<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>विदर्भ Archives - Berar Times</title>
	<atom:link href="https://www.berartimes.com/category/vidarbha/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://www.berartimes.com/category/vidarbha/</link>
	<description>News Paper</description>
	<lastBuildDate>Thu, 04 Jun 2026 04:29:38 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=7.0</generator>

<image>
	<url>https://www.berartimes.com/wp-content/uploads/2017/09/cropped-bgt5-2-32x32.jpg</url>
	<title>विदर्भ Archives - Berar Times</title>
	<link>https://www.berartimes.com/category/vidarbha/</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातंर्गत खोडशिवनी ग्राम पंचायतीचे जिल्हास्तरीय मुल्यांकन</title>
		<link>https://www.berartimes.com/vidarbha/230733/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 04 Jun 2026 04:29:38 +0000</pubDate>
				<category><![CDATA[विदर्भ]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=230733</guid>

					<description><![CDATA[<p>सडक अर्जुनी,दि.०४ः महाराष्ट्र शासनाच्या हत्त्वाकांक्षी &#8216;मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान&#8217; अंतर्गत सडक अर्जुनी लुक्यातील खोडशिवनी ग्रामपंचायतीची तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली आहे. खोडशिवनी ग्रामपंचायत आता जिल्हास्तरीय पुरस्काराच्या शर्यतीत अंतिम टप्प्यात पोचली असून, याच्या अंतिम मुल्यमापनासाठी यवतमाळ जिल्ह्यातील तज्ञ अधिकाऱ्यांची विशेष जिल्हास्तरीय चमू १ जून रोजी गावात दाखल झाली होती. या समितीने खोडशिवनी ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष भेट [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/230733/">मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातंर्गत खोडशिवनी ग्राम पंचायतीचे जिल्हास्तरीय मुल्यांकन</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>सडक अर्जुनी,दि.०४ः</strong> महाराष्ट्र शासनाच्या हत्त्वाकांक्षी &#8216;मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान&#8217; अंतर्गत सडक अर्जुनी लुक्यातील खोडशिवनी ग्रामपंचायतीची तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली आहे. खोडशिवनी ग्रामपंचायत आता जिल्हास्तरीय पुरस्काराच्या शर्यतीत अंतिम टप्प्यात पोचली असून, याच्या अंतिम मुल्यमापनासाठी यवतमाळ जिल्ह्यातील तज्ञ अधिकाऱ्यांची विशेष जिल्हास्तरीय चमू १ जून रोजी गावात दाखल झाली होती. या समितीने खोडशिवनी ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष भेट देऊन विविध विकासकामांची व शासकीय दप्तराची (रजिस्टर) कसून तपासणी केली. या उच्चस्तरीय मूल्यमापन समितीमध्ये प्रामुख्याने यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पत्की, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी पांगोरे आणि विस्तार अधिकारी सी. एम. सुर्वे यांचा समावेश होता.<br />
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता सडक अर्जुनी तालुक्यातील एकूण १३ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता. या सर्व ग्रामपंचायतींमधून उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर खोडशिवनी ग्रामपंचायतीची तालुकास्तरावर निवड करण्यात आली. सदर ग्रामपंचायत जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी अंतिम स्पर्धेत असल्यामुळे, नियमानुसार तिचे मूल्यमापन बाह्य जिल्ह्यातील (यवतमाळ) विशेष चमूकडून करण्यात आले.<br />
शासनाने ठरवून दिलेल्या कडक निकषांनुसार खोडशिवनी ग्रामपंचायतीचे मूल्यमापन करण्यात आले, ज्यामध्ये प्रामुख्याने पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख डिजिटल कारभारावर आधारित &#8216;सुशासनमुक्त पंचायत&#8217;, कर वसुली आणि लोकसहभागातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी &#8216;स्वनिधी व लोकवर्गणी&#8217;, पर्यावरणपूरक समृद्ध गाव आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनावर आधारित &#8216;स्वच्छ व हरित गाव&#8217; आणि मनरेगा सह सर्व शासकीय योजनांचा प्रभावी मेळ घालणारे &#8216;योजनांचे अधिसरण&#8217; या मुख्य निकषांवर आधारित गुणांकन करण्यात आले. शासनाच्या निकषांप्रमाणे सर्व कामे पूर्ण करून आपला गाव समृद्ध कशाप्रकारे करता येईल, याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने विशेष लक्ष दिले होते.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/230733/">मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातंर्गत खोडशिवनी ग्राम पंचायतीचे जिल्हास्तरीय मुल्यांकन</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>रेल्वे स्थानकावर तिकीट नाका तपासणी मोहिम;२.१२ लाखाचा दंड वसूल</title>
		<link>https://www.berartimes.com/vidarbha/230732/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 04 Jun 2026 04:15:11 +0000</pubDate>
				<category><![CDATA[विदर्भ]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=230732</guid>

