News]]></category>
		<category><![CDATA[देश]]></category>
		<category><![CDATA[राष्ट्रीय]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=232827</guid>

					<description><![CDATA[<p>&#x1f449;रुग्णालयात केले दाखल &#x1f449;आंदोलनस्थळी मोठा गोंधळ नवी दिल्ली:-राजधानी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर मागील २० दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना पोलीसांनी आंदोलनस्थळावरून हटवले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. वांगचूक यांच्या आरोग्याची खालावलेली स्थिती पाहता पोलीसांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीसांनी सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्याने याठिकाणी मोठा गोंधळ झाल्याचे समजते [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/top-news/232827/">सोनम वांगचूक यांना पोलीसांनी आंदोलनस्थळावरून हटवलं</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>&#x1f449;रुग्णालयात केले दाखल</strong></p>
<p><strong>&#x1f449;आंदोलनस्थळी मोठा गोंधळ</strong></p>
<p><strong>नवी दिल्ली:</strong>-राजधानी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर मागील २० दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना पोलीसांनी आंदोलनस्थळावरून हटवले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. वांगचूक यांच्या आरोग्याची खालावलेली स्थिती पाहता पोलीसांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीसांनी सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्याने याठिकाणी मोठा गोंधळ झाल्याचे समजते आहे.</p>
<p>मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या 21 दिवसांपासून सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलन स्थळावरुन हटवलं आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आंदोलन स्थळावरुन हटवल्याची माहिती मिळतेय. दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेले आहे. &#8216;नीट&#8217; (NEET) सारख्या प्रमुख परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचुक 28 जूनपासून उपोषणावर होते.</p>
<p><strong>CJP प्रवक्त्यांची माहिती</strong></p>
<p>&#8216;कॉकरोच जनता पार्टी&#8217;चे (CJP) प्रवक्ते सौरभ दास यांनी या परिस्थितीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतलं. ते पुढे म्हणाले, &#8220;मला लोकांकडून समजलं की, सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवलं जातंय आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला जातोय&#8230;&#8221; जंतर-मंतर येथे CJP च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याआधीच सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवण्यात आलंय.</p>
<p><strong>सोनम वांगचूक यांच्यावरील कारवाईवर दिल्ली पोलिसांचं म्हणणं काय?</strong></p>
<p>सोनम वांगचुक यांची खालावलेली प्रकृती यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच पोलिसांनी जंतर-मंतर इथे ही कारवाई केली. प्रत्येक नागरिकाचा जीव मौल्यवान आहे, हे लक्षात घेऊन, न्यायालयानं यापूर्वीच सोनम वांगचुक यांची दररोज वैद्यकीय तपासणी करण्याचं, तसेच त्यांच्या प्रकृतीवर नियमित देखरेख ठेवून त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत पुरवण्याचे निर्देश दिले होते.</p>
<p><strong>सोनम वांगचुक यांचा VIDEO मेसेज </strong></p>
<p>सलग 20 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांची प्रकृती सतत खालावत होती, वांगचुक यांनी शुक्रवारी रात्री एक व्हिडीओ मेसेज जारी केलेला. ज्यामध्ये त्यांनी आपलं सुमारे 20 टक्के वजन कमी केल्याचं सांगितलं.  तसेच, त्यांच्या स्नायूंवरही परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलंय. तरीही त्यांचं मनोधैर्य आणि मानसिक स्थिती खंबीर होती.</p>
<p>या व्हिडीओद्वारे, वांगचुक यांनी 20 जुलै रोजी नियोजित असलेल्या &#8216;चलो संसद&#8217; (संसदेकडे कूच) रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन नागरिकांना केलेलं. त्यांनी म्हटलं की, जर कांद्याच्या दरांबाबत सरकारला जबाबदार धरलं जाऊ शकतं, तर लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता यांबाबतही सरकारची जबाबदारी निश्चित केलीच पाहिजे. &#8216;नीट&#8217; (NEET) परीक्षा वादाच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी आपल्या व्हिडीओमध्ये केला आणि या मुद्द्यावर सरकारनं उत्तर दिलंच पाहिजे, असं ठामपणे सांगितलं.</p>
