ताजणे परिवार भागवतोय तहाण

0
11

मालेगाव(वाशिम)-सध्या पाण्याची टंचाई सर्वत्र जाणवत असून वाशिम जिल्ह्यात सुध्दा भीषण पाणी टंचाई दिसून येत आहे.त्यातच मालेगाव येथेही पाणी टंचाईचा फटका बसलेला असतानाच येथील ताजणे कुटुंब मात्र आपल्या घरातील बोरवेल मधून वार्ड क्र.3,4 व 5 मधील नागरिकांना निशुल्क पाणी पुरवठा करीत असल्याचे चित्र समोर आले आहे.गेल्या 2 महिन्यापासून रमेश गोविंदा ताजणे हे आपल्या घरातील बाेरवलेच पाणी सकाळी सात वाजेपासून वाटप करण्यास सुरवात करतात त्यांच्या या कार्याचा सर्वत्र उल्लेख होत असतानाच प्रशासन मात्र मालेगाव मधील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावू शकला नाही.