					<description><![CDATA[<p>गोंदिया : तिकीटाशिवाय आणि अनियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई व जागृकता निर्माण करण्याच्या अनुषंगाने गोंदिया रेल्वे स्थानकावर दक्षिण पूर्व मध्ये रेल्वे नागपूर विभागाच्या वतीने २ जून रोजी तिकीट नाका तपासणी मोहिम राबविण्यात आली. दरम्यान १८ गाड्यांची कसून तपासणी करून ४२३ प्रकरणात २ लाख १२ हजार ८३० रुपया दंडाची वसूली करण्यात आली. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/230732/">रेल्वे स्थानकावर तिकीट नाका तपासणी मोहिम;२.१२ लाखाचा दंड वसूल</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>गोंदिया :</strong> तिकीटाशिवाय आणि अनियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई व जागृकता निर्माण करण्याच्या अनुषंगाने गोंदिया रेल्वे स्थानकावर दक्षिण पूर्व मध्ये रेल्वे नागपूर विभागाच्या वतीने २ जून रोजी तिकीट नाका तपासणी मोहिम राबविण्यात आली. दरम्यान १८ गाड्यांची कसून तपासणी करून ४२३ प्रकरणात २ लाख १२ हजार ८३० रुपया दंडाची वसूली करण्यात आली.<br />
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत गोंदिया स्थानकावर २ जून रोजी एक विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. तिकीटविरहित प्रवासाला आळा घालणे आणि रेल्वेच्या नियमांविषयी प्रवाशांमध्ये जागरूकता वाढवणे हा या मोहिमेचा उद्देश होता. या मोहिमेदरम्यान एकूण १८ गाड्यांची कसून तपासणी करण्यात आली. तपासणी नाक्यांवर तिकीटाशिवाय आणि अनियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. ज्यामुळे विविध श्रेणींतील ४२३ प्रकरणांमध्ये एकूण २,१२,८३० रुपयांची वसुली झाली. दरम्यान, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, दिलीप सिंग यांनी सांगितले, &#8216;तिकिटाशिवाय प्रवास आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील प्रवाशांना रेल्वे परिसरात स्वच्छता राखण्याची आणि धूम्रपानासारख्या प्रतिबंधित गोष्टी टाळण्याची विनंती करण्यात येत आहे. तर नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांनी या मोहिमेचे कौतुक करताना सांगितले, &#8216;अशा विशेष तिकीट तपासणी मोहिमा प्रवाशांमध्ये शिस्त रुजवण्यात आणि रेल्वेच्या महसुलाची सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रवाशांनी नेहमी वैध तिकिटासह प्रवास करावा.तिकीट विरहित प्रवासाच्या २०३ प्रकरणांमध्ये १ लाख ४१ हजार ३३५ रुपये, अनियमित प्रवासाच्या १२७प्रकरणांमध्ये ६१ हजार ८९५ रुपये, नोंद न केलेल्या सामानाच्या ८६ प्रकरणांमध्ये ८ हजार ६०० रुपये, कचरा टाकण्याच्या ४ प्रकरणांमध्ये ४०० रुपये, धूम्रपानाच्या ३ प्रकरणांमध्ये ६०० अशा एकूण कारवाई २ लाख १२ हजार ८३० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.</p>
<p><strong>यांनी केली कारवाई</strong> या विशेष मोहिमेत वाणिज्य विभाग आणि रेल्वे संरक्षण दलाने संयुक्तपणे सहभाग घेतला. या मोहिमेतील एकूण सहभाग कर्मचारी खालीलप्रमाणे होता. सहायक वाणिज्य व्यवस्थापक अरविंद सॉ यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. ज्यात मुख्य वाणिज्य निरीक्षक २, मुख्य तिकीट निरीक्षक ९, प्रवासी तिकीट परीक्षक १८, बहु-कार्यकारी कर्मचारी-३ आणि रेल्वे संरक्षण दल &#8211; २ यांचा समावेश होता.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/230732/">रेल्वे स्थानकावर तिकीट नाका तपासणी मोहिम;२.१२ लाखाचा दंड वसूल</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>ओबीसी जनगणनेवर बहिष्काराचा एल्गार, साखळी उपोषणाचा २४ वा दिवस</title>
		<link>https://www.berartimes.com/vidarbha/230702/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 03 Jun 2026 15:45:59 +0000</pubDate>
				<category><![CDATA[विदर्भ]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=230702</guid>

					<description><![CDATA[<p>ओबीसी जनगणनेच्या लढ्यात सहभागी न झालेल्या खासदार, आमदार आणि मंत्र्यांचा बहिष्कार करण्याचा निर्णय  • ३०० ग्रामपंचायतीने बहिष्काराचा ठराव प्रशासनाला दिला  केंद्र सरकारचा ओबीसींच्या जनगणनेला नकार; विश्वासघातामुळे ओबीसी समाजाचा जनगणनेवर पूर्ण बहिष्कार! भंडारा, ३ जून: केंद्र सरकारने आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीयांसाठी (OBC) स्वतंत्र कॉलम ठेवला नसल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या ओबीसी संघटनांच्या साखळी उपोषणाचा आज [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/230702/">ओबीसी जनगणनेवर बहिष्काराचा एल्गार, साखळी उपोषणाचा २४ वा दिवस</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>ओबीसी जनगणनेच्या लढ्यात सहभागी न झालेल्या खासदार, आमदार आणि मंत्र्यांचा बहिष्कार करण्याचा निर्णय </strong></p>
<p>• <strong>३०० ग्रामपंचायतीने बहिष्काराचा ठराव प्रशासनाला दिला </strong></p>
<p><strong>केंद्र सरकारचा ओबीसींच्या जनगणनेला नकार; विश्वासघातामुळे ओबीसी समाजाचा जनगणनेवर पूर्ण बहिष्कार!</strong></p>
<p><strong>भंडारा, ३ जून:</strong> केंद्र सरकारने आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीयांसाठी (OBC) स्वतंत्र कॉलम ठेवला नसल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या ओबीसी संघटनांच्या साखळी उपोषणाचा आज २४ वा दिवस पूर्ण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे प्रशासनासोबत झालेली महत्त्वपूर्ण बैठक पूर्णपणे निष्फळ ठरली असून, ओबीसी संघटनांनी जनगणनेवरील आपल्या बहिष्काराचा निर्णय मागे घेण्यास ठाम नकार दिला आहे.</p>