<p><strong>सोनम वांगचुक यांची मागणी नेमकी काय? </strong></p>
<p>सोनम वांगचुक आणि या आंदोलनाशी संबंधित संघटनांची एक प्रमुख मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही होती. स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमितता आणि प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झालाय, असा आरोप त्यांनी केला. तसेच, आंदोलकांनी &#8216;नॅशनल टेस्टिंग एजन्सी&#8217;च्या (NTA) कामकाजाची निष्पक्ष चौकशी, प्रश्नपत्रिका फुटण्याच्या प्रकरणांची पारदर्शक तपासणी आणि परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणा करण्याची मागणीही केली.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/top-news/232827/">सोनम वांगचूक यांना पोलीसांनी आंदोलनस्थळावरून हटवलं</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>मुलांमधील असंसर्गिक रोगांच्या उपचारांसाठी एम्स नागपूर एक आदर्श प्रारूप विकसित करतेय:डॉ. प्रशांत जोशी</title>
		<link>https://www.berartimes.com/maharashtra/232690/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 15 Jul 2026 14:42:53 +0000</pubDate>
				<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[राष्ट्रीय]]></category>
		<category><![CDATA[विदर्भ]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=232690</guid>

					<description><![CDATA[<p>नागपूर/गोंदिया,दि.१५ः&#8211; पश्चिम भारतातील मोठ्या भागातील मुले असंसर्गिक रोगांची (NCDs) शिकार होत आहेत, परंतु त्यांना अनेकदा दर्जेदार उपचार मिळत नाहीत. परिणामी, नागपूर येथील &#8216;ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस&#8217; (एम्स) बाधित मुलांसाठी उपचारांचे असे एक प्रारूप विकसित करत आहे, ज्याची अंमलबजावणी देशभरात केली जाऊ शकेल असे विचार एम्स नागपूरचे सीईओ डॉ. प्रशांत जोशी यांनी व्यक्त केले.ते [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/maharashtra/232690/">मुलांमधील असंसर्गिक रोगांच्या उपचारांसाठी एम्स नागपूर एक आदर्श प्रारूप विकसित करतेय:डॉ. प्रशांत जोशी</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>नागपूर/गोंदिया,दि.१५ः</strong>&#8211; पश्चिम भारतातील मोठ्या भागातील मुले असंसर्गिक रोगांची (NCDs) शिकार होत आहेत, परंतु त्यांना अनेकदा दर्जेदार उपचार मिळत नाहीत. परिणामी, नागपूर येथील &#8216;ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस&#8217; (एम्स) बाधित मुलांसाठी उपचारांचे असे एक प्रारूप विकसित करत आहे, ज्याची अंमलबजावणी देशभरात केली जाऊ शकेल असे विचार एम्स नागपूरचे सीईओ डॉ. प्रशांत जोशी यांनी व्यक्त केले.ते एम्स नागपूर, युनिसेफ (UNICEF) इंडिया आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पश्चिम विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने नर्सींग महाविद्यालय सभागृहात आयोजित (दि.१४ जुर्ले) कार्यशाळेत तज्ज्ञांनी मुलांमधील असंसर्गिक रोगांचे निदान, उपचार आणि व्यवस्थापन कसे करावे यांबाबत मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.</p>
<p>डाॅ.जोशी पुढे म्हणाले की,मुलांमधील असंसर्गिक रोगांचा कालावधी (incubation period) मोठा असतो आणि त्यांची सुरुवात अनेकदा बालपणातच होते; त्यामुळे या रोगांचे वेळीच निदान, निरंतर काळजी आणि एक सक्षम सार्वजनिक आरोग्य व्यवस्था असणे आवश्यक आहे. देशभरात अनुकरण करता येण्याजोगी आरोग्य-देखभाल प्रारूपे विकसित करण्यासाठी एम्स नागपूर कटिबद्ध आहे.कार्यशाळेदरम्यान, माध्यम प्रतिनिधींना बालपणीच्या असंसर्गजन्य आजारांचे निदान, उपचार आणि व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते, याची प्रत्यक्ष माहिती एनसीडीएस केंंद्र व संबधित आजाराशी लढत असलेल्या रुग्ण व नातेवाईंकाशी भेट करुन देत देण्यात आली. तसेच आरोग्यविषयक वृत्तांकन अधिक प्रभावी करण्यासाठीच्या सर्वोत्तम पद्धतींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.</p>
<p>तज्ज्ञांनी नमूद केले की, पश्चिम आणि मध्य भारतातील आदिवासी व ग्रामीण भागांत तपासणी आणि विशेष वैद्यकीय सेवांच्या मर्यादित सुविधांमुळे मुलांमधील असंसर्गिक रोगांची प्रकरणे अनेकदा उशिरा समोर येतात. दुसरीकडे, शहरी भागांत बैठी जीवनशैली, स्क्रीनचा अतिवापर आणि आहारातील बदलांमुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण, आदिवासी किंवा शहरी अशा कोणत्याही भागात, आजाराची स्थिती गंभीर होईपर्यंत अनेकदा या रोगांचे निदान होत नाही.</p>
