सुरुवात तुम्ही करा,मग आम्ही सर्व चांगल्या-वाईट कुंडल्या बाहेर काढू;नाना पटोलेचे प्रत्युत्तर

0
27

गोंदिया- गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील काँग्रेससह सर्व पक्षाच्या आमदार खासदारांच्या कुंडल्या माझ्याजवळ असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी सडक अर्जुनीच्या सभेत केला होता.त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी त्यांच्याकडे काय कुंडल्या आहेत हे मला माहीत नाही. परंतु प्रफुल्ल पटेल यांच्या सर्व चांगल्या आणि वाईट कुंडल्या माझ्याकडे आहे. त्यांनी फक्त सुरुवात करावी, मग कोणत्या कुंडल्या बाहेर काढायच्या ते मी ठरवतो असे प्रत्युत्तर दिले.ते अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे महाशिवरात्रीनिमित्त आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नंबर एकची पार्टी असताना राज्यसभेवर गेलेच कशाला? प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी पुन्हा आपली इच्छा असल्याचे बोलून दाखवले आहे. उद्या पक्षाकडून संधी मिळाली तर मी नक्कीच लढेल, असे म्हणत त्यांच्या मनात असलेली खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे.गोंदिया- भंडारा जिल्ह्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी नंबर एकची पार्टी असल्याने महायुतीचाच उमेदवार निवडून येणार असल्याचे वक्तव्य प्रफुल पटेलांनी केले होते. या वक्तव्याच्या समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जर गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपा नंबर एकची पार्टी आहे, तर मग प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेवर कशाला निवडून गेले.त्यांनी मैदानात यायला हवं होतं. खरं पाहिले तर ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत.कारण त्यांना माहित आहे की, गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीची ताकद उरलेले नाही. म्हणून ते राज्यसभेमध्ये निवडून गेलेत. आता आगामी  निवडणुकीमध्ये गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचीच खरी ताकद दिसून येईल, असा विश्वास देखील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलतांना व्यक्त केला. पक्षाचा आदेश आला तर मी तो पाळेल.अनेकांनी या मतदारसंघातून लढण्याची आपली इच्छा दाखवली आहे.पण पक्ष जो निर्णय घेईल तो महाआघाडीसह काँग्रेसला मान्य असेल असेही पटोले म्हणाले.पटोले म्हणाले की, गोंदिया -भंडारा लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडेच आहे. उद्या पक्षाने मला आदेश दिला तर त्या आदेशाचे मी पालन करेल आणि गोंदिया भंडार लोकसभेची जागा लढवून विजय मिळवेल. असा विश्वास देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलतांना व्यक्त केला.