<p><strong>प्रशासकीय बैठक आणि संघटनांचा निर्वाणीचा इशारा</strong></p>
<p>पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी (SDO), अतिरिक्त जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि ओबीसी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत भंडारा जिल्ह्यात जनगणनेला अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असल्याने जिल्हा प्रशासन चिंतेत आहे. म्हणूनच अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना उपोषण मागे घेण्याची आणि गावागावात जनगणनेचे काम सुरू करण्यासाठी प्रशासनाला मदत करण्याची विनंती केली. प्रशासन म्हणत आहे की ओबीसींची गणना पुढच्या टप्प्यात होईल, परंतु यावर ओबीसी संघटनांचा अजिबात विश्वास नाही.</p>
<p>विनंती फेटाळून लावत ओबीसी संघटनेच्या नेत्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सुनावले की,“केंद्र सरकारने ओबीसींचा स्वतंत्र कॉलम न ठेवून समाजाची घोर फसवणूक केली आहे. यापूर्वी २०१८ मध्ये तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘२०२१ च्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना होईल’ असे जाहीर आश्वासन दिले होते. परंतु, पुढे केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत सांगितले की, ‘SC आणि ST सोडून इतर कोणत्याही वर्गाची जातिनिहाय जनगणना होणार नाही.’ वेळ आल्यावर ओबीसींना जनगणनेतून गायब करणाऱ्या या विश्वासघातकी सरकारवर आमचा अजिबात विश्वास नाही. जोपर्यंत जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम दिला जात नाही, तोपर्यंत आमचा बहिष्कार कायम राहील आणि आम्ही एक पाऊलही मागे हटणार नाही.”बैठकीत सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोर्राम,संघर्ष कृती समितीचे समन्वयक सदानंद इलमे, प्रभाकर वैरागडे, रमेश शहारे, गोपाल सेलोकर, भगीरथ धोटे, डॉ बाळकृष्ण सार्वे,ललिता देशमुख ,शुभदा झंझाळ, मंगला वाडीभसमे, सुधाकर मोथलकर मनीषा बांगडकर,अरुण जगनाडे, विष्णू जगनाडे,तुळशीराम बोंद्रे , माधुरी खंडाईत,पंजाबराव कारेमोरे, विलास केळझालकर , शरद इटवाले, फेंडरकर सरपंच , भोयर सरपंच, गजानन पाचे,अरुण लुटे,शुभाष पाल,किशोर डोकरीमारे, भोजराज गाभने,विनायक बाणते,मनोज बोरकर,दयाराम आकरे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.</p>
<p><strong>बैठकांचे सत्र आणि वाढता जनआक्रोश</strong></p>
<p>२९ मे: निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात पहिली बैठक झाली.</p>
<p>१ जून: भंडारा तालुक्यातील जवळपास ५० ग्रामपंचायतींचे सरपंच आणि नागरिकांची उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यासोबत बैठक झाली, ज्यात सरपंचांनी प्रशासनाला स्पष्ट नकार दिला.</p>
<p>३ जून रोजी जिल्हाधिकारी आणि ओबीसी महामोर्चाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेली बैठकही पूर्णपणे निष्फळ ठरली.</p>
<p><strong>सरपंच संघटना मैदानात; महिला सरपंचांचे ऐतिहासिक पाऊल</strong></p>
<p>या आंदोलनाला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सरपंच संघटनांनी अधिकृत पाठिंबा दिला आहे. उपविभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत जवळपास ३०० ग्रामपंचायतींच्या सरपंच, प्रशासक आणि नागरिकांनी एकमुखाने निर्णय घेतला की, जर ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसेल, तर संपूर्ण गावातून ग्रामसभेच्या माध्यमातून जनगणनेवर पूर्णपणे बहिष्कार टाकला जाईल.ग्रामीण भागातील महिला सरपंच आणि कमी शिक्षित प्रतिनिधी आपल्या पुढील पिढीच्या भविष्यासाठी आणि सामाजिक न्यायासाठी प्रशासनाचा रोष पत्करून अत्यंत धैर्याने या आंदोलनात आघाडीवर आहेत, ही या आंदोलनाची मोठी ताकद बनली आहे.</p>
<p><strong>आंदोलनाची पुढील दिशा: ५ जून रोजी ‘महाआंदोलन’</strong></p>
<p>हा लढा केवळ भंडारा जिल्ह्यापुरता मर्यादित नसून भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये बहिष्काराची मोहीम तीव्र गतीने सुरू आहे. संपूर्ण विदर्भातून याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, आगामी ५ जून रोजी वडसा (गडचिरोली) येथे विशाल ओबीसी आंदोलन आणि नागपूर येथे भव्य धरणे आंदोलन केले जाणार आहे.</p>
<p>“<strong>ओबीसी जनगणना म्हणजे आपल्या मुलाबाळांचे आणि येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य आहे. ओबीसी समाज आता आपल्या अधिकारांप्रती पूर्णपणे जागृत झाला आहे हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांनी या बहिष्काराच्या मोहिमेत सामील व्हावे.”</strong><strong>उमेश कोर्राम</strong></p>
<p>&nbsp;</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/230702/">ओबीसी जनगणनेवर बहिष्काराचा एल्गार, साखळी उपोषणाचा २४ वा दिवस</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>भागीमारी मुक्कामी भेटीत जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी साधला थेट संवाद</title>
		<link>https://www.berartimes.com/vidarbha/230691/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 03 Jun 2026 14:04:49 +0000</pubDate>
				<category><![CDATA[विदर्भ]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=230691</guid>

					<description><![CDATA[<p>नागपूर, दि. 3 : गावातील प्रत्येक घटकांच्या विकासासाठी ग्रामपंचायत ही बांधील आहे. गावासाठी जे आवश्यक आहे ते ठरविण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठीही ग्रामपंचायत सक्षम असून दिव्यांगांच्या विकासासाठी पाच टक्के खर्च करण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना आहे. याबाबत अधिक दक्षतेने पुढे येऊन काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. जिल्हा विकासाचे व्यापक नियोजन करताना [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/230691/">भागीमारी मुक्कामी भेटीत जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी साधला थेट संवाद</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<div class="xdj266r x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs x126k92a"></div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto"><strong>नागपूर, दि. 3 :</strong> गावातील प्रत्येक घटकांच्या विकासासाठी ग्रामपंचायत ही बांधील आहे. गावासाठी जे आवश्यक आहे ते ठरविण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठीही ग्रामपंचायत सक्षम असून दिव्यांगांच्या विकासासाठी पाच टक्के खर्च करण्याचा अधिकार ग्रामपंचायतींना आहे. याबाबत अधिक दक्षतेने पुढे येऊन काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">जिल्हा विकासाचे व्यापक नियोजन करताना गावपातळीवर लोकांना नेमक्या कोणत्या योजना अपेक्षित आहेत, हे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 2 जून रोजी पारशिवनी तालुक्यातील भागीमारी गटग्रामपंचायतीत मुक्कामी भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. या संवादादरम्यान 30 वर्षीय दिव्यांग धर्मराज भारसाखरे यांनी ग्रामपंचायतीकडून अपेक्षित लाभ मिळाले नसल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">धर्मराज यांची व्यथा ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भागीमारी ग्रामपंचायतीने गत तीन वर्षांत दिव्यांगांसाठी किती खर्च केला याची पडताळणी करून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना दिले. तसेच ग्रामपंचायतीमार्फत आजवर किती दिव्यांगांना मदत करण्यात आली याचाही सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">तत्पूर्वी कन्हान येथील नगरपरिषद सभागृहात सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील व आपदा मित्र यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक घेण्यात आली. पारशिवनी तालुक्यातील आठ गावे पूरप्रवण क्षेत्रात मोडत असल्याने आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.</div>
</div>
<div class="x14z9mp xat24cr x1lziwak x1vvkbs xtlvy1s x126k92a">
<div dir="auto">कन्हान भेटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बोर्डा गणेशी येथील अंतरंग फार्म्स प्रोड्युसर कंपनीच्या राईस मिलची पाहणी केली. तसेच परिसरातील पाणंद रस्त्यांचीही पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.यावेळी उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन, तहसीलदार सुरेश वाघचौरे, गटविकास अधिकारी सुभाष जाधव व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.</div>
</div>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/230691/">भागीमारी मुक्कामी भेटीत जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी साधला थेट संवाद</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>नागपूर जिल्हा परिषदेच्या ‘प्रोजेक्ट ड्रीम’ ला मिळणार राष्ट्रीय ओळख</title>
		<link>https://www.berartimes.com/vidarbha/230681/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 03 Jun 2026 13:27:15 +0000</pubDate>
				<category><![CDATA[विदर्भ]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=230681</guid>

					<description><![CDATA[<p>भारतीय टपाल विभागाच्या विशेष कव्हरवर मिळाले स्थान नागपूर, दि. ३ जून :विद्यार्थ्यांसह गावपातळीवरील सर्वच घटकांमध्ये वाचनसंस्कृती, अध्ययनाची आवड, जागरूकता, व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी तसेच त्यांना डिजिटल तंत्रज्ञानाचीही ओळख करुन देण्याच्या उद्देशाने नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बहुचर्चित ‘प्रोजेक्ट ड्रीम’ (Dedicated Reading Rooms for Empowerment, Awareness &#38; Motivation) या अभिनव उपक्रमाला भारतीय टपाल विभागाने [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/230681/">नागपूर जिल्हा परिषदेच्या ‘प्रोजेक्ट ड्रीम’ ला मिळणार राष्ट्रीय ओळख</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>भारतीय टपाल विभागाच्या विशेष कव्हरवर मिळाले स्थान</strong></p>
<p><strong>नागपूर, दि. ३ जून :</strong>विद्यार्थ्यांसह गावपातळीवरील सर्वच घटकांमध्ये वाचनसंस्कृती, अध्ययनाची आवड, जागरूकता, व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी तसेच त्यांना डिजिटल तंत्रज्ञानाचीही ओळख करुन देण्याच्या उद्देशाने नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बहुचर्चित ‘प्रोजेक्ट ड्रीम’ (Dedicated Reading Rooms for Empowerment, Awareness &amp; Motivation) या अभिनव उपक्रमाला भारतीय टपाल विभागाने विशेष सन्मान प्रदान केला आहे. या अभिनव उपक्रमाला टपाल विभागाने आपल्या विशेष टपाल कव्हरवर स्थान दिले असल्याने ‘प्रोजेक्ट ड्रीम’ला राष्ट्रीय स्तरावर व्यापक ओळख मिळणार आहे.<br />
नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या संकल्पनेतून गेल्यावर्षी नागपूर जिल्ह्यात ‘प्रोजेक्ट ड्रीम’ ची सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील १०३ गावांमध्ये अत्याधुनिक लायब्ररी सुरु करण्यात आल्या आहेत. या लायब्ररी उभारण्यासाठी गावांमध्ये उपयोगात नसलेल्या किंवा फारसा वापर नसलेल्या इमारतींचा वापर करण्यात आला असून त्यांना आधुनिक रूप देण्यात आले आहे. सध्या या लायब्ररींमध्ये स्पर्धा परीक्षांसह, शैक्षणिक, कथा-कादंबऱ्यांसह विविध पुस्तकांचे संच उपलब्ध करण्यात आले आहेत. याशिवाय दोन संगणक आणि स्मार्ट टीव्ही उपलब्ध करण्यात आले आहेत. गावांमधील प्रामुख्याने युवावर्ग मोठ्या प्रमाणात या सुविधांचा मोफत वापर करत आहेत. लायब्ररीतील स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून युवावर्गाला विविध शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच स्पर्धा परीक्षेची तयारीचा लाभ घेता येत आहे. येत्या काळात आणखी १०० गावांमध्ये अशा सुसज्ज लायब्ररी उभारण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या स्तरावर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फेलोशीप कार्यक्रमाचे वेदांत पाठक यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या या प्रकल्पाची भारतीय टपाल विभागाने एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने दखल घेतली असून टपाल विभागाच्या वतीने विशेषप्रसंगी तयार येणाऱ्या विशेष कव्हरवर (एक प्रकारचा विशेष लिफाफा) यंदा ‘प्रोजेक्ट ड्रीम’ला स्थान देण्यात आले आहे. या कव्हरचे वितरण देशपातळीवर होत असल्याने यानिमित्ताने नागपूर जिल्हा परिषदेच्या या प्रकल्पाला देशव्यापी ओळख मिळणार आहे. टपाल तिकिटांप्रमाणे टपाल विभागाच्या विशेष कव्हर्सचे संकलन करणारा एक मोठा वर्ग (फिलाटेलिस्ट) आहे, हे विशेष.<br />
भारतीय टपाल विभाग आणि जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अलिकडेच या विशेष कव्हरचा प्रकाशन सोहळा नागपूर जीपीओ येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निलेश गुंड, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) निखिल भुयार, मुख्यमंत्री फेलो वेदांत पाठक, वरिष्ठ पोस्टमास्तर सुजितकुमार लांडगे तसेच जिल्हा परिषद आणि भारतीय टपाल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/230681/">नागपूर जिल्हा परिषदेच्या ‘प्रोजेक्ट ड्रीम’ ला मिळणार राष्ट्रीय ओळख</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>नागपूर येथे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता</title>
		<link>https://www.berartimes.com/vidarbha/230680/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 03 Jun 2026 13:23:21 +0000</pubDate>
				<category><![CDATA[विदर्भ]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=230680</guid>

					<description><![CDATA[<p>नागपूर, दि. 3 : आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणे योजनेअंतर्गत नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 4 कोटी किमतीच्या प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प उभारणीच्या प्रस्तावास राज्य शासनाने आज प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने आज या संदर्भातील शासन निर्णय निर्गमीत केला आहे. यानुसार आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणे योजनेच्या 27 डिसेंबर 2023 आणि [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/230680/">नागपूर येथे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>नागपूर, दि. 3 :</strong> आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणे योजनेअंतर्गत नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 4 कोटी किमतीच्या प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प उभारणीच्या प्रस्तावास राज्य शासनाने आज प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.</p>
<p>सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने आज या संदर्भातील शासन निर्णय निर्गमीत केला आहे. यानुसार आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणे योजनेच्या 27 डिसेंबर 2023 आणि 8 ऑक्टोबर 2025 च्या शासन निर्णयातील अटी व शर्तीस अधिन राहून या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेची नोडल एजन्सी म्हणून कार्यकारी संचालक, राज्य कृषी पणन मंडळ पुणे हे काम पाहणार आहेत. 27 डिसेंबर 2023 च्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार या योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी प्रथमत: लाभार्थ्यांनी किमान 15 टक्के स्वनिधी खर्च करणे आवश्यक असून उर्वरित 85 टक्के अर्थसहाय्य आवश्यकतेनुसार बँकेकडून कर्ज स्वरुपात घ्यावयाचे आहे. राज्य कृषी पणन मंडळाने कामाची प्रत्यक्ष पाहणी करुन बांधकाम पुर्णत्वाचे प्रमाणपत्र द्यायचे आहे. यानंतर शासनाकडून प्रकल्प किंमतीच्या (कमाल 4 कोटी) कमाल 50 टक्के मर्यादेपर्यंतचे अनुदान राज्य कृषी पणन मंडळाला वितरीत करण्यात येईल व त्यानंतर मंडळामार्फत अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. प्रशासकीय मान्यतेनंतर सदर प्राथमिक प्रकल्पाचे काम 2026-2027 या आर्थिक वर्षात पूर्ण करण्याची अट या शासन निर्णयात नमूद आहे.</p>