<p>याप्रसंगी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (पश्चिम विभाग) महासंचालक स्मिता वत्स शर्मा म्हणाल्या, &#8220;सार्वजनिक आरोग्याविषयीच्या बातम्यांमुळे जनजागृती होते आणि लोक कृतीशील होतात. पुराव्यांवर आधारित माहिती देणे आणि मुलांसमोरील आरोग्यविषयक नवीन आव्हाने नागरिकांना समजण्यास मदत करतील अशा बातम्या देणे ही पत्रकारांची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे.&#8221;</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/maharashtra/232690/">मुलांमधील असंसर्गिक रोगांच्या उपचारांसाठी एम्स नागपूर एक आदर्श प्रारूप विकसित करतेय:डॉ. प्रशांत जोशी</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ‘भारत टेक्स’मधील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन</title>
		<link>https://www.berartimes.com/national/232677/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 15 Jul 2026 12:55:19 +0000</pubDate>
				<category><![CDATA[देश]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[राष्ट्रीय]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=232677</guid>

					<description><![CDATA[<p>उद्योगस्नेही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन नवी दिल्ली, दि. १५ :नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन ‘भारत टेक्स २०२६’ मध्ये मंगळवारी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यंदा महाराष्ट्राचा भागीदार राज्य (पार्टनर स्टेट) म्हणून या प्रतिष्ठित प्रदर्शनात सहभाग असून, राज्याच्या वस्त्रोद्योग [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/national/232677/">वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ‘भारत टेक्स’मधील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<div class="xdj266r x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs x126k92a">
<div dir="auto"><strong>उद्योगस्नेही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन</strong></div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto"><strong>नवी दिल्ली, दि. १५</strong> :नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन ‘भारत टेक्स २०२६’ मध्ये मंगळवारी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यंदा महाराष्ट्राचा भागीदार राज्य (पार्टनर स्टेट) म्हणून या प्रतिष्ठित प्रदर्शनात सहभाग असून, राज्याच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता, परंपरा आणि आधुनिकतेचा संगमाचे दर्शन या दालनातून होत आहे.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती अंशू सिन्हा, महाराष्ट्र शासनाच्या नवी दिल्लीतील निवासी आयुक्त श्वेता सिंघल, वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने, उपसचिव श्रीकृष्ण पवार, रेशीम विभागाचे उपसचिव तुषार पवार यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">उद्घाटनानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे दालन हे राज्याच्या समृद्ध वस्त्रोद्योग परंपरेसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणारे आहे. पारंपरिक तंतूपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा संपूर्ण प्रवास या दालनातून प्रभावीपणे साकारण्यात आला असून, महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग धोरण हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही धोरणांपैकी एक असल्याचे त्यांनी नमूद केले.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">श्री. सावकारे पुढे म्हणाले की, २०१७ ते २०२३ या वस्त्रोद्योग धोरणाला उद्योजकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर राज्य सरकारने २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी अधिक व्यापक आणि आकर्षक धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत विविध झोननुसार भांडवली अनुदान, वीज दरावरील सवलती, यंत्रसामग्री खरेदीसाठी आर्थिक सहाय्य, कर सवलती आणि इतर अनेक प्रोत्साहनपर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीचा वेग वाढला असून नवीन उद्योग उभारण्यासाठी राज्य सर्वार्थाने अनुकूल ठरत आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रात प्रगती करू इच्छिणाऱ्या उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहनही त्यांनी केले.