राष्ट्रगीतातील ‘अधिनायक’ शब्द काढा: कल्याणसिंह

0
22

पीटीआय
जयपूर दि. ७: राष्ट्रपीटीआयगीतातील “अधिनायक‘ हा शब्द ब्रिटिश राजवटीच्या स्तुतीसाठी वापरण्यात आल्याने तो काढून टाकावा अशी मागणी राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह यांनी केली आहे. याऐवजी तेथे “मंगल‘ हा शब्द वापरावा, असेही त्यांनी सुचवले आहे. राजस्थान विद्यापीठाच्या 26व्या पदवीप्रदान सोहळ्यात ते बोलत होते.

ते म्हणाले, की “जन-गन-मन अधिनायक जय हे…‘ यातील “अधिनायक‘ हे कोणाला उद्देशून आहे? ही ब्रिटिशांसाठीची स्तुतिसुमने आहेत, तरी यामध्ये दुरुस्ती करावी व “जन-गन-मन मंगल जय हे,‘ असे राष्ट्रगीत म्हटले जावे. रवींद्रनाथ टागोरांबद्दल आपल्याला मनापासून आदर आहे, परंतु त्यांनी लिहिलेल्या राष्ट्रगीतातील हा शब्द बदलून “मंगल‘ असा करावा, असे माझे ठाम मत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. त्याचप्रमाणे “महामहिम‘ हा शब्दही वगळून “माननीय‘ शब्दाचा वापर करावा असे त्यांनी सुचविले. राज्यपाल हा काही “महान‘ नसतो, तरी त्यांना ब्रिटिश काळात देण्यात आलेली “महामहिम‘ ही पदवी आता बंद करावी, असेही ते म्हणाले.