तेव्हा छगन भुजबळ होते शिवसेनेचे उमेदवार, 👉चिन्ह होतं “मशाल”

0
45
वाढदिवसाच्या शुभेच्छा

तर १९८५ मध्ये शिवसेनेचा विजय “मशाल” या चिन्हावरच झाला होता….
👉🟥🟥👉काय घडलं होतं तेव्हा?

👉🟣👉शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात गेला.शनिवारी निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह दोन्ही गोठवलं. त्यानंतर सोमवारी ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष नाव मिळालं आहे. तर मशाल हे पक्षचिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला चिन्ह मिळणं बाकी आहे आणि बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. ठाकरे गटाने मशाल चिन्ह मिळताच जल्लोष केला. मात्र या मशालीचा एक इतिहास शिवसेनेत आहे.

👉🛑🛑👉काय आहे मशाल चिन्हाचा इतिहास?

बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ ला शिवसेना स्थापन केली. मात्र १९८९ पर्यंत पक्षाकडे धनुष्यबाण हे चिन्ह नव्हतं. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला १९८९ मध्ये मिळालं. मात्र त्याआधी १९८५ मध्ये मशाल या चिन्हावर छगन भुजबळ माझगाव मधून निवडून आले होते. निवडणूक लढवत असताना शिवसेनेने १९८९ पर्यंत विविध चिन्हं घेतली होती. त्यातला पहिला मोठा विजय १९८५ ला मिळाला होता. त्यावेळी शिवसेनेचं चिन्ह होतं धगधगती मशाल. तेच मशाल हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला आत्ता मिळालं आहे.

👉🟥👉छगन भुजबळ यांनी मशाल चिन्हावर जिंकली होती निवडणूक

छगन भुजबळ यांनी मुंबईतल्या माझगाव मतदारसंघातून शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले. त्यावेळीही पक्षाला निवडणूक लढवायची असेल तर काय चिन्ह वापरायचं? यावर बरीच चर्चा झाली होती. या चर्चेत मनोहर जोशीही होते. उगवता सूर्य आणि बॅट बॉल या इतर दोन चिन्हांचाही विचार तेव्हा झाला होता. मात्र निवडणूक आयोगाने धगधगती मशाल हे चिन्ह तेव्हा दिलं होतं. त्यावर छगन भुजबळ निवडून आले आणि आमदार झाले.

👉🟣👉छगन भुजबळ यांनी काय म्हटलं आहे?

आम्ही तेव्हा धगधगती मशाल मिळावी यासाठी आग्रही होतो कारण मशाल हे क्रांतीचं चिन्ह आहे. लोकांना नवी दिशा देण्याचं काम ही मशाल करू शकते असं आम्हाला वाटलं होतं त्यामुळे आम्ही त्यावेळी या चिन्हासाठी आग्रही होतो असं छगन भुजबळ यांनी तेव्हा म्हटलं होतं. त्यावेळी निवडणुकीचा प्रचार हा आत्तासारखा हायटेक झाला नव्हता. त्यावेळी होर्डिंग, फलक, भिंती यावरच चिन्ह रेखाटून प्रचार करावा लागत असे. अशा काळात धगधगती मशाल दाखवणं हे इतर चिन्हांच्या तुलनेत सोपं होतं त्यामुळे शिवसेनेने हे चिन्ह घेतलं आणि निवडणूक लढवली होती. आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं आहे त्यावरून १९८५ मधल्या या विजयाची आठवण अनेकांना झाली आहे.

👉🟥👉निवडणूक लढण्यासाठी तेव्हा पैसेही नव्हते👉छगन भुजबळ

निवडणूक लढण्यासाठी तेव्हा आमच्याकडे फारसे पैसेही नव्हते. त्यामुळे आम्ही भिंतींवर मशाली काढून प्रचार केला. तसंच मशाल रेखाटणं हे अतिशय सोपं होतं. मी आणि माझ्यासोबतचे कार्यकर्ते प्रचार करत होतो त्यावेळी आम्ही मतदारांचं लक्ष कसं वेधलं जाईल अशा ठिकाणी मशाल काढत होतो. त्यावेळी मला ऐतिहासिक असा विजय मिळाला तो मशाल या चिन्हामुळेच असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं.

