मारहाणीची भीती ज्या डॉक्टरांना वाटत असेल त्यांनी नोकरी सोडावी

0
5

मुंबई दि. 21– मारहाणीची भीती ज्या डॉक्टरांना वाटत असेल त्यांनी नोकरी सोडावी, असे सांगत निवासी डॉक्टरांना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले आहे. गेल्या आठ दिवसांत चार ठिकाणी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. निवासी डॉक्टरांनी या हल्ल्यांच्या निषेधार्थ संपाचे हत्यार उपसल्यामुळे राज्यातील रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. यावर संपकरी निवासी डॉक्टरांना उच्च न्यायालयाने खडेबोल सुनावले.
डॉक्टरांना जर मारहाणीची भीती वाटत असेल तर त्यांनी नोकरी सोडावी. अशा प्रकारे आंदोलन करण्याचे डॉक्टरांचे वर्तन हे डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारे आहे. तुम्ही तुमचे कर्तव्य योग्यतेने पार पाडत नसाल तर काम करायलासुद्धा अपात्र आहात. एखाद्या कारखान्यातील कामगाराप्रमाणे तुम्ही वागू नका, असे म्हणत निवासी डॉक्टरांना उच्च न्यायालयाने फटकारले. तसेच निवासी डॉक्टर ऐकत नाहीत तर त्यांना संघटना काढून का टाकत नाही? असा सवाल करत जे डॉक्टर ऐकत नाहीत त्यांची नावे आम्हाला सांगा, असेही यावेळी उच्च न्यायालयाने म्हटले.