वृत्तसंस्था
नवी दिल्ली – दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर आरोप करणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार कीर्ती आझाद यांच्यावर कारवाई करण्याची वेळ आली असल्याचे भाजपने म्हटले आहे.
याबाबत बोलताना भाजप नेते सिद्धार्थ नाथ सिंह म्हणाले, “पक्षातील लोकशाही तुम्हाला निंदा करण्याचे स्वातंत्र्य देत नाही. संसदेमध्ये तुम्ही (कीर्ती आझाद) सरकारसाठी पेच निर्माण केला आहे. ट्विटद्वारे तुम्ही केलेल्या बंड पुकारला आहे. त्यामुळे तुम्ही शिस्तभंग केला आहे. मला वाटते अशा प्रकारच्या बेशिस्त वागणुकीतून चांगला संदेश जात नाही. आता कृतीची वेळ आहे.‘