चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक घराघरापर्यंत काँग्रेस पोचवण्याचा संकल्प-नम्रता आचार्य ठेमस्कर

0
15
चंद्रपूर,दि.09ः- महिला काँग्रेसला गावागावापर्यंत नव्हे तर घराघरापर्यंत पोचविण्यासाठी आपण सर्वांना यापुढे जोमाने कामाला लागायचे आहे.त्यासाठी मला मानसन्मानच आपणाकडून मिळायला हवे हे महत्वाचे नाही तर काम महत्वाचे असल्याचे विचार चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी व्यक्त केले. त्या
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या सूचनेनुसार आयोजित चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस ग्रामीणच्या बैठकित बोलत होत्या. येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हा महिला काँग्रेस ग्रामीणची आढावा बैठक आज (दि.9) पार पड़ली.जिल्हाध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना काँग्रेसपक्षाचे संघटन क्रमांक एकचे करायचे आहे असे आवाहन यावेळी केले.तसेच उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी आपले अनुभव व अडचणी यावेळी मांडल्या.
या बैठकीला उपाध्यक्षा सुनीता धोटे, उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, सेवादल महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा लता बारापात्रे, शालिनी भगत, वाणी डारला, माजी जिल्हा परिषद सदस्य ममता डुकरे, भद्रवती तालुका अध्यक्षा वर्षा ठाकरे, सिंदेवाही तालुका अध्यक्षा सीमा सहारे, राजुरा तालुका अध्यक्षा कविता उपरे, राजुरा शहर अध्यक्षा संध्या चांदेकर, सावली शहर अध्यक्ष भारती चौधरी, गोंडपीपरी तालुका अध्यक्षा रेखा रामटेके, वरोरा तालुका अध्यक्षा चित्रा अहिरकर, बल्लारपूर तालुका अध्यक्षा अफसाना सय्यद, जिवती तालुका अध्यक्षा नंदा ताई मुसने,नंदा नगराळे, रुपा ताडूरवार, निमंत्रीता कोकाडे, वनिता जानबोजवार, भारती चौधरी, निर्मला कुळमेथे, योगिता भोयर, अर्चना गर्जेलवार, कुसुम जाधव, शितल गेडाम, लता इंदूरकर, त्रिवेणी पदमा, संध्या मंडल, निधी चौधरी, स्मिता पारधी, सुनंदा जीवतोडे यांच्यासह इतर सेलचे पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. त्याच बरोबर या बैठकीच्या यशस्वीतेसाठी मुन्ना तावाडे आणि इंजिनिअर नरेंद्र डोंगरे यांनी विशेष परिश्रम घेतले.