शेतक-यांचा संप वेदनादायी – पंकजा मुंडे

0
12
औरंगाबाद, दि. 1 – शेतक-यांचा संप वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. शेतक-यांचा विश्वास संपादन करण्यासाठी काम करुन योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील याकडे लक्ष द्यावे लागेल. सरकार या संपाबाबत आत्मपरीक्षण करेल, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या आहेत.
मुख्यमंत्री शेतक-यांबाबत सकारात्मक आहेत, असे सांगत पंकजा पुढेही असे म्हणाल्या की शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याला आधार दिला पाहिजे.
 कापसाला हमीभाव दिला. शेतक-यांना व्यापा-याला मध्यस्थी ठेवण्याचे सवय लागली असून ती तोडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, असे सांगत यावेळी पंकजा यांनी सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.