<p>दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल व कळमेश्वर तसेच अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि बुलढाणा येथे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणे योजनेस 27 डिसेंबर 2023 च्या शासन निर्णयानुसार मान्यता प्रदान करण्यात आली होती.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/230680/">नागपूर येथे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>कोटगल येथे केंद्र सरकारच्या योजनेतील नालीचे काम निकृष्ट; दोन दिवसांतच बांधकामाला तडे</title>
		<link>https://www.berartimes.com/vidarbha/230670/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 03 Jun 2026 11:06:43 +0000</pubDate>
				<category><![CDATA[विदर्भ]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=230670</guid>

					<description><![CDATA[<p>कोटगल:केंद्र सरकारच्या निधीतून कोटगल येथे सध्या रस्ते आणि नालीचे काम मोठ्या उत्साहात सुरू आहे. मात्र, या कामाच्या दर्जाबाबत स्थानिक नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सार्वजनिक कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप होत आहे. नेमकी तक्रार काय? मिळालेल्या माहितीनुसार, नियोजित नकाशातील मापापेक्षा नालीचे रुंदीकरण कमी ठेवण्यात आले आहे. [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/230670/">कोटगल येथे केंद्र सरकारच्या योजनेतील नालीचे काम निकृष्ट; दोन दिवसांतच बांधकामाला तडे</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>कोटगल:</strong>केंद्र सरकारच्या निधीतून कोटगल येथे सध्या रस्ते आणि नालीचे काम मोठ्या उत्साहात सुरू आहे. मात्र, या कामाच्या दर्जाबाबत स्थानिक नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सार्वजनिक कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप होत आहे.<br />
<strong>नेमकी तक्रार काय?</strong><br />
मिळालेल्या माहितीनुसार, नियोजित नकाशातील मापापेक्षा नालीचे रुंदीकरण कमी ठेवण्यात आले आहे. इतकेच नाही, तर सिमेंटच्या बांधकामासाठी जेवढी पाण्याची (क्युअरिंग) आवश्यकता असते, ती दिली गेली नाही. परिणामी, काम पूर्ण होऊन दोन दिवस उलटत नाही तोच नालीच्या भिंतींना जागोजागी तडे गेले आहेत.<br />
नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, केंद्र सरकारच्या निधीचा अशा प्रकारे दुरुपयोग होणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी या कामाची त्वरित पाहणी करून, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी कोटगलमधील सजग नागरिकांनी केली आहे.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/230670/">कोटगल येथे केंद्र सरकारच्या योजनेतील नालीचे काम निकृष्ट; दोन दिवसांतच बांधकामाला तडे</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>आत्मसमर्पित माओवादीनी बांधली विवाह गाठ;गोलू आणि संगीताची नव्या आयुष्याकडे वाटचाल</title>
		<link>https://www.berartimes.com/vidarbha/230667/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 03 Jun 2026 11:02:57 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Top News]]></category>
		<category><![CDATA[विदर्भ]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=230667</guid>

					<description><![CDATA[<p>गोंदिया, दि.3 : अलीकडील काळात गोंदिया जिल्ह्यात एकूण 15 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून त्यांना पोलीस मुख्यालय कारंजा, गोंदिया येथील पोलीस वसाहतीत ठेवण्यात आलेले आहे. या आत्मसमर्पित सदस्यांपैकी पांडू पुसू वड्डे ऊर्फ गोलू आणि सैवंती रायसिंग पंधरे ऊर्फ संगीता या दोघांनी आजन्म सोबत राहण्याची विवाह गाठ पोलीस मुख्यालयात बांधली. त्यांच्या या लग्न सोहळ्यास पोलीस अधीक्षक गोरख [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/230667/">आत्मसमर्पित माओवादीनी बांधली विवाह गाठ;गोलू आणि संगीताची नव्या आयुष्याकडे वाटचाल</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p style="font-weight: 400;"><strong>गोंदिया, दि.3 :</strong> अलीकडील काळात गोंदिया जिल्ह्यात एकूण 15 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून त्यांना पोलीस मुख्यालय कारंजा, गोंदिया येथील पोलीस वसाहतीत ठेवण्यात आलेले आहे. या आत्मसमर्पित सदस्यांपैकी पांडू पुसू वड्डे ऊर्फ गोलू आणि सैवंती रायसिंग पंधरे ऊर्फ संगीता या दोघांनी आजन्म सोबत राहण्याची विवाह गाठ पोलीस मुख्यालयात बांधली. त्यांच्या या लग्न सोहळ्यास पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी मंजुरी देत इथेच त्यांचे लग्न लावूनही दिले.</p>
<p style="font-weight: 400;">वर- पांडू पुसू वड्डे (वय 37 वर्षे), रा.  तिरलागड, ता. पखांजूर, जि. कांकेर (छत्तीसगड), माओवादी संघटनेत गोलू या नावाने ओळखला जात होता. तो सीपीआय (माओवादी) संघटनेत दर्रेकसा एरियामध्ये डिव्हिजनल कमिटी सदस्य (DVCM) म्हणून कार्यरत होता.</p>
<p style="font-weight: 400;">वधू- सैवंती रायसिंग पंधरे (वय 36 वर्षे), रा. राशीमेटा, ता. बैहर, जि. बालाघाट (मध्यप्रदेश), माओवादी संघटनेत संगीता या नावाने ओळखली जात होती. ती दरेकसा एरिया कमिटीमध्ये एरिया कमिटी सदस्य (ACM) म्हणून कार्यरत होती.</p>