👉🔴👉शिवसेनेत असलेले छगन भुजबळ यांनीही बंड करून नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र मशाल या चिन्हावर शिवसेनेने जी निवडणूक लढवली तो शिवसेनेचा आमदारकीचा पहिला विजय होता. त्यानंतर मग शिवसेनेच्या विजयाची मालिका सुरू झाली. उद्धव ठाकरेंना आता मशाल हे चिन्ह मिळालं आहे मला खात्री वाटते आहे की अंधेरी येथील पोटनिवडणूक ते या चिन्हावर नक्की जिंकतील असंही छगन भुजबळ यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

👉🟥🟥👉छगन भुजबळ, शिवसेना अन् मशाल!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९७२ साली माझगांव विभागातून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी छगन भुजबळांना उभे केले. जनतेने त्या निवडणूकत त्यांनी निवडूनही दिले. १९७८ साली महापालिकेची दुसरी निवडणूक झाली. पहिल्या पांच वर्षाच्या माझ्या कामाची पोचपावती म्हणून, मतदारांनी पुन्हा एकदा भुजबळांना निवडून दिले. अनेक रथी-महारथी विरोधकांच्या अनामत रकमा जप्त झाल्या, इतक्या मोठ्या प्रमाणात भुजबळांना यश मिळाले. माझगांवच्या या निवडणुकांमधील यशानंतर त्यांना १९८५ साली विधानसभेकरता माझगांव विभागातून आमदारकीचे तिकीट देण्यात आले. त्यांच्यासाठी विधासभा लढवण्याची ही पहिलीच वेळ होती. १९८५ साली माझंगाव विधानसभा मतदार संघातून छगन भुजबळ हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते आणि तेव्हा त्यांचे चिन्ह होते मशाल. योगायोगाने आता हेच चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या गटालाही मिळाले आहे, पण छगन भुजबळ मात्र या पक्षात नाहीत.

👉🔴👉छगन भुजबळ यांनी आपल्या आमदारकीच्या प्रचारासाठी एक पुस्तक तयार केले होते. त्यात त्यांनी अनेक गोष्टी नमूद केल्या होत्या. ते म्हणतात, “या कालखंडामध्ये आपल्या भागातील नागरिकांना विविध सुविधा देण्याचा मी यशस्वी प्रयत्न केला. माझ्या चाहत्यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेत याची चित्रमय झलक आपण पहालच. महानगरपालिका सभागृहात विविध समस्यांवर मी आवाज उठविला. त्याच बरोबर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात वेळोवेळी उद्भवलेल्या अनेक प्रश्नांचा ऊहापोह केला. मग तो रॉकेल टंचाई असो, की बेळगांव कारवार प्रश्न असो, किंवा गिरणी कामगारांचा प्रश्न असो, किंवा ‘बॉम्बे “ऐवजी “मुंबई” हे नांव प्रचारात आणण्याचा प्रश्न असो. अशा विविध प्रश्नांना मी महापालिकेच्या माध्यमातून तसेच सार्वजनिक व्यासपिठावरून वाचा फोडली आहे. माझी ही भरीव कामगिरी पाहून बाळासाहेब ठाकरे यांनी मला महापालिका शिवसेना गटाचा नेता नेमले. मुंबई महानगरपालिकेनेही माझ्या कार्याचा गौरव म्हणून अनेक महत्वांच्या संस्थांवर माझी नियुक्ती केली, इतकेच नव्हे तर तीन वेळा मुंबई महानगरपालिकेचा प्रतिनिधी म्हणून मला परदेशी अभ्यास दौऱ्यावर पाठविले.”

👉🔺👉”बेळगांव-कारवार सीमा प्रश्न, बस भाडे वाढ, दूधभाव वाढ अशा अनेक जन आंदोलनात अग्रभागी राहून मी प्रसंगी कारावासाची शिक्षा भोगली. अशा प्रकारे केवळ नागरी सुख-सोयीं वाबतच नव्हे तर, समाजातील अन्य विविध कार्यामध्ये मी सक्रीय भाग घेतला. म्हणूनच शिवसेनेने माझगांव विभागातून विधान सभेकरिता माझी उमेदवारी जाहीर केली,” असे मनोगत भुजबळांनी त्या पुस्तकात मांडले आहे.

👉🟣👉शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार असून ६ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी अद्याप तरी कोणीच आपला उमेदवार जाहीर केलेला नाही, पण शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नीला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर भाजपाकडून मुरजी पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी ठाकरे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.