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">याच कार्यक्रमात वस्त्रोद्योग क्षेत्राला आधुनिक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘टेक्सटाइल डॅडी’ या संकेतस्थळाचेही उद्घाटन करण्यात आले. उत्पादक, पुरवठादार, खरेदीदार आणि उद्योगाशी संबंधित विविध घटकांना एकाच डिजिटल मंचावर जोडून व्यवसाय सुलभ करणे, बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि उद्योगांना नवीन संधी निर्माण करून देणे हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आहे. राज्याच्या वस्त्रोद्योग क्षेत्राच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">उद्घाटनानंतर मंत्री सावकारे यांनी महाराष्ट्र दालनातील विविध स्टॉल्सची पाहणी केली. या दालनात महाराष्ट्र हँडलूम कॉर्पोरेशन लिमिटेड, महाराष्ट्र पॉवरलूम कॉर्पोरेशन लिमिटेड, रेशीम संचालनालय, उद्योग विभाग आणि अमरावती येथील पीएम मित्र पार्क या पाच प्रमुख किऑस्कच्या माध्यमातून राज्याच्या वस्त्रोद्योग क्षेत्राची विविधांगी ताकद सादर करण्यात आली आहे.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">या दालनात पारंपरिक पैठणी, करवत काठी, हिमरू, खण साड्या, सोलापूरच्या जगप्रसिद्ध चादरी, बांबू टॉवेल्स, टेरी टॉवेल्स तसेच भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) प्राप्त कोल्हापुरी चपला यांसारख्या महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन करण्यात आले असून, देश-विदेशातील खरेदीदार, निर्यातदार आणि उद्योग प्रतिनिधींकडून या उत्पादनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">दरम्यान, १४ जुलै रोजी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह आणि केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांच्या उपस्थितीत &#8216;भारत टेक्स २०२६&#8217;चे उद्घाटन झाले. १३० हून अधिक देशांतील सुमारे ६,००० आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि १.३ लाखांपेक्षा अधिक व्यावसायिक प्रतिनिधी या जागतिक प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.</div>
</div>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/national/232677/">वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ‘भारत टेक्स’मधील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>बालपणीच्या असंसर्गजन्य आजारांवरील वृत्तांकन अधिक उत्तम करण्यासाठी आयोजित दोन दिवसीय माध्यम क्षमता-वृद्धी कार्यशाळेची सांगता</title>
		<link>https://www.berartimes.com/national/country/232637/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 14 Jul 2026 17:09:03 +0000</pubDate>
				<category><![CDATA[देश]]></category>
		<category><![CDATA[राष्ट्रीय]]></category>
		<category><![CDATA[विदर्भ]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=232637</guid>

					<description><![CDATA[<p>युनिसेफ इंडिया, पत्रसूचना कार्यालय पश्चिम क्षेत्र आणि एम्स नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन एम्स नागपूरच्या उत्कृष्टता केंद्रात, बालपणीच्या असंसर्गजन्य आजारांच्या काळजीविषयीची सर्वंकष माहिती माध्यम प्रतिनिधींना प्रत्यक्ष तज्ञाकडून मिळाली नागपूर,दि.१४&#8211; बालपणी होणाऱ्या अ संसर्गजन्य आजारांविषयीचे वृत्तांकन अधिक संवेदनशीलता आणि जागृतीने कसे करता येईल, याविषयी जाणून घेण्यासाठी, पश्चिम भारतातील सुमारे 30 पेक्षा अधिक माध्यम प्रतिनिधी नागपूरच्या एम्स मध्ये झालेल्या [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/national/country/232637/">बालपणीच्या असंसर्गजन्य आजारांवरील वृत्तांकन अधिक उत्तम करण्यासाठी आयोजित दोन दिवसीय माध्यम क्षमता-वृद्धी कार्यशाळेची सांगता</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<h6 id="Titleh2"><strong>युनिसेफ इंडिया, पत्रसूचना कार्यालय पश्चिम क्षेत्र आणि एम्स नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन</strong></h6>
<h6><strong>एम्स नागपूरच्या उत्कृष्टता केंद्रात, बालपणीच्या असंसर्गजन्य आजारांच्या काळजीविषयीची सर्वंकष माहिती <span id="ltrSubtitle">माध्यम प्रतिनिधींना </span><span id="ltrSubtitle">प्रत्यक्ष तज्ञाकडून मिळाली</span></strong></h6>
<p><strong>नागपूर,दि.१४</strong>&#8211; बालपणी होणाऱ्या अ संसर्गजन्य आजारांविषयीचे वृत्तांकन अधिक संवेदनशीलता आणि जागृतीने कसे करता येईल, याविषयी जाणून घेण्यासाठी, पश्चिम भारतातील सुमारे 30 पेक्षा अधिक माध्यम प्रतिनिधी नागपूरच्या एम्स मध्ये झालेल्या दोन -दिवसीय क्षमता-बांधणी कार्यशाळेसाठी एकत्र आले होते.आज या कार्यशाळेची सांगता झाली.</p>