<p style="font-weight: 400;">अनेक वर्षे हिंसाचार, संघर्ष आणि अनिश्चिततेच्या वातावरणात जीवन व्यतीत केल्यानंतर या दोघांनीही 28 नोव्हेंबर 2025 रोजी गोंदिया पोलिसा समक्ष आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात परतण्याचा धाडसी निर्णय घेतला. समाजात सन्मानाने जगण्याची, स्वतःचे कुटुंब उभे करण्याची आणि शांततामय भविष्य घडविण्याची त्यांची इच्छा या निर्णयामागे होती.</p>
<p style="font-weight: 400;">हा विवाह केवळ दोन व्यक्तींचा मिलाफ नसून हिंसेवर शांततेचा, भीतीवर विश्वासाचा आणि निराशेवर आशेचा विजय आहे. कुटुंबीय, नातेवाईक, स्थानिक नागरिक आणि पोलीस अधिकारी/ अंमलदार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याने नवजीवनाची, स्वीकाराची आणि सामाजिक पुनर्स्थापनेची सुंदर अनुभूती सर्वांना दिली.</p>
<p style="font-weight: 400;">शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन योजनांतर्गत नमूद आत्मसमर्पित माओवाद्यांचे आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, बँक खाते आणि इतर विविध आवश्यक कागदपत्रे तयार करणे, रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणे, तसेच त्यांचे पुनर्वसन संबंधाने इतर कार्यवाही सुरु असून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.</p>
<p style="font-weight: 400;">याच पुनर्वसन प्रक्रियेचा एक भावनिक आणि प्रेरणादायी टप्पा म्हणून पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांचे संकल्पनेतून, तसेच प्रभारी पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली रविवारी परिवर्तन आणि नव्या जीवनप्रवासाचे प्रतिक ठरणारा एक हृदयस्पर्शी व प्रेरणादायी विवाह सोहळा पार पडला. शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणाच्या यशाचे जिवंत उदाहरण म्हणून दोन आत्मसमर्पित सी.पी.आय. (माओवादी) नक्षल सदस्य विवाहबंधनात अडकले आणि शांततामय, सन्माननीय जीवनाची नवी सुरुवात केली.</p>
<p style="font-weight: 400;">हा प्रसंग शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीचा तसेच पोलीस विभाग व जिल्हा प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम आहे. योग्य संधी, मार्गदर्शन आणि समाजाचा स्वीकार मिळाल्यास हिंसक विचारसरणीच्या प्रभावाखाली गेलेले व्यक्तीदेखील शांततेचा मार्ग स्वीकारून समाजाचे जबाबदार घटक बनू शकतात, याचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे.</p>
<p style="font-weight: 400;">या विवाह सोहळ्यामुळे अद्याप जंगलात कार्यरत असलेल्या माओवादी सदस्यांनाही एक सकारात्मक संदेश मिळतो की, हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केल्यास त्यांनाही सन्मानाने, सुरक्षिततेने आणि आनंदाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध आहे. प्रत्येक व्यक्तीला नव्याने उभे राहण्याची आणि समाजात आपले स्थान निर्माण करण्याची दुसरी संधी मिळू शकते, हा विश्वास या घटनेने अधिक दृढ केला आहे.</p>
<p style="font-weight: 400;">संपूर्ण विवाह सोहळा शांततापूर्ण वातावरणात आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता यशस्वीरित्या पोलिस मुख्यालय कारंजा, गोंदिया येथील प्रेरणा सभागृहात पार पडला. प्रभारी पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पोलिस निरीक्षक नक्षल सेल प्रमोद भातनाते, राखीव पोलीस निरीक्षक राजेश सरोदे, पोलीस उपनिरीक्षक नक्षल सेल श्रीकांत हत्तीमारे, नक्षल ऑपरेशन सेल देवरी मल्लिकार्जुन वासुदेव, तसेच नक्षल सेल गोंदिया, इंटर सेल देवरी, सी 60 पथक आणि पोलिस मुख्यालय, गोंदिया येथील पोलीस स्टाफने आवश्यक समन्वय व सहकार्य उपलब्ध करून दिले.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/230667/">आत्मसमर्पित माओवादीनी बांधली विवाह गाठ;गोलू आणि संगीताची नव्या आयुष्याकडे वाटचाल</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>दडपशाही थांबवा, अन्यथा ओबीसी जनआंदोलनाचा वणवा पेटणार &#8211; अनिल देशमुख</title>
		<link>https://www.berartimes.com/vidarbha/230663/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 03 Jun 2026 05:25:11 +0000</pubDate>
				<category><![CDATA[विदर्भ]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=230663</guid>

					<description><![CDATA[<p>नागपूरः देशात आणि महाराष्ट्रात ओबीसी समाजाची लोकसंख्या प्रचंड असतानाही स्वातंत्र्यापासून आजतागायत या समाजाला अचूका मूल्यांकनापासून वंचित उतण्यात आले आहे. केंद्र सरकारने जानगणनेच्या अर्जात ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलग तात्काळ रामाविष्ट करावा, अन्यथा राज्यातील ओबीसी बांधव जनगणना होऊ देणार नाहीत,&#8217; असा आक्रमक पहित्रा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। शरदचंद्र पवार) पक्षाच्या ओबीसी सेलने घेतला आहे. यासंदर्भात ओ. बी. सी. [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/230663/">दडपशाही थांबवा, अन्यथा ओबीसी जनआंदोलनाचा वणवा पेटणार &#8211; अनिल देशमुख</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p>नागपूरः देशात आणि महाराष्ट्रात ओबीसी समाजाची लोकसंख्या प्रचंड असतानाही स्वातंत्र्यापासून आजतागायत या समाजाला अचूका मूल्यांकनापासून वंचित उतण्यात आले आहे. केंद्र सरकारने जानगणनेच्या अर्जात ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलग तात्काळ रामाविष्ट करावा, अन्यथा राज्यातील ओबीसी बांधव जनगणना होऊ देणार नाहीत,&#8217; असा आक्रमक पहित्रा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। शरदचंद्र पवार) पक्षाच्या ओबीसी सेलने घेतला आहे. यासंदर्भात ओ. बी. सी. सेलचा विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष तपदाधिकार्यांच्या एक बैठक आजमंगळठापला अनिल देशमुख यांच्या निवास्थानी पार पडली, यानंतर सर्वांच्या स्वाक्षऱ्यांचे एक सठिस्तर निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सादर करण्यात आले आहे.<br />
या निवेदनाबाबत माहिती देताना पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितले की, १९३१ नंतर देशात जातनिहाय जनगणना झालेली नाही, मंडल आयोगाने ओबीसींची संख्या ५२ टक्के असल्याचा अंदाज वर्तवला होता, ज्यात आता मक्कीच वाहझाली आहे. ओपर्यंत ओबीसीत्ता रवतंत्र एम्पिरिकल डेटा समोर येत नाही, तोपर्यंत शिक्षण, नौकच्या आणि कल्याणकारी योजनांमध्ये या समाजाला योग्य न्याय मिळणे अशक्य आहे. म्हणूनच, आधी ओबीसीचा कॉलम आणा आणि नंतरच जनगणनेचे दप्तर उघड़ा। हीच आज राज्यातील कोटातथी ओबीसी बांधवांची आग्रही मागणी आहे.या निवेदनावर अनिल देशमुख, ओबीसी सेलचे प्रदेशा अध्यात राज राजापूरकर यांच्यासह विदर्भातील बुलडाणा, वाशीम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यातील ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.</p>
<p>निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांनी अनगणनेवर तीव्र बहिष्कार टाकला आहे. एकीकडे शासन डिजिटल जनगणनेचे दावे करत असताना, दुसरीकडे प्रत्यक्ष अमिनीवर गोंधळाची परिस्थिती आहे. वरिष्ठ अधिकारी गार्वांमध्ये जाऊन नागरिकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाहीत प्रशासनाची अशी दडपशाही कदापि खपवून घेतली जाणार नाही, राज्यात कायदाशुष्यवस्था प्रश्न निर्माण होण्यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून सकारात्मक पावले आलावीत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.<br />
<strong>प्रमुख मागण्या</strong><br />
न्याय्य केंद्र सरकारकडे तातडीने पाठपुरावा करून जनगणनेच्या अर्जात &#8216;ओबीसी&#8217; समाजासाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्यात यावा. जोपर्यंत जनगणनेच्या अर्जात हा बदल होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र राज्यातील जनगणनेची प्रक्रिया पूर्णपणे स्थगित ठेवावी. मागणीसाठी जनगणनेवर बहिष्कार टाकणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेवर आणि गावकऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्याऱ्यांमार्फत केली जाणारी दडपशाही किंवा कायदेशीर कारवाई त्वरित थांबवण्यात यावी अशी मागणीही अनिल देशमुख यांच्यासह पदाधिकान्यांनी निवेदनातून केली आहे.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/230663/">दडपशाही थांबवा, अन्यथा ओबीसी जनआंदोलनाचा वणवा पेटणार &#8211; अनिल देशमुख</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>गोवंश अवयव प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करा</title>
		<link>https://www.berartimes.com/vidarbha/230659/</link>
		
		<dc:creator><![CDATA[berarAdmin]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 03 Jun 2026 02:44:45 +0000</pubDate>
				<category><![CDATA[विदर्भ]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.berartimes.com/?p=230659</guid>

					<description><![CDATA[<p>गोरेगाव : शहरातील घोटी येथील तलावात गोवंशाचे अवयव आढळून आल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हिंदू समाजबांधवांतून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच सकल हिंदू समाज व विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.निवेदनात,तलाव परिसरात आढळून आलेल्या गोवंशाच्या अवयवांमुळे [&#8230;]</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/230659/">गोवंश अवयव प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करा</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p><strong>गोरेगाव :</strong> शहरातील घोटी येथील तलावात गोवंशाचे अवयव आढळून आल्याच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हिंदू समाजबांधवांतून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच सकल हिंदू समाज व विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.निवेदनात,तलाव परिसरात आढळून आलेल्या गोवंशाच्या अवयवांमुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून, या घटनेमागील जबाबदार व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन संबंधित घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नेमावे, घटनेमागील सूत्रधारांचा शोध घ्यावा तसेच कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच अशा घटनांमुळे सामाजिक सलोखा व शांतता बिघडू नये यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे नमूद आहे.</p>
<p>The post <a href="https://www.berartimes.com/vidarbha/230659/">गोवंश अवयव प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करा</a> appeared first on <a href="https://www.berartimes.com">Berar Times</a>.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
	</channel>
</rss>
