बिलोली तालुक्यातील दौलापुर येथे घर जळून खाक

0
15

नांदेड /बिलोली ( सय्यद रियाज ),दि.29- तालूक्यातील मौ.दौलापुरयेथील घराला लागलेल्या आगीत जीवनोपयोगी साहित्यासह आंदाजीत दोन ते तीन  लाख रुपयांचे  नुकसान झाल्याचे कळते दि.27 रोजी गुरुवार भर दुपारी घरास आचानकपणे  लागलेल्या आगीत येथिल शेतकरी  विठ्ठल नागोराव यांचे घर आगीत भस्मसात झाले आसुन घरातील अन्नधान्य ,कपडे ,भांडी कुंडी,कुलर ,टिव्ही, फ्रीज, मोठे जनरेटर तसेच घरात ठेवलेले 60 हजार रुपये  अदी जळून खाक झाले आसुन  सदरील कुटुंब उघड्यावर पडले आहे .

घटनास्थळी आखील भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे विभागीय अध्यक्ष राजु पाटील शिंपाळकर , सगरोळी गटाचे जिल्हा परिषद सदस्य श्रीमतीसुंदर बाई यांचे प्रतिनिधि गणेश पाटील , युवक कॉग्रेस चे दत्तू कोटनोड अदीनी भेट दिली. तहसिल कडुन पंचनामा करण्यात आला.यावेळी तलाठी देशमुख व मंडळ अधिकारी  महेत्रे यांनी पंचनामा करुन 1 लाख 85 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले.