नाशिकजवळ ट्रॅव्हल्स-टेम्पोचा अपघात, बस पेटून 11 ठार:38 जखमी; मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत

0
80

नाशिक- नाशिक ते औरंगाबाद मार्गावर हॉटेल मिरचीजवळ एका खासगी बसचा मोठा अपघात झाला. अपघातानंतर या बसमध्ये आग लागल्याने अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. या दुर्घटनेत 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. यात जवळपास 38 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही बस यवतमाळवहून मुंबईला जाणारी खासगी बस असल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. प्राथमिक माहितीनुसार ही खासगी बस आणि एका आयशर टेम्पोमध्ये अपघात झाला. यानंतर ट्रॅव्हल्सच्या डिझेल टँकमध्ये आग लागली. पाहता पाहता अवघ्या बसने पेट घेतला. पहाटे पावणे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींनुसार, अतिशय भयंकर अशी ही आग होती. पूर्ण बस पेटलेली असताना प्रवासी खिडक्यांमधून उड्या मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. बसमधील लोकांना बाहेर पडायला मार्ग नव्हता. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार ते पाच बंबांनी त्या ठिकाणी धाव घेतली. यानंतर आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. दरम्यानच्या काळात अनेक प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे.

या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. या घटनेबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांसह आयुक्तांशी माझे बोलणे झाले आहे. या घटनेत 11 जणांचा मृत्यू तर 38 जण जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत जखमींवर चांगले उपचार झाले पाहिजेत. उपचरात काही कमी पडू नयेत अशा सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान, या अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं पाच लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केला शोक

👉🟪🟪👉जखमी असणाऱ्यांचा उपचाराचा खर्च शासन करणार

नाशिक बस दुर्घटनेबाबत सर्व बाबी तपासण्यात येतील तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. परंतू आता जे जखमी आहेत, त्यांना उपचार देण्याला आता प्राधण्य द्यावं, अशा सुचना मी दिल्या असल्याचे शिंदे म्हणाले. ही बस मुंबईकडून यवतमाळकडे जात होती. त्यावेळी एक ट्रकला धडकल्यामुळं आग लागल्याची घटना घडली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जकमी असणाऱ्यांपैकी दोन ते तीन जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी स्वत: महापालिका आयुक्त हजर असल्याचे शिंदे यांनी सांगितले. जखमींवरचा उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे, तर मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून पाच लाखांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

 

बसचा अक्षरश: कोळसा, अनेक प्रवाशांचा मृत्यू 
नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर ही भीषण घटना घडली आहे. मिरची हॉटेल परिसरात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने बसमधील काही क्षणात जळून खाक झाली आहे. आग एवढी भीषण होती की काही वेळात आगीत झालेल्या स्फोटाने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. चिंतामणी ट्रॅव्हलची ही यवतमाळ येथून मुंबईकडे निघालेली बस होती. दरम्यान नाशिकमधून ही बस मुंबईकडे मार्गस्थ झाली असतांना पहाटे साडे चार ते पाच वाजेच्या सुमारास ही घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी यांनी सांगितले.

प्रवासी गाढ झोपेत असतानाच काळाचा घाला
नाशिक सिटी लिंक बस सेवेच्या माध्यमातून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. जखमींवर उपचार सुरू झाले आहेत. प्रवासी गाढ झोपेत असताना अचानक आवाज झाला आणि सर्व प्रवाशी जागे झाले, मात्र बसच्या अनेक भागात आग पसरली होती. अनेकांनी खिडकीतून उड्या मारल्या, तर काही जणांना आपला जीव गमवावा लागला.

पोलीस यंत्रणा खडबडून जागी, अग्निशमन दल घटनास्थळी

दरम्यान स्थानिक नागरिकांना बस जळत असल्याचे त्यांनी घटनेची पोलिसांसह अग्निशमन दलाला कळविली. त्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन ते चार वाहने तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आले, त्यांनी उड्या मारल्या तर आगीमुळे अनेक प्रवासी जळून खाक झाले.

अनेक प्रवाशांचा मृत्यू
दरम्यान पहाटेच्या सुमारास बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बस मधून हलविण्यात आले. अपघात घडल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी नवीन आडगाव नाक्यावर असलेल्या वाहतूक पोलीस चौकी देखील धाव घेतली. नाशिक पोलिसांसह अग्निशमनची वाहने अनेक तासाभरापासून घटनास्थळी असून आग विझवण्यात आली आहे.