‘तोंडी तलाक’ला राजकीय चष्म्यातून पाहू नका : नरेंद्र मोदी

0
10
 नवी दिल्ली,29(वृत्तसंस्था) – ‘तोंडी तलाक’ या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा भाष्य केले असून या मुद्याला राजकीय चष्म्यातून पाहू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
संत बसवेश्‍वर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आज (शनिवार) मोदी बोलत होते. ते म्हणाले, “मुस्लिम समुदायातील सुधारकांनी मुस्लिम समुदायातील महिलांना सामोरे जाव्या लागणाऱ्या समस्यांविरुद्ध (तोंडी तलाक) लढण्यासाठी समोर यावे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा. मी मुस्लिम समुदायाला विनंती करतो की त्यांनी या मुद्याला राजकीय चष्म्यातून पाहू नये.’
ओडिशा येथील भुवनेश्‍वर येथे नुकत्याच पार पडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोदी यांनी तोंडी तलाकवर भाष्य केले होते. या विषयावर जे लोक मौन बाळगतात ते ही दोषी असल्याचे मोदी यांनी त्यावेळी सांगितले होते.
तोंडी तलाकचे रोज नवेनवे प्रकरणे समोर येत आहेत. स्पीड पोस्टाने, व्हॉटसऍपद्वारे तोंडी तलाक देण्यात येत आहेत. अशा तलाकपीडित महिला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना न्यायाच्या आशेने पत्र लिहून व्यथा मांडत आहेत.