<p>युनिसेफ इंडिया, पत्र सूचना कार्यालय (पश्चिम क्षेत्र) आणि एम्स, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेदरम्यान, माध्यम प्रतिनिधींना बालपणीच्या असंसर्गजन्य आजारांचे निदान, उपचार आणि व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते, याची प्रत्यक्ष माहिती मिळाली. तसेच आरोग्यविषयक वृत्तांकन अधिक प्रभावी करण्यासाठीच्या सर्वोत्तम पद्धतींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.</p>
<p>&nbsp;</p>
<p>पाच ते नऊ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये आणि 10 ते 19 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांमध्ये वाढत असलेल्या असंसर्गजन्य आजारांच्या धोक्याकडे लक्ष वेधणे, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. पश्चिम आणि मध्य भारतातील आदिवासी तसेच ग्रामीण भागांमध्ये बालपणीचे असंसर्गजन्य आजार अनेकदा निदान आणि तज्ज्ञ उपचारांच्या मर्यादित उपलब्धतेमुळे अधिक गंभीर स्वरूप धारण करतात. दुसरीकडे, शहरी भागांमध्ये बैठी जीवनशैली, स्क्रीनसमोर वाढता वेळ आणि आहारातील बदल यांमुळे बालपणीच येणारा लठ्ठपणा, मधुमेह आणि मानसिक आरोग्याशी संबंधित विकार यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. ग्रामीण, आदिवासी किंवा शहरी कोणतेही क्षेत्र असो, बालपणीचे हे आजार अनेकदा गुंतागुंत निर्माण होईपर्यंत लक्षात येत नाहीत.<img fetchpriority="high" decoding="async" class="alignnone size-full wp-image-232639" src="https://www.berartimes.com/wp-content/uploads/2026/07/6768d75a-0464-4b4e-8307-5bdc3d1cb5a1-e1784048795134.jpg" alt="" width="600" height="399" /></p>
<p>यावेळी बोलताना, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील, पत्र सूचना कार्यालयाच्या (पश्चिम क्षेत्र) महासंचालिका  स्मिता वत्स शर्मा यांनी सांगितले की, “ सार्वजनिक आरोग्यविषयक वृत्तांकन जनजागृती आणि त्यावर आधारित कृती करण्यासाठी आवश्यक तो आकार देते, त्यामुळे पत्रकारांवर, पुराव्या आधारित तथ्ये आणि इतर माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची महत्वाची जबाबदारी असते. तसेच, ज्या बातम्या लोकांना मुलांसाठीची आरोग्यविषयक आव्हाने समजून घेण्यात आणि त्यांचा सामना करण्यास मदत करु शकतील, अशा बातम्या पत्रकारांकडून दिल्या जाव्यात.”</p>
<p>एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी म्हणाले, &#8220;लहान मुलांमधील असंसर्गजन्य  आजारांचा,  सुप्त कालावधी  मोठा असतो आणि  त्यांची सुरुवात बालपणापासूनच होत असते.  त्यामुळे, या आजारांचे लवकर निदान होणे गरजेचे आहे, तसेच यासंबंधी सातत्याने  काळजी घेतली गेली पाहिजे. तसेच   सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट असणे अत्यंत आवश्यक आहे. एम्स नागपूर अशा आरोग्यसेवा मॉडेल्सच्या विकासासाठी कटिबद्ध आहे ज्यांची   अंमलबजावणी संपूर्ण देशात करता येईल. प्रसारमाध्यमांच्&#x200d;या मदतीने कुटुंबांना या आजारांची लक्षणे लवकर ओळखण्यासाठी  आणि वेळेवर उपचार घेण्यास प्रोत्साहन देण्यास मदत होऊ शकते.&#8221;</p>
<p>युनिसेफ  इंडियाच्या &#8216;कम्युनिकेशन, ॲडव्होकसी अँड पार्टनरशिप&#8217; विभागाच्या प्रमुख झाफ्रिन चौधरी म्हणाल्या, &#8220;ज्यावेळी  प्रसारमाध्यमांमधून लहान मुलांमधील असंसर्गजन्य आजारांबाबत अचूक आणि संवेदनशीलतेने माहिती पोहोचते, त्यावेळी एका दुर्लक्षित समस्येवर प्रकाश पडतो. यामुळे आजारांचे लवकर निदान होण्यास मदत मिळते. सामाजिक कलंक किंवा पूर्वग्रह दूर होतात आणि हे आजार रोखण्यायोग्य आणि  उपचार करण्यायोग्य आहेत, या गोष्टीवर शिक्कामोर्तब होते. अशाप्रकारची वृत्त तसेच माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पीआयबी, एम्स नागपूर  आणि पत्रकारांबरोबर भागीदारी करताना युनिसेफला अभिमान वाटतो. आपण सर्वजण मिळून लोकांना माहिती देऊ शकतो. आजाराच्या विरोधात कृती करण्यास प्रेरित करू शकतो आणि मुलांना चांगले आयुष्य  जगण्यासाठी त्यांचे आरोग्य राखण्यास मदत करू शकतो.&#8221;</p>
