नागपूरात वेदचे विकास धोरणावर चर्चासत्र

0
10

नागपूर : विदर्भ आर्थिक विकास परिषदेने (वेद) आयोजित केलेल्या ‘पॉलिटिक्स आॅफ डेव्हलपमेंट’ या विषयावर रविवार, २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटरमध्ये चर्चासत्राचे आयोजन केले आहे.ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘द इलेक्शन दॅट चेंज्ड इंडिया’ या पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी होणार आहे.या चर्चासत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. गडकरी छोट्या राज्याचे पुरस्कर्ते आहेत तर चव्हाण हे मागास भागाच्या विकासावर अधिक भर देण्याची भूमिका मांडणारे आहेत. शिवाय विधानसभा निवडणूक काळात गडकरींनी चव्हाण यांच्यावर नेम साधला होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एका व्यासपीठावर येऊन आपली बाजू कशी भक्कमपणे मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चर्चासत्रात राजदीप सरदेसाई हे नियंत्रकाची भूमिका बजावतील. पारंपरिक राजकीय विचारधारा बाजूला सारून विकासाच्या मुद्यांवर राजकीय नेते एकत्र आले पाहिजे, अशी वेदची नेहमीचीच भूमिका आहे. जात, धर्म, क्षेत्र आणि भाषावाद बाजूला सारून मतदारांनी मतदान केले. विदर्भ विकासाच्या दृष्टीने लोकांच्या काय अपेक्षा आहेत, हे नेत्यांनी समजावून घ्यावे, असे वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख आणि सचिव राहुल उपगन्लावार यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे