राज्यातील सहा आमदार संसदेत

0
18

मुंबई,दि.25ःः लोकसभा निवडणुकीत विविध पक्षांचे १४ आमदार महाराष्ट्रातील जनतेकडून जनमताचा कौल आजमावत होते. त्यापैकी सहा आमदार राज्यातून लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यामध्ये पुण्यातील भाजप आमदार आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे, त्यामुळे त्यांना आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. औरंगाबादमधून ‘एमआयएम’चे आमदार इम्तियाज जलील हे संसदेवर गेले आहेत. विदर्भातील शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर हे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले आहेत.चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील, नांदेडमधील आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोलीतील आमदार हेमंत पाटील हे लोकसभा निवडणुकीत विजयी ठरल्याने त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. सरकारच्या शेवटच्या अधिवेशनातही हे हजर राहू शकणार नाहीत.