<p>आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या &#8216;डीजीएचएस&#8217;चे अतिरिक्&#x200d;त महासंचालक  डॉ. तुषार एन. नाले यांनी सरकारच्यावतीने चालविण्&#x200d;यात येणा-या  असंसर्गजन्य आजार  कार्यक्रमाचा आढावा सादर केला.या वर्षाच्या सुरुवातीला, संपूर्ण राज्यात लहान मुलांमधील असंसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध आणि व्यवस्थापन बळकट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने युनिसेफ इंडियाच्या धोरणात्मक सहकार्याने एम्स नागपूरसोबत सामंजस्य करार केला. या भागीदारीमुळे एम्स नागपूर या कार्यासाठी &#8216;तांत्रिक उत्कृष्टता केंद्र&#8217;  म्हणून कार्यरत होणार आहे.</p>
<p>युनिसेफ महाराष्ट्रचे प्रमुख संजय सिंग म्हणाले, &#8220;लहान मुलांमधील असंसर्गजन्य  आजार  आता दुर्मिळ राहिलेले नाहीत. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची आणि वाढती प्राथमिकता बनली आहे. एम्स नागपूर आणि महाराष्ट्र सरकारबरोबरच्या आमच्या भागीदारीद्वारे, आम्ही लवकर निदान, रुग्ण संदर्भ  प्रणाली आणि दर्जेदार आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी काम करत आहोत, जेणेकरून प्रत्येक मुलाला आवश्यक ती मदत मिळेल.&#8221;</p>
<p>कार्यशाळेतील एक प्रमुख आकर्षण म्हणजे एम्स नागपूर येथे बालकांमधील असंसर्गजन्य आजारासाठीच्या उत्कृष्टता केंद्राला दिलेली भेट. येथे पत्रकारांनी डॉक्टर, मुले आणि त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना भेटून दीर्घकालीन देखभालीची वास्तविकता प्रत्यक्ष अनुभवली. पत्रकारांनी बालपणातील असंसर्गजन्य आजारांविषयी आकलन  तपासणाऱ्या आणि वाढवणाऱ्या एका संवादात्मक प्रश्नमंजुषेतही भाग घेतला. तसेच गटांमध्ये काम करून अशा बातम्यांच्या कल्पना आणि वार्तांकनाचे पैलू विकसित केले, जे ते आपल्या वृत्तकक्षात  नेऊ शकतील.</p>
<p><img decoding="async" src="https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/WhatsAppImage2026-07-14at3.29.35PMNBZV.jpeg" /></p>
<p>कार्यशाळेची सुरुवात एका प्रास्ताविक सत्राने झाली. यामध्ये एम्स नागपूर येथील बालरोग विभागाच्या प्राध्यापिका आणि विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी गिरीश यांनी बालपणातील असंसर्गजन्य आजार समजून घेण्याबाबत एक अभ्यासपूर्ण भाषण केले.</p>
<p>आरोग्यविषयक वार्तांकनासाठी माध्यम प्रतिनिधींना उपलब्ध असलेल्या भारत सरकारच्या संसाधनांवर तसेच विविध भाषांमध्ये आरोग्यविषयक बातम्यांची नियमित, अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी बातमीदार पीआयबीचा कसा उपयोग करू शकतात, यावरही या कार्यशाळेत प्रकाश टाकण्यात आला. एनएफएचएस आणि एसआरएस सर्वेक्षणे, पोषण-ट्रॅकर संकेतस्थळ आणि इतर सहज उपलब्ध होणाऱ्या आंतर-मंत्रालयीन संसाधनांवरही यावेळी भर देण्यात आला.</p>
<p>ही कार्यशाळा एका सातत्यपूर्ण  उपक्रमाची सुरुवात आहे, जो सप्टेंबर 2026 मध्ये होणाऱ्या एनसीडी सप्ताहापर्यंत सुरू राहील. हा उपक्रम बालकांमधील असंसर्गजन्य आजारांविषयीची सार्वजनिक समज सुधारणे आणि पुराव्यावर आधारित आरोग्य अहवाल अधिक मजबूत करणे, या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे.<img decoding="async" class="alignnone size-full wp-image-232640" src="https://www.berartimes.com/wp-content/uploads/2026/07/WhatsAppImage2026-07-14at6.50.16PMUXSZ.jpeg" alt="" width="1280" height="960" srcset="https://www.berartimes.com/wp-content/uploads/2026/07/WhatsAppImage2026-07-14at6.50.16PMUXSZ.jpeg 1280w, https://www.berartimes.com/wp-content/uploads/2026/07/WhatsAppImage2026-07-14at6.50.16PMUXSZ-300x225.jpeg 300w, https://www.berartimes.com/wp-content/uploads/2026/07/WhatsAppImage2026-07-14at6.50.16PMUXSZ-1024x768.jpeg 1024w, https://www.berartimes.com/wp-content/uploads/2026/07/WhatsAppImage2026-07-14at6.50.16PMUXSZ-768x576.jpeg 768w, https://www.berartimes.com/wp-content/uploads/2026/07/WhatsAppImage2026-07-14at6.50.16PMUXSZ-560x420.jpeg 560w, https://www.berartimes.com/wp-content/uploads/2026/07/WhatsAppImage2026-07-14at6.50.16PMUXSZ-80x60.jpeg 80w, https://www.berartimes.com/wp-content/uploads/2026/07/WhatsAppImage2026-07-14at6.50.16PMUXSZ-696x522.jpeg 696w, https://www.berartimes.com/wp-content/uploads/2026/07/WhatsAppImage2026-07-14at6.50.16PMUXSZ-1068x801.jpeg 1068w, https://www.berartimes.com/wp-content/uploads/2026/07/WhatsAppImage2026-07-14at6.50.16PMUXSZ-265x198.jpeg 265w" sizes="(max-width: 1280px) 100vw, 1280px" /></p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/national/country/232637/">बालपणीच्या असंसर्गजन्य आजारांवरील वृत्तांकन अधिक उत्तम करण्यासाठी आयोजित दोन दिवसीय माध्यम क्षमता-वृद्धी कार्यशाळेची सांगता</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>पद्म विभूषण पंडवानी गायिका तीजन बाई का निधन</title>
		<link>https://www.berartimes.com/hindi-news/232243/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 05 Jul 2026 08:16:37 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Top News]]></category>
		<category><![CDATA[राष्ट्रीय]]></category>
		<category><![CDATA[हिंदी खबरे]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=232243</guid>

					<description><![CDATA[<p>रायपुर। छत्तीसगढ़ की लोक संस्कृति को वैश्विक मंच तक पहुंचाने वाली पंडवानी की अप्रतिम गायिका और पद्म विभूषण डॉ. तीजन बाई का शनिवार देर रात निधन हो गया। 70 वर्षीय तीजन बाई ने रात 3:15 बजे रायपुर एम्स में अंतिम सांस ली। वे लंबे समय से अस्वस्थ थीं। उनके निधन से छत्तीसगढ़ ही नहीं, पूरे देश [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/hindi-news/232243/">पद्म विभूषण पंडवानी गायिका तीजन बाई का निधन</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<div>
<p><strong>रायपुर। </strong>छत्तीसगढ़ की लोक संस्कृति को वैश्विक मंच तक पहुंचाने वाली पंडवानी की अप्रतिम गायिका और पद्म विभूषण डॉ. तीजन बाई का शनिवार देर रात निधन हो गया। 70 वर्षीय तीजन बाई ने रात 3:15 बजे रायपुर एम्स में अंतिम सांस ली। वे लंबे समय से अस्वस्थ थीं। उनके निधन से छत्तीसगढ़ ही नहीं, पूरे देश की लोक कला जगत में शोक की लहर दौड़ गई है।तीजन बाई ने अपनी दमदार आवाज, जीवंत अभिनय और अनूठी प्रस्तुति शैली से महाभारत की कथाओं को मंच पर इस तरह जीवंत किया कि पंडवानी देश की सीमाओं से निकलकर अंतरराष्ट्रीय पहचान हासिल कर सकी। उन्होंने दशकों तक भारत की लोक परंपरा का प्रतिनिधित्व करते हुए दुनिया के अनेक देशों में प्रस्तुति दी और छत्तीसगढ़ की सांस्कृतिक पहचान को नई ऊंचाइयों तक पहुंचाया।</p>
<div>
<h3>13 साल की उम्र में पहला सार्वजनिक मंच प्रदर्शन किया</h3>
<p>भिलाई के समीप गनियारी गांव में जन्मी तीजन बाई के पिता हुनुकलाल परधा और माता सुखवती थीं। बचपन में वे अपने नाना ब्रजलाल से महाभारत की कथाएं सुनती थीं। यही संस्कार आगे चलकर उनके जीवन का आधार बने। उनकी प्रतिभा को पहचानते हुए उमेद सिंह देशमुख ने उन्हें मार्गदर्शन दिया। महज 13 वर्ष की आयु में उन्होंने पहला सार्वजनिक मंच प्रदर्शन किया और फिर कभी पीछे मुड़कर नहीं देखा।</p>
<p>उनके जीवन में बड़ा मोड़ तब आया, जब प्रसिद्ध रंगकर्मी हबीब तनवीर ने उनकी प्रस्तुति देखी। इसके बाद उन्हें राष्ट्रीय और अंतरराष्ट्रीय मंचों पर पहचान मिली। उन्होंने तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी सहित कई राष्ट्रीय और अंतरराष्ट्रीय हस्तियों के समक्ष अपनी कला का प्रदर्शन किया।</p>
</div>
<div>
<h3>कई अवॉर्ड से सम्मानित हैं तीजन बाई</h3>
<p>भारतीय लोक कला में उनके अतुलनीय योगदान के लिए उन्हें पद्मश्री, पद्म भूषण और देश का दूसरा सर्वोच्च नागरिक सम्मान पद्म विभूषण प्रदान किया गया। इसके अलावा संगीत नाटक अकादमी पुरस्कार, श्रेष्ठ कला आचार्य सम्मान, देवी अहिल्या सम्मान, एम.एस. सुब्बालक्ष्मी शताब्दी पुरस्कार, डी.लिट सहित अनेक प्रतिष्ठित सम्मानों से उन्हें नवाजा गया।</p>
</div>
</div>
<div></div>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/hindi-news/232243/">पद्म विभूषण पंडवानी गायिका तीजन बाई का निधन</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>केंद्र सरकारने पहिल्यांदा ऑपरेशन सिंदूर दरम्यान शहीद झालेल्या 6 जवानांची नावे केली सार्वजनिक</title>
		<link>https://www.berartimes.com/national/231850/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 29 Jun 2026 05:19:43 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Top News]]></category>
		<category><![CDATA[देश]]></category>
		<category><![CDATA[राष्ट्रीय]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=231850</guid>

