मंत्रालयासमोर विष प्राशन केलेल्या शेतकर्‍याचा मृत्यू

0
55

मुंबई-शेतकरी धर्मा पाटील यांच्या मंत्रालयातील आत्महत्येची घटना काही वर्षांपूर्वी समोर आली होती. याच घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा घडली आहे. दोन दिवसांपूर्वी मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सुभाष जाधव यांच्यावर मुंबईतील जी. टी. रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचविण्याचे शर्थीने प्रयत्न केले, पण 22 ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याचे संकेत आहेत.
20 ऑगस्ट रोजी संतोष जाधव यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांना तत्काळ मुंबईतील जी. टी. रुग्णालयात दाखल केले होते. संतोष जाधव पुण्यातील आंबेगावचा रहिवासी होते. गावातील जमीन व घर बळकवल्याची त्यांची तक‘ार होती. पोलिसांकडे वारंवार तक‘ार करूनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी मंत्रालयासमोर विष प्राशन केले होते.