राजकीय व‘अायएएस’लाभासाठी अाेबीसीतूनच अारक्षण द्या: राधाकृष्ण विखे पाटील

0
23

मुंबई,दि.20(विशेष प्रतिनिधी) – मराठा समाजाला विशेष प्रवर्गातील अारक्षण देण्याचा निर्णय सरकारने जाहीर करताच त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले अाहेत. काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून अारक्षण न देता ‘अाेबीसी’त वेगळा उपप्रवर्ग तयार करूनच पूर्वीप्रमाणे १६ टक्के अारक्षण देण्यात यावे, त्यासाठी अाेबीसींच्या अारक्षणाची टक्केवारी वाढवण्यात यावी, अशी मागणी केली. ‘अाेबीसींतून अारक्षण न दिल्यास मराठ्यांना अायएएस, केंद्रीय सेवेपासून वंचित राहावे लागेल असे म्हटले आहे.

राखीव प्रवर्गातून साधी ग्रामपंचायतीची निवडणूकही लढवता येणार नाही,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. तर अाेबीसींच्या १० संघटनांनी एकत्र येत मराठा समाजाला ‘विशेष प्रवर्गा’त समाविष्ट करण्यासही विराेध केला. पत्रकारांशी बाेलताना विखे म्हणालेे, ‘मुख्यमंत्र्यांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तयार करून मराठा आरक्षण देण्याची घोषणा केली. पण हे पुरेसे नाही.’ दरम्यान, मराठा समाजाचा ओबीसीत समावेश होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी औरंगाबादेत बोलताना व्यक्त केली.

मराठ्यांना विशेष प्रवर्गात घेण्यासही १० अाेबीसी संघटनांचा विराेध

मराठा समाजाला विशेष प्रवर्गातून (एसईबीसी) देऊ केलेल्या आरक्षणास अाेबीसी समाजाच्या १० संघटनांनी एकत्र येऊन स्थापलेल्या फेडरेशनने विराेध केला अाहे. ‘असे अारक्षण देऊन सरकार मराठा समाजाला ‘ओबीसी’च ठरवत आहे. त्यामुळे मूळ अाेबीसींचे नुकसान हाेणार अाहे,’ असा अाक्षेप घेत या निर्णयाविराेधात हायकाेर्टात जाण्याचा इशारा फेडरेशनने दिला. इतर ओबीसी संघटना सामील करून हा लढा तीव्र करण्याचा निर्णय बैठकीत झाला. या वेळी माळी महासंघाचे शंकरराव लिंगे, प्रकाश शेंडगे, बालाजी शिंदे, परीट संघटनेचे नामदेव खरवणे, ओबीसी जनगणना परिषदेचे श्रावण देवरे, आ. हरिभाऊ राठाेड आदी हजर होते.