					<description><![CDATA[<p>नवी दिल्ली/वृत्तसेवा-केंद्र सरकार ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची कोणतीही जीवित हानी झाली नाही असा, दावा करत होती. इतकेच नाही तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले होते कि ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र आता प्रथमच केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर दरम्यान शहीद झालेल्या सहा जवानांची नावे अधिकृतपणे जाहीर केली आहेत. सूबेदार मेजर पवन [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/national/231850/">केंद्र सरकारने पहिल्यांदा ऑपरेशन सिंदूर दरम्यान शहीद झालेल्या 6 जवानांची नावे केली सार्वजनिक</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<div dir="auto"><strong>नवी दिल्ली/वृत्तसेवा-</strong>केंद्र सरकार ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची कोणतीही जीवित हानी झाली नाही असा, दावा करत होती. इतकेच नाही तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले होते कि ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र आता प्रथमच केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर दरम्यान शहीद झालेल्या सहा जवानांची नावे अधिकृतपणे जाहीर केली आहेत.</div>
<div dir="auto">सूबेदार मेजर पवन कुमार, राइफलमैन सुनील कुमार, लांस नायक दिनेश कुमार, एविएशन टेक्नीशियन मूड मुरली नाइक, सुनील कुमार सिंह, सार्जेंट सुरेंद्र कुमार अशी या शहीद जवानांची नावे आहेत.</div>
<div dir="auto">लष्कराच्या 5 फील्ड रेजिमेंटचे लान्स नाईक दिनेश कुमार 7 मे रोजी शहीद झाले. तर 851 लाईट रेजिमेंटचे एव्हिएटर मूड मुरली नायक 9 मे रोजी, हवाई दलाच्या 39 विंगचे सार्जंट सुरेंद्र कुमार 10 मे रोजी शहीद झाले. याशिवाय, 4 जम्मू आणि काश्मीर लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार 10 मे रोजी शहीद झाले. 237 फील्ड वर्कशॉप कंपनीचे हवालदार सुनील कुमार सिंग 6 जून रोजी शहीद झाले. या शूर जवानांचा समावेश दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या वेबसाइटवरील ‘रोल ऑफ ऑनरश्मध्ये केला जाईल.</div>
<div dir="auto">गेल्या वर्षी मे महिन्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. आता, सरकारने पहिल्यांदाच या ऑपरेशनमध्ये शहीद झालेल्या सहा भारतीय जवानांची नावे सार्वजनिकरित्या जाहीर केली आहेत. यानंतर, विरोधी पक्षांनी सरकारच्या भूमिकेवर आणि संसदेत दिलेल्या माहितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विरोधी पक्षांनी (विशेषतः काँग्रेसने) आरोप केला आहे की, या ऑपरेशनदरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगून सरकारने आधी संसदेची दिशाभूल केली होती</div>
<div dir="auto">केंद्र सरकारने प्रथमच ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सहा भारतीय जवानांची नावे जाहीर केल्याने वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्षाने सरकारवर शहीदांची नावे दडवून ठेवल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले, ष्सरकारने या जवानांचे हौतात्म्य वर्षभर सार्वजनिक केले नाही. त्यांना जो सन्मान मिळायला हवा होता तो मिळाला नाही.</div>
<div dir="auto">त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याचा एक व्हिडिओ शेअर केला. त्यात, एका प्रश्नाच्या उत्तरात राजनाथ सिंह यांनी म्हटले होते की, ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणालाही इजा झाली नाही. खेरा म्हणाले, यामागे फक्त दोनच शक्यता आहेत. एकतर संरक्षण मंत्र्यांना त्यावेळी या सहा जवानांच्या हौतात्म्याबद्दल माहिती नव्हती, किंवा त्यांनी संसदेची दिशाभूल केली.</div>
<div dir="auto">खेडा म्हणाले की जर हे खरे असेल, तर मंत्रालयाचे प्रमुख असलेल्या मंत्र्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते. दुसरी शक्यता अशी आहे की संरक्षण मंत्र्यांना याची पूर्ण माहिती असूनही त्यांनी संसदेची दिशाभूल करणे निवडले. हे आणखी गंभीर आहे कारण यावरून हे सिद्ध होते की हे सरकार लोकशाहीच्या मंदिरात खोटे बोलते.ते पुढे म्हणाले की सहा शूर सैनिकांनी कर्तव्य बजावताना सर्वाेच्च बलिदान दिले हे सत्य बदलत नाही. त्यांनी आरोप केला की त्यांचे बलिदान लपवून ठेवण्यात आले. त्यांना मिळायला हवा असलेला आदर व सन्मान मिळाला नाही. ते असेही म्हणाले की,शहीदांच्या कुटुंबीयांना अपेक्षित असलेल्या पारदर्शकतेपासून वंचित ठेवण्यात आले. हा देशाच्या सैनिकांचा अपमान असून कोणताही खरा देशभक्त या विषयावर गप्प राहू शकत नाही.</div>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/national/231850/">केंद्र सरकारने पहिल्यांदा ऑपरेशन सिंदूर दरम्यान शहीद झालेल्या 6 जवानांची नावे केली सार्वजनिक</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
	</channel>
</rss>
